शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लाल दिवा गेला तरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 01:35 IST

मंत्र्यांच्या वाहनांवर लाल दिवा लावण्याची ब्रिटिशकालीन पद्धत मोडीत काढून केंद्रातील मोदी सरकारने ‘व्हीआयपी’ संस्कृतीला चाप लावला.

मंत्र्यांच्या वाहनांवर लाल दिवा लावण्याची ब्रिटिशकालीन पद्धत मोडीत काढून केंद्रातील मोदी सरकारने ‘व्हीआयपी’ संस्कृतीला चाप लावला. यापुढे केवळ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि सरन्यायाधीशांच्या वाहनांवर लाल दिवा असेल. लाल दिवा असलेल्या गाडीत बसणे, हे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठीच अनेकजण राजकारणात उतरतात. देश पारतंत्र्यात असताना स्वराज्यासाठी प्राणार्पणास तयार असलेली पिढी होती, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतलेली नेतेमंडळी होती. तो काळ गेला. हल्ली डोईवर लाल दिवा असलेली नवी सरंजामशाही उदयास आली आहे. काही अपवाद वगळता लाल दिव्याच्या गाडीत बसणाऱ्यांचे पाय जमिनीवर नसतात. स्वत:ला ते इतरांहून वेगळे समजतात. लोकसेवक म्हणून ज्यांना निवडून दिले, ते लाल दिव्याच्या गाडीत बसताच स्वत:ला महनीय वगैरे समजू लागतात. आजकाल तर महापौर, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आणि महामंडळ अध्यक्षांच्या वाहनांवरही लाल दिवा आला होता. त्यातूनच नवी व्हीआयपी संस्कृती उदयाला आली. केवळ लाल दिवा गेल्याने ही संस्कृती संपणार नाही. मंत्र्यांच्या गाडीवरील लाल दिवे गेले; पण गाड्यांच्या ताफ्याचे काय? गरज नसताना एकेका मंत्र्यासोबत दहा-पंधरा गाड्यांचा ताफा धुरळा उडवित असतो. जनतेच्या पैशाची, इंधनाची नासाडी होतेच; शिवाय, वाहतूक नियमांची सर्रास पायमल्लीदेखील होते. मागे एकदा राज्यातील एका ज्येष्ठ मंत्र्यांकडे आठ खात्यांचा पदभार होता. ते महाशय आठही गाड्यांवर लाल दिवा लावून फिरत असत ! शिवाय, कार्यकर्त्यांचे लोढणावळ वेगळेच. कशाला हवीत एवढी वाहने? जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्र्यांना ‘गार्ड आॅफ आॅनर’, ही अशीच आणखी एक ‘व्हीआयपी’ संस्कृतीची प्रथा. इंग्रजांपासून चालत आलेली. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे, ही पोलिसांची मुख्य जबाबदारी. पण हल्ली ते नको त्यांना ‘सॅल्युट’ ठोकण्याच्या ड्यूटीवर असतात. त्यामुळे केवळ गाड्यांवरील लाल दिवा काढल्याने व्हीआयपी संस्कृती संपुष्टात येणार नाही. त्यासाठी एकूण व्यवस्थेतच आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. शिवाय, देशात अनेक समस्या असताना आणि जम्मू-कश्मीर धुमसत असताना लाल दिव्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आणि पंतप्रधानांनी वेळ खर्च करणे देशाला परवडणारे नाही. अशा निर्णयांनी तात्पुरती लोकप्रियता मिळेलही, परंतु तोपर्यंत मूलभूत प्रश्न हाताबाहेर गेलेले असतील. हा निर्णय आदेश काढूनही जाहीर करता आला असता. पण अशा गोष्टींचे श्रेय घेण्यात वाकबगार असलेली मंडळी ही संधी कशी दवडणार ! आता या निर्णयाचेही राजकारण होत आहे. आमचे बघूनच केंद्र सरकारला हे सुचले, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे अमरिंदर सिंह यांनी केला आहे. तात्पर्य काय, तर लाल दिवा गेला तरी मानसिकता कायम आहे!