शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

चमकोगिरीमुळे आंदोलने भरकटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 12:44 PM

मिलिंद कुलकर्णी आंदोलन हा शब्दच मुळी मानवी भावभावना प्रकट करणारा आहे. या आयुधाचा वापर प्रत्येक देशात होत असतो. ...

मिलिंद कुलकर्णी आंदोलन हा शब्दच मुळी मानवी भावभावना प्रकट करणारा आहे. या आयुधाचा वापर प्रत्येक देशात होत असतो. स्वातंत्र्यचळवळीत त्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. आपल्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराविषयी आवाज उठविणे, प्रतिकार करण्याचे आंदोलन हे माध्यम आहे. महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, नेल्सन मंडेला यांनी या आयुधाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करुन दिले. आंदोलनांचे देखील प्रकार आहेत. गांधीजींनी त्या आयुधाचा समर्पकपणे वापर केला. सत्याग्रह, सविनय कायदेभंग अशा आंदोलनातून त्यांनी ब्रिटिश सरकारविरुध्दचा रोष जसा प्रकट केला तशीच अन्याय, अत्याचाराविषयी जनभावना तयार होईल, हेदेखील आवर्जून बघितले. आंदोलन हिंसक होऊ लागले तर गांधीजींनी ते मागेदेखील घेतल्याची उदाहरणे आहेत. वृक्षांना वाचविण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांचे चिपको आंदोलन असो की, अलीकडे अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुध्द केलेले आंदोलन असो, त्यात जनसहभाग महत्त्वाचा ठरला. आंदोलनाचे कारण हे खूप महत्त्वाचे असते. गांधीजींनी स्वातंत्र्यचळवळीविषयी जागृती निर्माण करीत असताना विदेशी कपड्यांची होळी, मिठाचे आंदोलन असे मुद्दे घेऊन जनतेच्या मनात स्फुल्लींग पेटविले. नेल्सन मंडेला यांनी वांशिक विद्वेषाविरुध्द आंदोलन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्थेविरुध्द आंदोलन करताना चवदार तळे, काळाराम मंदिराच्या प्रसंगात जनसामान्यांमधील असंतोष, अन्यायाच्या भावनेचे प्रकटीकरण केले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांच्या प्रवेशासाठी सानेगुरुजींनी आंदोलन केले. आंदोलनाचे विषय संवेदनशील, जनतेच्यादृष्टीने महत्त्वाचे असले तर त्याला जनसमर्थन मिळाल्याशिवाय राहत नाही. आंदोलनाची नेमकी वेळ, काळ निवडणे जसे महत्त्वाचे असते तसे ते थांबविणे, मागे घेण्याची वेळदेखील महत्त्वाची असते. वेगवेगळे विषय घेऊन सरकारला धारेवर धरणाºया अण्णा हजारे यांच्या धरसोडीच्या भूमिकेवर टीका झाली होती. टोल नाक्याविरोधात आंदोलन अर्धवट सोडल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर झाली होती. त्यामुळे आंदोलनाची अखेरदेखील महत्त्वाची असते. स्वातंत्र्योत्तर काळात संघटनकौशल्य असलेल्या संघटना, पक्षांनी केलेली आंदोलने गाजली. महाराष्टÑाचा विचार केला तर मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनाचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्या आंदोलनामुळे विस्थापित आदिवासींना घरे, जमिनी मिळाल्या. सरदार सरोवर धरण रोखले गेले नाही, पण आदिवासींसाठी त्या अद्याप झगडत आहेत. शरद जोशी यांचे शेतकरी आंदोलन ऐतिहासिक ठरले. कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष या सारख्या संघटनावर भर देणाºया पक्षांमध्ये आंदोलनाचे सातत्य आणि चिकाटी वाखाणण्यासारखी आहे. देशव्यापी आंदोलन प्रत्येक जिल्हाठिकाणी होणारच, भले चार कार्यकर्ते का असेना, पण आंदोलन होणारच. अलिकडे मात्र आंदोलनांमध्ये चमकोगिरीला महत्त्व प्राप्त झाले आहे. विषय बाजूला पडून नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा प्रभावी ठरत आहे. त्यातून आंदोलनाविषयी तारतम्याचे भान राहत नाही. भाजपचे अलिकडचे दूधविषयक आंदोलन टीकेचा विषय ठरले. दूध व दुधाची भुकटी याला सरकारने अनुदान द्यावे, यामागणीसाठी हे आंदोलन होते. नंदुरबारात एकही शासकीय डेअरी नाही. त्यामुळे तेथे सरकारकडून दूध विकत घेण्याचा आणि मागणीप्रमाणे अनुदानाचा विषय उद्भवत नाही. तरीही तेथे आंदोलन झाले. जळगावात जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी जिल्हा दूध संघासमोर आंदोलन केले. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अध्यक्ष असलेल्या या संघाचे संचालकपद भोळे यांच्याकडे आहे. मागणी सरकारशी संबंधित असताना दूध संघासमोर आंदोलनाचे प्रयोजन कळले नाही. माध्यमात आंदोलनस्थळ चर्चेचा विषय ठरले. कळसाध्याय ठरला तो चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याने दूध आंदोलन मागे पडून चव्हाणांविरोधात प्रतिआंदोलन सुरु झाले. मोबाईल, कॅमेरा समोर असल्यावर भल्याभल्यांची जीभ, वर्तन घसरताना सगळ्यांनी पाहिलेले आहे. अशा वर्तनाने ते टीकेचे धनी ठरले आहेत. एवढे भान बाळगले तरी आंदोलनाचा मूळ हेतू साधला जाईल.
टॅग्स :Jalgaonजळगाव