शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव कोणत्या दिशेने चाललेय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 22:22 IST

- मिलिंद कुलकर्णी जळगावातील गेल्या काही दिवसांमधील घटना बघीतल्यानंतर सर्वसामान्य नागरिकाला चिंता वाटते आहे. सर्वच क्षेत्रातील मंडळी भयग्रस्त आहेत. ...

- मिलिंद कुलकर्णी
जळगावातील गेल्या काही दिवसांमधील घटना बघीतल्यानंतर सर्वसामान्य नागरिकाला चिंता वाटते आहे. सर्वच क्षेत्रातील मंडळी भयग्रस्त आहेत. कारण मातब्बर मंडळींविषयीच्या या घटना आश्चर्यकारक आणि अनाकलनीय अशाच आहेत. उघडपणे कोणीही बोलत नाही, पण कुजबूज मात्र वेगाने सुरु आहे. दबलेल्या आवाजाचा परिणाम किती होतो माहित नाही, मात्र जळगाव बदलतंय यावर बहुतेकांचे एकमत होत आहे.
गोरजाबाई जिमखान्यात सर्वसामान्य माणूस फारसा जात नाही. त्यामुळे तिथे काय चालते, याची त्याला माहिती नाही. माजी महापौर ललित कोल्हे यांनी बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांना त्याच जिमखान्याच्या परिसरात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला. पोलिस कर्मचाऱ्यांनी मारहाणीच्या घटनेनंतर तेथे भेट देऊन पाहणी केली. पहिल्यांदा जिमखान्यातील छायाचित्रे वर्तमानपत्रात प्रसिध्द झाली. सोशल क्लब म्हणून नोंदणी झालेला हा जिमखाना १९१६ मध्ये तत्कालीन ब्रिटीश जिल्हाधिकारी सिमकॉक्स याने स्थापन केला होता. समाजातील प्रतिष्ठित मंडळी त्याचे सभासद आहेत. ललित कोल्हे यांचे वडील माजी नगरसेवक विजय कोल्हे हे त्या जिमखान्याचे अध्यक्ष आहेत. त्याठिकाणी ही घटना घडली. सीसीटीव्ही फूटेजमध्ये हाणामारी कैद झाल्याने त्याचा डीव्हीआर गायब झाला होता. दुसºया दिवशी त्याच परिसरातील झुडपांमध्ये तो आढळला. साहित्या आणि कोल्हे यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. पैशांच्या देवाणघेवाणीचा विषय असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. साहित्या हे अधिक उपचारासाठी मुंबईला रवाना झाले असून भाजपचे मनपातील सभागृह नेते असलेले कोल्हे फरार आहेत. साहित्या आणि कोल्हे हे पूर्वी एकमेकांचे मित्र होते. अचानक वितुष्ट येण्याचे कारण काय याविषयी कुजबूज आहेच.
दुसरी घटना तर माणुसकीला काळीमा फासणारी आहे. मकरसंक्रांतीच्या सणाला एकमेकांना तीळगुळ देऊन ‘तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणून कटुता विसरण्याचा अनोखा संदेश दिला जातो. भारतीय संस्कृतीमधील गोडवा या सणाने अधोरेखित होतो. मात्र एका महिलेच्या जीवनात हा दिवस भयप्रद ठरला. घर भाड्याने हवे आहे, म्हणत घरी आलेल्या दोन पुरुष आणि एका महिलेने या घरमालक महिलेला विवस्त्र करीत बांधून ठेवले. मोबाईलमध्ये छायाचित्रे काढून वाच्यता केल्यास व्हायरल करण्याची धमकी दिली. रोकड, सोन्याचे दागिने आणि प्रॉपर्टीशी संबंधित स्टॅम्प पेपर लांबविले. सणाच्या दिवशी भर दुपारी भरवस्तीत हा प्रकार घडतो हेच मुळी धक्कादायक आहे. अपार्टमेंट संस्कृती अजून जळगावात रुळलेली नसताना हे घडणे म्हणजे भयसूचक घंटा आहे. महानगरांमधील गुन्हेगारी जळगावकरांच्या उंबरठ्यापाशी तर आली नाही ना, असा प्रश्न पडतो. पोलिसांना या प्रकरणातही अद्याप छडा लागलेला नाही. मात्र आरोपींच्या संवादातील मालमत्ता हडपण्याचा उल्लेख आणि स्टॅम्प पेपरची चोरी हे विषय कळीचे ठरु शकतात.
पत्रकाराला समाजाचे जागल्या म्हणून मानले जाते. नुकतेच ६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा करताना पत्रकारांना पुन्हा एकदा या असिधारा व्रताची आठवण करुन देण्यात आली. व्रत की व्यवसाय अशी मतभिन्नता असली तरी हे क्षेत्र आमुलाग्र बदलत आहे, हे मान्य करायला हवे. जळगावातील पत्रकार प्रमोद बºहाटे यांच्याविरुध्द खंडणी मागितल्याचा दाखल झालेला गुन्हा, अटक आणि पाच लाख रुपयांची मागणी करतानाचा व्हारयल झालेला व्हीडीओ धक्कादायक आहे. वाळू व्यावसायिक अजय बढे यांनी तक्रार केली आणि दुसºया दिवशी पत्रकार परिषद घेऊन आणखी आरोप केले. पाचोºयाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे आणि तहसीलदार कैलास तावडे यांची नावे तक्रारीत आहेत. पोलीस अधिकारी त्यांनाही चौकशीसाठी बोलाविणार आहे. वाळू व्यवसायाचे अर्थकारण आणि त्याच्याशी आता पत्रकाराचे जोडलेले गेलेले नाव हा विषय गंभीर असाच आहे.
केळी, कापूस आणि कवितेचे गाव, सांस्कृतिक गाव, केशवसूत-बालकवी-बहिणाबाई-महानोरांसारख्या कवींचे गाव, बालगंधर्वाचा पुनीत स्पर्श झालेले गाव, दाल उद्योग, पाईप उद्योग, सुवर्णबाजाराने दिलेली वेगळी ओळख, वांग्याचे भरीत, मेहरुणची बोरे ही वैशिष्टये, या सगळ्यांचा अभिमान बाळगत असणाºया आम्हा जळगावकरांना पुन्हा एकदा बदनामीच्या, गुन्हेगारीच्या कालखंडाकडे जावे लागणार आहे का, असा अस्वस्थ प्रश्न भेडसावत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव