शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वीरश्रीची इतिश्री!

By admin | Updated: January 6, 2016 23:18 IST

आपल्या अंगावर येणारा प्रत्येक वार झेलण्याची आणि त्यात आपला हुतात्मा झाला तरी ते हौतात्म्य पत्करण्याची राणा भीमदेवी थाटातील गर्जना करणाऱ्या श्रीपाल सबनीस

आपल्या अंगावर येणारा प्रत्येक वार झेलण्याची आणि त्यात आपला हुतात्मा झाला तरी ते हौतात्म्य पत्करण्याची राणा भीमदेवी थाटातील गर्जना करणाऱ्या श्रीपाल सबनीस यांच्यातील या वीरश्रीची (अरेरे) अवघ्या काही तासातच इतिश्री झाल्याने साऱ्या सारस्वतपुत्रांना मोठा धक्का बसला असण्याची शक्यता आहे. आपल्याती वीरश्रीचा लोप पावल्यामुळेच की काय सबनीसांनी पुणे पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आणि पोलिसांनीही ती मोठ्या उदार अंत:करणाने मान्य केली. तसे करताना पोलिसांनी सुरÞक्षा व्यवस्थेचा कोणता दर्जा सबनीसांना देऊ केला हे मात्र कळावयास मार्ग नसल्याने पिंपरी-चिंचवडातील साहित्य संमेलनप्रसंगी संमेलनाध्यक्षांच्या पाठीमागे भिरभिरत्या नजरेचे ‘कॅलिश्नोव्ह’धारी उभे राहातात की कार्बाईनधारी उभे राहातात की चुरगळलेल्या ‘युनिफार्मात’ले मरगळलेले साधे छडीधारी उभे राहातात याचे दर्शन योग्य वेळ येईल तेव्हांच होईल. नरेन्द्र मोदी आज भले देशाचे पंतप्रधान असले तरी कोणे एकेकाळी ते आणि श्रीपाल सबनीस गोट्या, विटीदांडू, आट्यापाट्या आणि तत्सम खेळ खेळत असत याची भाजपावाल्यांना कल्पना नसल्याने श्रीपालांनी नरेन्द्राविषयी एकेरीतले जे उद्गार काढले त्यामागे अनादराची नव्हे तर मित्रत्वाची आणि याच मित्रत्वातून उपजलेल्या आपल्या सवंगड्याच्या प्राण रक्षणाच्या चिंतेची भावना होती हे तरी त्या बिचाऱ्यांना काय ठाऊक असणार? त्यामुळे त्यांना सबनीसांचा बरीक झणका आला आणि त्यांनी त्यांचे चरण कलम करण्याची धमकी दिली. खरे तर त्यात या चरणांचा काय दोष? आक्षेप नरेन्द्रभाईंबद्दल काढलेल्या लागट उद्गारांना होता ना, मग हे उद्गार ज्या जिव्हेतून बाहेर पडले ती जीभ हासडण्याची वगैरे धमकी दिली असती तर जरा मित्रपक्षालाही बरे वाटून गेले असते. पण येताजाता ‘पाय लागू’ संस्कृतीचा भाजपात प्रादुर्भाव झालेला असल्याने लक्ष जिभेकडे न जाता ते पायांकडे गेले असावे. तसेही त्या ऱ्हाळातले भाजपाचे नवजात खासदार अमर साबळे यांच्या मनीध्यानी नसताना त्यांच्या हाती पक्षाने खासदारकीचे घबाड ठेवल्याने अचानकपणे व अनपेक्षितपणे केल्या गेलेल्या या उपकाराची परतफेड करण्यासाठी किंवा गेला बाजार तसे करतो आहोत असे दाखविण्यासाठी अमरभाऊंना ज्या संधीचा शोध होता ती अनायसेच सापडून गेली. पण त्यांच्या या संधीवर आता त्यांच्याच पक्षाचे सरकार विरजण टाकील असा रंग आहे. तथापि सबनीसांचे एकूण रंग बघितल्यानंतर पाव शतकांपूर्वी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी जे म्हणून ठेवले, त्याची सय येते. पोषाखी साहित्य संमेलने नष्ट होतील वा व्हावीत असे ते म्हणाले होते. रोख त्यांचा उधळपट्टीवर होता. पण सालागणिक अध्यक्षपदाची रया संपत जाईल व त्या पदाचे पोतेरे करणारे लोक उदयास येतील असेही काही तर त्यांना अभिप्रेत नव्हते?