शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

फलित काय?

By admin | Updated: December 3, 2015 03:29 IST

हवामानातील बदलांना कारणीभूत ठरणाऱ्या मानवी योगदानावर कायदेशीर निर्बंध लादणे आणि जगातील तमाम देशांमध्ये हवामानासंदर्भात करार घडवून आणणे, या हेतुने पॅरीस

हवामानातील बदलांना कारणीभूत ठरणाऱ्या मानवी योगदानावर कायदेशीर निर्बंध लादणे आणि जगातील तमाम देशांमध्ये हवामानासंदर्भात करार घडवून आणणे, या हेतुने पॅरीस येथे आयोजित आणि उद्याअखेर चालणाऱ्या पाच दिवसीय वार्षिक जागतिक परिषदेत हा हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने फारसे काही होणार नाही याची साऱ्यांना अगोदरपासूनच कल्पना होती. वास्तविक भारत व चीनसारख्या बड्या विकसनशील देशांनी आतापर्यंतच्या परिषदांमधील भूमिकेशी फारकत घेत, हरितगृह वायू उत्सर्जनात भरीव कपात करण्याचे आश्वासन दिले आहे. जागतिक तपमानवाढ हे विकसित देशांनी अधाशीपणे केलेल्या इंधन वापराचे अपत्य आहे आणि त्यामुळे तपमानवाढ कमी करण्यासाठी, आम्ही आमच्या विकासाच्या स्वप्नांना मुरड घालून, हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणार नाही, अशी भूमिका विकसनशील देश आजपर्यंत घेत आले होते. विकसनशील देशांची ती भूमिका अजिबात चुकीची नव्हती. तरीदेखील जागतिक तपमानवाढीचे गांभीर्य लक्षात घेऊन, या देशांनी आपल्या भूमिकेला मुरड घातली आहे. भारताने आपल्या कर्बाम्ल वायू उत्सर्जनात, २०३० पर्यंत ३३ ते ३५ टक्क्यांनी कपात करण्याची तयारी दर्शविली आहे. इंडोनेशियाने २९ टक्क्यांच्या कपातीची तयारी दर्शविली आहे, तर चीनने २००५ च्या तुलनेत तब्बल ६० ते ६५ टक्क्यांची कपात करण्यास सहमती दिली आहे. इथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे, की विकसनशील देशांनी हरितगृह वायू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वच वायूंच्या उत्सर्जनात नव्हे, तर केवळ कर्बाम्ल वायूच्या उत्सर्जनात एवढी मोठी कपात करण्याची तयारी दाखविली आहे. याउलट विकसित देश सर्वच प्रकारच्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात कपात करणार आहेत. एवढी मोठी कपात झाल्यानंतर जागतिक तपमानवाढीस सहज पायबंद बसेल, असे जर कुणाला वाटत असेल, तर ते काही खरे नाही. त्यामागचे कारण हे आहे, की ही जी कपात करावयाची आहे, ती सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेतील उत्सर्र्जनाच्या प्रमाणात करायची आहे. सध्याच्या घडीला भारत व चीनच्या अर्थव्यवस्था सात ते आठ टक्क्यांच्या दराने वाढत आहेत आणि आगामी काही वर्षे तरी वाढीचे हे प्रमाण साधारण याच पातळीवर राहण्याची अपेक्षा आहे. परिणामी कर्बाम्ल वायू उत्सर्जनात प्रत्यक्षात वाढच होणार आहे; कारण विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांचा आकार २००५ च्या तुलनेत, २०३० मध्ये किमान सात ते आठ पट झालेला असेल. एकूण काय, तर या कपातीची गत, ‘आबा मेला अन् नातू झाला’ या वऱ्हाडी भाषेतील म्हणीसारखीच होण्याची दाट शक्यता आहे.