शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

हे शहाणपण अक्षुण्ण राहोे!

By admin | Updated: December 3, 2015 03:32 IST

कोणतीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही, ती मिळवायची तर काही ना काही किंमत द्यावीच लागते. फरक इतकाच की काहींना त्यासाठी माफक तर काहींना जबर किंमत चुकवावी लागते.

कोणतीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही, ती मिळवायची तर काही ना काही किंमत द्यावीच लागते. फरक इतकाच की काहींना त्यासाठी माफक तर काहींना जबर किंमत चुकवावी लागते. आपल्या पक्षाच्या संसद सदस्यांना चार खडे बोल सुनावण्याचे आणि त्यांनी त्यांच्या जिभेला आवर घालण्याचे जे आवाहन भाजपाने मंगळवारी केले त्याला विलंबाने सुचलेले शहाणपण असेच म्हणावे लागेल. वास्तविक पाहाता हे फार पूर्वीच व्हावयास हवे होते. आपण आता सत्ताधीश झालो आहोत या उन्मादात भाजपाच्या संसदेतील आणि संसदेबाहेरील लोकानीही त्यांच्या जिव्हा अंमळ अधिकच सैल सोडल्या होत्या. त्यावर केवळ राजकीय विरोधकच तेवढे टीका करीत होते असे नाही. तर देशातील विविध क्षेत्रातले नामांकित लोकदेखील त्यांच्या मनातील संवेदना, त्यांना रुचतील अशा पण शिष्टाचारास सुसंगत मार्गाने व्यक्त करीत होते. तथापि सरकार आणि भाजपा आपल्याच गमक्यात वावरत होते. तरीही त्याची पूर्ण जबाबदारी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याचकडे जात होती, हे अमान्य करता येत नाही. परिणामी भाजपाला व केवळ या पक्षालाच नव्हे तर मोदी यांनाही विवेकवादाची उपेक्षा करण्याची किंमत चुकविणे भाग पडू लागले. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत झालेला अत्यंत लाजीरवाणा पराभव हे त्याचे अगदी अलीकडचे ठळक उदाहरण. अर्थात हा अभिप्राय कोणत्याही राजकीय पंडिताचा वा माध्यमांचा नसून भाजपाचे संसदीय कार्य मंत्री व्यंकय्या नायडू यांनीच तो व्यक्त केला आहे. गेल्या दीड वर्षात प्रथमच आयोजित भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना नायडू स्पष्टपणे म्हणाले की सदस्यांकरवी केल्या जाणाऱ्या भडकाऊ आणि असहिष्णु विधानांचा विरोधक वापर करीत असून त्यामुळे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या प्रतिमेस तसेच त्यांच्या विकास विषयक कार्यक्रमास हानी पोहोचते आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संसदीय कार्य राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी तर त्यापुढे जाऊन बिहारच्या पराभवास पक्षाच्या नेत्यांची बेताल वक्तव्येच कारणीभूत ठरल्याचेही सूचित केले. इत:पर भाजपाच्या सदस्यांनी जाहीर वक्तव्ये करताना शिष्टाचार आणि सभ्यता पाळावी, वादविषय टाळावेत असे मार्गदर्शनदेखील याच बैठकीत केले गेले. तसे करताना विरोधक अशाच वक्तव्यांचा वापर करुन पंतप्रधानांच्या विकासविषयक कार्यक्रमात अडखळे निर्माण करीत असल्याचा अप्रत्यक्ष आरोपदेखील बैठकीत केला गेला. पण त्याहून महत्वाचे म्हणजे सध्या संसदेत प्रलंबित असलेल्या वस्तू आणि सेवाकर विधेयकासंबंधी पंतप्रधान मोदी व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्या दरम्यान झालेल्या सकारात्मक चर्चेचा उल्लेखदेखील बैठकीत केला गेला. प्रस्तुत बैठकीचे श्रेय भलेही भाजपा घेत असली तरी काँग्रेस पक्ष भाजपाच्या विकास कामात अडथळे निर्माण करीत असल्याचा तिचाच आरोप लक्षात घ्यायचा तर सोनिया गांधींनी पंतप्रधानांचे चहापानाचे निमंत्रण स्वीकारलेच नसते. प्रत्यक्षात तसे झाले नाही. यातून एक बाब पुरेशी स्पष्ट होते व ती म्हणजे काँग्रेस या देशातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या विरोधी पक्षाबरोबरच अन्य विरोधकांचाही विरोध मोदींच्या विकास कामाला नसून भाजपाच्या असहिष्णु आणि बेताल वृत्तीला आहे. मोदींच्यादेखील बहुधा हे आता लक्षात आले असावे असे दिसते. भाजपाला आपल्या संसद सदस्यांची बैठक घेण्याची आणि त्यांना उपदेशाचे बाळकडू पाजण्याची उपरती होण्यास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले संसदेतील जोरकस भाषणदेखील कारणीभूत ठरले. त्यांच्या संपूर्ण भाषणाचा रोख पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याच दिशेने होता. त्याचबरोबर एक सत्ताधारी पक्ष म्हणून केन्द्रापेक्षा महाराष्ट्रासारख्या राज्यात कारभारावर पकड बसविण्यात भाजपाला आजवर कसे अपयश आले आहे यावरही राहुल गांधी यांनी लक्ष्यवेधी टीका केली. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आणि आता मागे घेतलेल्या एका अध्यादेशाचा उल्लेख केला. या अध्यादेशाने सरकार आणि सरकारी कामकाजावर टीका करणे हा देशद्रोह ठरविला होता. अर्थात एक पक्ष म्हणून भाजपाची रचना आणि नरेन्द्र मोदी यांचे व्यक्तिमत्व लक्षात घेता, वेळीच त्यांनी आपल्या सहोदरांना वेसण घातली असती व भाजपाशासित राज्यांच्या कारभाराकडेही जरा लक्ष घातले असते तर अनेक गोष्टींबरोबरच कदाचित बिहारातील जिव्हारी लागणारा पराभवदेखील टळला असता. पण मोदी काही बोलतच नाहीत असे पाहून त्यांच्या मौनाचा सोयीस्कर अर्थ काढून घेऊन भाजपाची मंडळी वाट्टेल तो धुडगूस घालीत होती. देशाचा विकास आणि त्यासाठी आवश्यक परकीय गुंतवणुकीचे घोडे ज्या विधेयकांच्या संसदीय मंजुरीपाशी अडकून पडले आहे, त्यातील वस्तू आणि सेवा कर तसेच दिवाळखोरी घोषित करण्याविषयीच्या विधेयकाचा संबंध असून त्यांना राज्यसभेत मंजुरी देणे पूर्णपणे काँग्रेस पक्षाच्या आधीन आहे. त्यासाठी आज त्या पक्षाला चुचकारुन घेणे ही मोदी सरकारची प्राथमिकता आहे. परंतु केवळ त्यासाठीच आज भाजपाला सुचलेले शहाणपण तात्पुरते न राहाता ते अक्षुण्ण राहावे, अशीच देशातील विवेकवादी लोकांची भावना असू शकते.