शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

म्हणूनच चावटपणा

By admin | Updated: April 4, 2016 02:34 IST

संपूर्ण विश्वच आज दहशतवादाच्या सावटाखाली सापडलेले असताना योगायोगाने चीनला अद्याप त्याचा उपसर्ग पोहोचलेला नसल्याने आणि भारतावर वचक निर्माण करण्यासाठी पाकिस्तानला कुरवाळणे

संपूर्ण विश्वच आज दहशतवादाच्या सावटाखाली सापडलेले असताना योगायोगाने चीनला अद्याप त्याचा उपसर्ग पोहोचलेला नसल्याने आणि भारतावर वचक निर्माण करण्यासाठी पाकिस्तानला कुरवाळणे त्या देशाला गरजेचे वाटत असल्याने तो देश वारंवार असा चावटपणा करीत असला पाहिजे. पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर अलीकडेच झालेल्या घातपाती हल्ल्याचे कारस्थान जैश-ए-मुहम्मद या पाकिस्तानातील अतिरेकी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर यानेच घडवून आणल्याचे ठोस पुरावे भारतापाशी आहेत. भारतात याआधी झालेल्याही अशाच अनेक घातपाती कृत्यांचे पितृत्वदेखील त्याच्याचकडे जाते. परिणामी संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) जशी ‘जैशे’वर आंतरराष्ट्रीय बंदी लादली आहे, तशीच ती मसूदवरदेखील लादावी असा प्रस्ताव भारताने या संघटनेकडे पाठविला होता. संघटनेच्या सुरक्षा समितीच्या पाच कायम सदस्य देशांपैकी चौघांचा या प्रस्तावाला पाठिंबा असताना, चीनने आपल्या नकाराधिकाराचा वापर करून युनोला याबाबतचा निर्णय लांबणीवर टाकण्यास भाग पाडले. सुरक्षा समितीच्या स्थायी सदस्यांमध्ये भारताचा समावेश केला जाण्यास पुन्हा चीनच विरोध करीत असून, त्यामागेही त्या देशाचे पाकला कुरवाळणे हेच कारण आहे. अन्यथा चीनला मसूद अझरचा पुळका येण्याचे काहीच कारण नाही. बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्स शहरावर गेल्या पंधरवड्यात जो भीषण घातपाती हल्ला झाला त्यानंतर लगेचच भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी तिथे पोहोचले आणि त्यावेळी बोलताना त्यांनी युनोवर सडकून टीका केली. अतिरेकी आणि घातपाती कारवायांचे गांभीर्य अद्याप युनोच्या लक्षातच आलेले नाही असे ते म्हणाले. युनोवर वरचष्मा असलेल्या अमेरिकेत ९/११ होईपर्यंत भारतात होत असलेल्या घातपाती कारवाया म्हणजे साधा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे अशीच अमेरिकेची आणि म्हणून युनोची धारणा होती. पंतप्रधानांचा हा युक्तिवाद अंमळ सैल करायचा तर जोवर खुद्द चीनला अतिरेकी कारवायांचे चटके बसत नाहीत तोवर तो देशही असाच चावटपणा करीत राहील हे गृहीत धरायचे.