शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

ना नेता, ना नीती, ना नारा! काँग्रेसचा नन्नाचा पाढा?; स्वबळावर बहुमत मिळवणं अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 6:04 AM

या निवडणुकीत काँग्रेस कमी जागा लढवत आहे, याचे कारण एकच करिश्मा असलेला नेता, सुस्पष्ट नारा आणि नेमकी नीती नसणे!

 प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार 

अज्ञान आणि आत्मविश्वास, ही यशाची गुरुकिल्ली आहे, असे मार्क ट्वेन म्हणाला होता. १३९ वर्षांच्या  काँग्रेसची आजची स्थिती पाहताना मार्क ट्वेनचे हे वाक्य आठवते. आता या पक्षाने एक नवी धारणा पुढे आणली आहे- किमान हेच नवसिद्ध कमाल होय! त्यांचा नवा निवडणूक मंत्र आहे : “विश्वासपूर्वक थोड्याच जागा लढवा आणि घवघवीत यश मिळवा.”  काँग्रेस पहिल्यांदाच  लोकसभेसाठी ३३० पेक्षाही कमी उमेदवार उभे करत आहे. स्वबळावर बहुमत मिळवणे आपल्याला शक्य नसल्याची ही कबुलीच नव्हे काय? 

आज हा पक्ष घराणेशाही, पराभवांची मालिका, पक्षांतरे आणि वास्तवाचा अस्वीकार, यामुळे पोखरला जात आहे.  वीस- तीस वर्षांपूर्वीपर्यंत एकेका मतदारसंघात पंचवीस- तीस लोक काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी जीव पाखडत असत. आज दोनेकशे मतदारसंघांत जिंकण्याजोगा एक उमेदवार मिळणेही मुश्कील झाले आहे. इंडिया आघाडीच्या संदिग्ध आणि वैचारिकदृष्ट्या डळमळत्या प्रवासात मित्रपक्षांच्या कुबड्या घेऊन पुढे जाताना काँग्रेस संकटमोचनाची आकांक्षा बाळगत आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात काँग्रेसने मित्रपक्षांसाठी जागा सोडल्या, त्या निव्वळ नाइलाज म्हणून, औदार्याने नव्हे. आपली प्रासंगिकता शाबूत राहावी आणि एकेकटे लढून आपण एरवी हरलो असतो, त्या जागा जिंकता याव्यात यासाठी समविचारी पक्षांशी हातमिळवणी करण्याचे हे मूळ धोरण डाव्यांचे. काँग्रेसने त्यांचाच कित्ता गिरवला.

निवडणुकीतील आपला किमान आधार शाबूत राखण्यासाठी काँग्रेस अखिलेश यादव, तेजस्वी यादव, स्टॅलिन, केजरीवाल आणि इतर मंडळींवर अवलंबून आहे. तथापि, उत्तरेकडील इतर राज्यांत तसेच कर्नाटकात काँग्रेसने मित्रपक्षांबाबत फारसे औदार्य मुळीच दाखवलेले नाही. मतांची टक्केवारी कितीही कमी झाली तरी चालेल; पण लढलेल्यांतील जास्तीत जास्त जागा जिंकायच्या, हे त्यांचे उद्दिष्ट आहे. अनेक राज्यांत आपण नावालाच उरलो आहोत, तेथील मतदारांची आपल्याला पसंती नाही, हे काँग्रेसच्या लक्षात आलेले नाही. या निवडणुकीत काँग्रेस कमी जागा लढवत आहे, याचे  कारण एकच : करिश्मा असलेला नेता, नारा आणि नीती नसणे! गेल्या चार दशकांत पक्षाच्या नेतृत्वनिर्माण क्षमतेचा ऱ्हास होत जाताना दिसतो.  इंदिरा गांधी यांनी ख्रिश्चन, दलित, आदिवासी, अल्पसंख्य, उच्चवर्णीय, उच्चवर्गीय, अशा सर्वांच्या संमिश्र सामाजिक इंद्रधनुष्याचे स्वरूप आपल्या पक्षाला प्राप्त करून दिले होते. त्यांच्यानंतर राजीव, सोनिया किंवा राहुल यांच्यापैकी कुणीच पक्षाचे ते वलय पुन्हा प्राप्त करू शकलेले नाहीत.

इंदिराजींच्या हत्येमुळे १९८४ साली राजीव गांधींच्या बाजूने उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसला लोकसभेत ४०० हून अधिक अशा विक्रमी जागा मिळाल्या. मात्र, १९८९ साली राजीव यांना सलग दुसरा विजय काही मिळवता आला नाही. राजीव यांच्या भीषण हत्येनंतर १९९१ साली नरसिंहरावांनी कसेबसे अल्पमतातील सरकार पूर्ण पाच वर्षे चालवले. १९९६ ला काँग्रेसची अधिकच मानहानी झाली. पुढे १९९८ साली सीताराम केसरी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला केवळ १४१ जागाच मिळाल्या. त्यानंतर सोनिया गांधी अध्यक्ष बनल्या. १९९९ साली ४५३ मधील केवळ ११४ लोक निवडून आले; परंतु सोनियांच्या अंगी युती घडवण्याचे आणि टिकवण्याचे एक सुप्त कौशल्य होते. त्यांच्या या कौशल्यामुळे २००४ साली वाजपेयी सरकारचा पराभव झाला. त्यावेळी काँग्रेसचे ४१७ पैकी १४५ उमेदवार निवडून आले.

२००९ साली अडवाणी यांच्यासारख्या दमदार व्यक्तित्वाविरोधात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने चमकदार कामगिरी केली. त्यांच्या ४४० पैकी २०६ उमेदवारांनी लोकसभा गाठली.त्यानंतर काँग्रेसची घसरण सुरूच आहे. बहुतेक ज्येष्ठ नेते पक्ष सोडून जात आहेत. नरेंद्र मोदींच्या आगमनानंतर काँग्रेसची अवस्था बिकट झाली. २०१४ मध्ये लोकसभेतील सदस्यसंख्या ५०च्याही खाली गेली. अधिकृत विरोधी पक्षाचे स्थानही त्याने गमावले. २०१९ मध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अल्पशी सुधारणा होऊन आकडा ५२ वर गेला. राजकारणात येऊन वीस वर्षे झाली तरी राहुल अद्याप राष्ट्रीय किंवा पक्षीय पातळीवर पूर्णपणे स्वीकारले गेलेले नाहीत. दोन यशस्वी राजकीय यात्रांमुळे त्यांची लोकप्रियता वाढली हे खरे! लोकप्रियतेच्या बाबतीत मोदी आणि राहुल यांच्यातील अंतर काही प्रमाणात कमी झाले; पण राहुल यांच्यासाठी पल्ला अजून लांबचा आहे.

काँग्रेसकडे मनुष्यबळ, बाहुबळ आणि धनाची कमतरता आहे. सरकारने त्यांची बँकेतील खाती गोठवली आहेत. २०२४ ची निवडणूक म्हणजे आज अधिकाधिक यश मिळवून आगामी युद्धानंतर मस्तकी धारण करावयाच्या राजमुकुटाचा दावा अबाधित राखायचा यासाठी करावयाची एक छोटी लढाई आहे. आपल्यातील दोष काँग्रेसने स्वीकारले, तर देशाच्या गावशहरातील वास्तवाचे आत्मविश्वासपूर्ण भान पक्षाला येऊ शकेल... मग यश दूर असणार नाही.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी