शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंचे काय चुकले?

By admin | Updated: April 4, 2016 22:00 IST

गावात रस्ता नाही, शाळा आहे; पण मुलाना बसायला जागा नाही. विहीर आहे; पण पाणी नाही. तलाठी थांबायला तयार नाही. शाळा सुटली की मुलांपेक्षा गुरुजींनाच घर गाठायची घाई.

गावात रस्ता नाही, शाळा आहे; पण मुलाना बसायला जागा नाही. विहीर आहे; पण पाणी नाही. तलाठी थांबायला तयार नाही. शाळा सुटली की मुलांपेक्षा गुरुजींनाच घर गाठायची घाई. गावातले आरोग्य केंद्र नावापुरते. डॉक्टर व नर्स दोघांचेही सोबतच अप-डाऊन. गावातले रुग्ण कोंडवाड्यातल्या गाईबैलांसारखे. गावातलाच बेरोजगार तरुण सकाळी दवाखाना उघडतो; झाडलोट करतो; रुग्णांना औषध-पाणी मलमपट्टी तोच करतो. काही दिवसानंतर लोक त्यालाच डॉक्टर म्हणून हाक मारतात व मनातला राग गिळून टाकतात. समस्या कायम आहेत. पूर्वीच्या पिढीने भोगले तेच आपल्या वाट्याला आले आहे. सरकारी बाबूंचे पोट शेण खाल्ल्याशिवाय भरत नाही. तहसील कार्यालय ते मंत्रालय असा हा खाबूगिरीचा उद्वेगजनक प्रवास पण आपली तक्रार नाही की खळखळ नाही.अशातच मग एखादा बच्चू कडू भ्रष्ट बाबूच्या कानफटात मारतो. बाबूचे सगेसोयरे झुंडीने येतात, काम बंद करतात. बच्चू कडूंना अटक होते. तरीही आपण शांत आणि षंढ. ज्याने पैसे खाण्यासाठी काम अडवून ठेवलेले असते, त्या बाबूवर सरकार कारवाई करीत नाही. उलट ज्या अपंग कर्मचाऱ्याच्या मदतीसाठी बच्चू कडू धावून जातात, त्यालाच निलंबित केले जाते. हा कुठला न्याय, असा साधा जाबही विचारण्याचे धारिष्ट्यही आपल्यात राहात नाही. समाज म्हणून आपला आत्मा हरवत चाललाय आणि नागरिक म्हणून आपल्याला आपल्याच कर्तव्यांचा विसर पडला आहे. कामे होत नाहीत म्हणून आपण लोकप्रतिनिधींना शिव्या घालतो. पण याच कामांची फाईल दाबून ठेवलेल्या सरकारी बाबूंची आपण कधी कानउघाडणी करीत नाही. टेबलाखालून पैसे सरकवायचे व आपले काम काढून घ्यायचे हेच आपले नागरिकत्व. त्यामुळे पैसे दिल्याशिवाय काम होत नाही व ते घेतल्याशिवाय काम करायचे नाही हा भ्रष्ट आचार समाजाच्या आणि व्यवस्थेच्या कधीचाच अंगवळणी पडला आहे. ही भ्रष्ट व्यवस्था नामशेष करू पाहणारा बच्चू कडूंसारखा लोकप्रतिनिधी मात्र अशा वर्तमानात गुन्हेगार ठरतो.बच्चू कडूंनी केलेल्या मारहाणीचे इथे अजिबात समर्थन करायचे नाही. पण जनतेच्या प्रश्नांबद्दल संवेदनशील असलेल्या या आमदाराला असे आक्रमक पाऊल का उचलावे लागले, या प्रश्नाचा विचार सरकारने, चॅनेलवर मोफत सल्ले देणाऱ्या नवविचारवंतांनी करू नये का? कायदे मंडळातील एक ज्येष्ठ सदस्य कायदा हातात घेतो तेव्हा त्याची हतबलता या भ्रष्ट व्यवस्थेतील तकलादूपण अधोरेखित करीत नाही का? बच्चू कडू हे गुंड नाहीत, ते वाळूमाफियाही नाहीत. अंध, अपंगांना मदत आणि गरीब रुग्णांची सेवा हाच त्यांच्या आयुष्याचा स्थायीभाव आहे. दादरच्या गाडगेबाबा धर्मशाळेत वेदनांनी विव्हळत असलेल्या कॅन्सरग्रस्तांसोबत रात्रभर जागणारा हा कार्यकर्ता आहे. कधी काळी बहिरमची यात्रा वेश्याव्यवसायासाठी बदनाम होती. हा देहविक्रय बंद करून आज तिथे महिलांना स्वावलंबन आणि स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते. या चमत्काराचे सारे श्रेय गाडगेबाबांच्या या वारसदाराला जाते. आपल्या लग्नात अवाजवी खर्च टाळून अपंगांना मदत करणाऱ्या या लोकप्रतिनिधीला एखाद्या अडल्या-नडल्याच्या न्यायासाठी बाबूंच्या विनवण्या कराव्या लागत असतील तर त्यांनी शेवटी करावे तरी काय? बच्चू कडूंच्या विरोधात मंत्रालयातील सारे अधिकारी, कर्मचारी एकवटतात. लोकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अशी एकजूट कधी दिसत नाही. मुख्यमंत्रीदेखील ‘अधिकारी माझे ऐकत नाही, काय करू?’ अशी व्यथा जाहीरपणे व्यक्त करतात. आपले कुणीच काही बिघडवू शकत नाही, हा माज त्यांच्यात आला आहे. याच लालफितीने त्रस्त होऊन माधव कदम हा मराठवाड्यातला गरीब शेतकरी मंत्रालयासमोर आत्महत्त्या करतो. तरी या कोडग्यांना त्याचे काहीच वाटत नाही. बच्चू कडूंनी केलेली मारहाण हे लोकक्षोभाचे प्रातिनिधिक रूप आहे. सरकारी बाबू सुधारले नाहीत तर हा वणवा मंत्रालयातून थेट तहसील कार्यालयांपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. - गजानन जानभोर