शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अधिष्ठात्यांची खूर्ची अस्थिर करण्याचे राजकारण कुणाचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 23:36 IST

मिलिंद कुलकर्णी कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू होण्याचे जळगाव जिल्ह्यातील प्रमाण हे देशापेक्षा चौपट असल्याचा ठपका ठेवत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता ...

मिलिंद कुलकर्णीकोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू होण्याचे जळगाव जिल्ह्यातील प्रमाण हे देशापेक्षा चौपट असल्याचा ठपका ठेवत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांची २२ मे रोजी उचलबांगडी करण्यात आली. कोल्हापूरच्या डॉ. मीनाक्षी गजभिये यांची त्यांच्या जागेवर नियुक्ती करण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.तात्याराव लहाने यांनी काढला.डॉ.लहाने यांनी आणखी दोन नियुक्ती केल्या होत्या. धुळ्याचे प्रा.जयप्रकाश रामानंद यांची गजभिये यांच्या जागेवर कोल्हापूर येथे बदली तर अहमदनगरच्या डॉ.पल्लवी सापळे यांची धुळ्याच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली. गजभिये या रविवारी नाशिकपर्यंत आल्या आणि त्यांना निरोप मिळाला की, जळगावला जाऊ नका. त्या तिथून परत फिरल्या आणि कोल्हापूरच्या अधिष्ठाता म्हणून पूर्ववत काम पाहू लागल्या. डॉ.सापळे धुळ्यात रुजू झाल्या. रजेवर गेलेले डॉ.भास्कर खैरे पूर्ववत रुजू झाले. प्रा.रामानंद हे कोल्हापूरहून धुळ्यात परतले.खैरे यांची बदलीची मागणी उघडपणे झाली आणि त्याचे श्रेयदेखील घेतले गेले. पालकमंत्री गुुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरोग्य सल्लागार समितीच्या बैठकीत शिवसेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य सेवेतील त्रुटींवर बोट ठेवत अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सकांमधील वादामुळे सेवेवर परिणाम होत असल्याची टीका केली. राष्टÑवादी काँग्रेसचे विनोद देशमुख, अभिषेक पाटील, योगेश देसले यांनी अजित पवार, शरद पवार, राजेश टोपे यांच्याकडे तक्रारी केल्या. अधिष्ठात्यांच्या बदलीची मागणी केली. स्वाभाविकपणे बदलीचे श्रेय त्यांना जाते.आता गजभिये यांना रोखले कोणी हा कळीचा प्रश्न आहे. कोल्हापूरकरांना गजभिये हवे होते, रामानंद नको होते, म्हणून त्यांनी हा मुद्दा प्रभावीपणे मांडत बदली रद्द करुन घेतली. कोल्हापूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा आणि चांगला अधिकारी यासाठी अपवाद वगळता सगळे लोकप्रतिनिधी एकत्र आले. जळगावात मात्र उलटे चित्र दिसले. गजभिये आले नाही, खैरे कायम राहिले, यासंदर्भात मागणी करणारे, श्रेय घेणारे आता मौन बाळगून आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तर हा विषय आपल्याला माहित नसल्याचे म्हणत हात वर केले. ज्यांनी बदली केली, ते डॉ.तात्याराव लहाने यांनीही या बदली नाट्यातून अंग काढून तुम्ही अधिष्ठात्यांनाच विचारा असे वक्तव्य केले.अधिष्ठात्यांचा विषय असताना त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना माहिती नाही, ज्यांनी बदलीचे आदेश काढले, ते मोकळेपणाने बोलत नाही, म्हटल्यावर संशयाचा धूर येतोच. काही तरी घडले आहे. राजकीय आणि आरोग्य क्षेत्रात कानोसा घेतला हे सगळे नाट्य घडविण्यात कोल्हापूरकरांबरोबर जळगावच्या विरोधी पक्षाच्या माजी मंत्र्याचा मोलाचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. प्रशासकीय यंत्रणेशी जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या या माजी मंत्र्याने खैरे आणि प्रशासनाची बाजू मांडल्याचे कळते. मालेगावला कोरोनाचा प्रकोप होताच तेथे अपर जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, महापालिका आयुक्त अशा सगळ्यांच्या एकदम बदल्या केल्या. त्याच आधारावर जळगावला ही मागणी झाली. पण मालेगावप्रमाणे हा प्रकोप नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. बदली केल्यास नव्या अधिकाºयाला परिस्थिती समजून घेण्यात वेळ लागेल, असा युक्तीवाद पटल्याने खैरे यांची खूर्ची शाबूत राहिली, असे एकंदरीत चित्र आहे.महाविकास आघाडीत शिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेस या तीन पक्षांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात मात्र या तीन पक्षांमध्ये अजिबात समन्वय नाही. खैरे यांची खूर्ची अस्थिर करण्याचा जो प्रयत्न झाला, त्याला वरिष्ठ पातळीवर सुरुवातीला प्रतिसाद मिळाला, पण वस्तुस्थितीची जाणीव होताच बदली रद्द झाली. हा इशारा आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांसाठी आहे. पूर्वीसारखे राजकारण आता चालणार नाही. सुसंवाद, समन्वयाने सरकार चालविण्याची भूमिका शरद पवार, उध्दव ठाकरे व सोनिया-राहूल गांधी यांची आहे. त्यामुळे पुन्हा असा प्रयत्न होणार नाही, अशी अपेक्षा बाळगूया.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव