शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

युवागिरी: अनुकरण सद्गुणांचे... दर्शन माणुसकीचे!; तरूण जोपासतायेत सामाजिक भान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 1:34 AM

बुद्धीदाता, विघ्नविनाशक, विविध कलांचा अधिपती म्हणजे गणपती. त्याच्या ठायी वसलेल्या विविध गुणांमुळेच त्याला ‘गुणेशु’ असेही म्हणतात. गणरायाची हीच महती ...

बुद्धीदाता, विघ्नविनाशक, विविध कलांचा अधिपती म्हणजे गणपती. त्याच्या ठायी वसलेल्या विविध गुणांमुळेच त्याला ‘गुणेशु’ असेही म्हणतात. गणरायाची हीच महती लक्षात घेता समर्थ रामदास स्वामींनी ‘मनाचे श्लोक’ लिहिताना सुरुवातीलाच ‘गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा’ असे म्हटले आहे. युवा पिढीनेही बाप्पाचे हे सद्गुणी रूप अचूक हेरले आणि यंदा गणेशोत्सवात अनेकांनी पूरग्रस्तांना मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. युवा पिढीत दडलेली सामाजिक बांधिलकी, परोपकाराची जाणीव करून देणाऱ्या या काही बोलक्या प्रतिक्रिया...समाजासाठी काहीतरी करावे असे नेहमीच वाटत होते. सांगली - कोल्हापूरच्या महापुरामुळे झालेले नुकसान मला पाहवत नव्हते. त्यामुळे आमच्या गणेशोत्सव मंडळाने पुढाकार घेऊन मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले. गणेशोत्सवाच्या आधी कोल्हापूरला जाऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत एकजुटीने काम केले. जमेल तेवढी अर्थिक मदत व श्रमदान केले. त्यामुळे हा गणपती कायम लक्षात राहील. - अक्षय बोराडे, श्री राम महाविद्यालय, नाहूरसद्य:स्थितीत गणपतीत मौजमजा करण्याऐवजी गरजूंना आपल्याकडून काही मदत होईल का याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. मंडळाच्या दानपेटीत जे काही पैसे जमा होतील ते पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी वापरले जाणार आहेत अनेकांनी एकत्र येऊन या कार्यासाठी हातभार लावलेला आहे. - पवन चौरसिया, भवन्स महाविद्यालय, अंधेरीया वर्षी बाप्पाचे अगदी थाटामाटात आगमन न करता खूप साध्या पद्धतीने केले. दरवर्षी आमच्या फोर्टच्या महाराजाचे आगमन पारंपरिक संस्कृतीप्रमाणे ढोल-ताशे वाजवत होते. या वेळी तसे न करता जितके पैसे वाचविता येतील तितके वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. डेकोरेशनचा देखावा नाही केला. फक्त कपड्याचे ड्रपिंग केले आहे. यातून वाचलेले पैसे पूरगस्तांना देणार आहोत. - विलास ओव्हळ, डी. वाय. पाटील कॉलेजमी आणि माझा परिवार आम्ही आमच्या घरी दरवर्षी गणेशस्थापना करतो. तेही पर्यावरणपूरक अशा शाडूच्या मातीचा. गणेशविसर्जनाच्या वेळी आम्ही डीजेसाठी लागणारा खर्च टाळून तो अनाथ आश्रमास मदत म्हणून देतो. या वर्षी आम्ही अनाथ आश्रमालाही मदत केलीच; पण, सांगलीतील गरजू व्यक्तींना गरजेच्या वस्तू देऊन त्यांना मदत केली. - रितिक बुट्टे, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय

दरवर्षी आम्ही गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना करतो. प्रत्येक वर्षी मंडळातर्फे काही ना काहीतरी सामाजिक उपक्रम राबविले जातात. या वेळी सांगली - कोल्हापूरकरांना पूरग्रस्त परिस्थितीचा सामना करावा लागला. म्हणून आम्ही मंडळातील कार्यकर्त्यांनी वर्गणीत सर्व जमा झालेली रक्कम एकत्र करून त्यातून गरजेच्या वस्तू घेऊन त्या पूरग्रस्तांना मदत दिल्या. - मानव मुके, वालिया महाविद्यालय, अंधेरी

