शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

पैशाचे तोबरे भरून सत्तेशी मतलब ! - लोकशाही गेली उडत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 08:03 IST

प्रत्येक आमदार विक्रीस उपलब्ध आहे. योग्य किंमत किंवा अन्य मोबदला दिला तर तो आनंदाने बाजू बदलेल, असा काही दंडकच पडला आहे की काय?

पवन वर्मा,राजकीय विषयाचे विश्लेषक

महाराष्ट्रातील अलीकडच्या घटना पाहता मला कधी कधी वाटते की घटना दुरुस्ती करून आता ‘सहलीच्या राजकारणा’ला अधिकृत मान्यता देण्याची वेळ आली आहे. संसदीय लोकशाही परिपक्व आणि तत्त्वांशी बांधलेली असावी, यासाठी घटनाकारांनी एक आराखडा तयार केला; परंतु दुर्दैवाने त्यांना पुढे काय होणार, हे कळले नसावे.  इथल्या पुढाऱ्यांनी  अनेक चुकीच्या गोष्टी अशा रीतीने मुख्य प्रवाहात आणल्या की जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या कारभाराची तीच प्रमाणभूत वैशिष्ट्ये होऊन बसली.

आमदारांना ज्या सरकारी सोयीसुविधा मिळतात, त्यातही दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. महागड्या हॉटेलमधील वास्तव्य, खासगी विमानाची सेवा आता अनिवार्य केली पाहिजे. राज्यसभेच्या निवडणुका असतील किंवा सरकार पाडायचे असेल तर या गोष्टी गरजेच्याच म्हटल्या पाहिजेत. लोकप्रतिनिधींनी संपत्तीचे जाहीर प्रदर्शन करणे गैर मानले जात होते, तो जमाना आता गेला. या ‘राजकीय सहली’तल्या त्या रिसॉर्टसवर काय काय घडते, याच्या रंजक कहाण्या कानी येतात. अतिशय मौल्यवान अशा या आमदारांच्या प्रत्येक आवडीनिवडी पुरवल्या जातात. खर्चाकडे पाहिले जात नाही. शब्दशः अर्थाने निष्ठा खरेदी केल्या जातात.

- अर्थात, सहलींचे राजकारण ही काही भाजपची मक्तेदारी नाही. याच वर्षीच्या जून महिन्यात राजस्थानमध्ये राज्यसभा निवडणुका होत असताना सत्तारूढ काँग्रेस पक्षाने त्यांच्या ७० आमदारांना उदयपूरमधल्या एका महागड्या रिसॉर्टवर नेऊन ठेवले होते. यावेळी सहलीच्या राजकारणाचे बळी ठरलेल्या उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीच्या वेळी हेच केले होते. गोव्यात मार्च २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसने आपल्या नेत्यांना उत्तर गोव्यातल्या एका रिसॉर्टवर ठेवले होते. त्याआधी दोन वर्षे बंगळुरूमध्ये काँग्रेस नेते कडेकोट बंदोबस्तात प्रेस्टीज गोल्फ क्लबवर आराम फर्मावत होते. रामकृष्ण हेगडे कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसने आपले सरकार पाडू नये म्हणून त्यांनी त्यांच्या ८० आमदारांना बंगळुरूमधल्या एका महागड्या रिसॉर्टवर ठेवले होते.

- यात काही महत्त्वाचे प्रश्न उद्भवतात. इतका बक्कळ पैसा येतो कुठून? बिले कोण भरते? करदात्यांच्या पैशातून राज्य पोलिसांनी या आमदारांना कडेकोट बंदोबस्त का पुरवायचा? महाराष्ट्रातील सत्तानाट्यात उद्धव ठाकरेंच्या छावणीतले कोणी तिकडे येऊ नये म्हणून गोवा पोलिसांनी तर महाराष्ट्राच्या सीमेवर नाकाबंदी केली होती म्हणतात. या लोकनियुक्त प्रतिनिधींना इतका बंदोबस्त देण्याची गरज काय होती? सामनेवाल्यांकडून त्यांना काही लालूच दाखवली जाऊ नये म्हणून कसेही करून कोंडून ठेवण्याइतकी त्यांची राजकीय निष्ठा पातळ होती का? प्रत्येक आमदार विक्रीस उपलब्ध आहे. योग्य किंमत किंवा अन्य मोबदला दिला तर तो आनंदाने बाजू बदलेल, असा काही दंडक पडला आहे काय? 

या आमदारांची मोट बांधण्यात ईडी, इन्कम टॅक्स आणि इतर सरकारी संस्थांची भूमिका काय होती? आणि पक्षांतर बंदी कायद्याचे काय?  महाराष्ट्रात जितक्या वेगाने जे काही घडले हे सगळे पाहून सामान्य नागरिक गोंधळला नसता तरच नवल; पण त्याला किंवा तिला यातून काय कळते? तर भारतीय लोकशाही ही एक सर्कस झाली असून, ती पैशाच्या तालावर नाचते आहे. सर्व मूल्ये खुंटीला टांगण्यात आली आहेत. शेवट काय होतो ते महत्त्वाचे. साधन शुचिता गेली उडत.  

सत्तेच्या राजकारणाने ‘आम्ही नाही बुवा त्यातले’ म्हणणारेही त्याच रांगेत येऊन बसतात. सगळीकडे पैशानेच तोबरे भरायचे असल्याने मग ते शहाण्याला दिले जातात का मूर्खाला, हे गौण ठरते. या साठमारीत आरामदायी हॉटेल्स, रिसॉर्ट आणि भाड्याने विमाने देणाऱ्या कंपन्या यांचे उखळ पांढरे होते, हे मात्र खरे.

टॅग्स :PoliticsराजकारणIndiaभारत