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तिथले लोकही आपलेच बांधव आहेत. त्यांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपण प्रत्येकाने मदत केली पाहिजे, असे मला वाटले. याच पार्श्वभूमीवर मी पूरग्रस्तांना गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी लागणारे सजावटीचे साहित्य एकत्र करून त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली. - आशुतोष शेळके, जोशी-बेडेकर महाविद्यालयसाºया जगात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात गणेशभक्त मोठ्या श्रद्धेने दान करतात. तसेच मीही परिस्थितीचे भान ठेवून या वर्षी गणपतीमध्ये भेट म्हणून आलेल्या रकमेतून कोल्हापुरातील पूरग्रस्तांना नवीन कपडे घेऊन त्यांना एक छोटीशी मदत केली. त्यांच्या दु:खात त्यांना सहकार्यासाठी माझाही खारीचा वाटा असावा अशी जाण ठेवून त्यांना मदत केली. आणि यापुढेही मी माझ्या गणपतीतील आलेले पैसे वस्तूच्या स्वरूपात समाजातील गरजू व्यक्तींना देण्याचा निश्चय केला आहे. - वैभव आंद्रे, साहेबरावजी महाविद्यालयकोल्हापूर - सांगलीला आलेल्या महापुरात पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. जीवनावश्यक मदतीशिवाय गावे पुन्हा उभारणीसाठी श्रमदानाची नितांत गरज होती. हीच गरज मी माझ्या काही साथीदारांसोबत पूर्ण केली. खूप वाईट अवस्था होती. बिकट परिस्थितीत राहून गावे स्वछ केली. एवढेच नाहीतर, गणपतीचा वायफळ खर्च टाळून त्याचा उपयोग बदलापूरला आलेल्या महापुरात पाण्यात गेलेल्या अनाथाश्रमासाठी केला. मुलांना शालेय वस्तूंचे वाटप केले. अशा माणुसकीतूनच बाप्पाचे खरे दर्शन,आशीर्वाद मिळतो. - प्रणाली पोळ,जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणेगणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य आणि इतर सजावटीचा कचरा जलाशयात न टाकता तो शास्त्रीय पद्धतीने गोळा करणे ही आज पर्यावरणीय रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. या कामी डोंबिवलीतील निर्मल युथ फाउंडेशन गत तीन वर्षांपासून निर्माल्य संकलनाचे काम करीत आहे.

स्वयंसेवकांसोबत साऊथ इंडियन असोसिएशन, प्रगती आणि जी.आर. पाटील महाविद्यालयाचे एनएसएसचे स्वयंसेवक निर्माल्य संकलनाचे कार्य भर पावसात गणेश विसर्जन घाटांवर करत होते. सुमारे अडीच टन निर्माल्य जमा करून गांडूळ खत बनविण्यासाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे.

तलाव, नदी, नाले, समुद्र इत्यादी जलाशयात निर्माल्य तसेच प्लॅस्टिक कचरा टाकल्यास प्रदूषण वाढते तसेच जलाशयातील जलचर प्राण्यांच्या शरीरात हा कचरा अडकू शकतो शिवाय त्यांच्या पर्यावरणीय अधिवासासही यामुळे धोका निर्माण होतो आणि जैवविविधता नष्ट होऊ लागते आणि सृष्टीचे चैतन्य हरवते. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात आले की घरचा अथवा मंडळाचा गणपती विसर्जित करताना निर्माल्य संकलनासाठी फाउंडेशनचे कार्यकर्ते डोंबिवली पश्चिम भागातील कोपर, गणेश घाट, जुनी डोंबिवली, रेतीबंदर, सातपूल जेट्टी, कुंभारखाणपाडा आणि पूर्व विभागातील आयरे गाव येथे उभे होते.

(संकलन : तेजल मोहिते, काजल बच्चे, सायली सावंत)

 

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019