शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग खडतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 04:22 IST

अजिंठा, भोगवर्धन (भोकरदन), तगर (तेर), प्रतिष्ठान (पैठण), सिन्नर, नाणेघाट ते नालासोपारा. सातवाहनांच्या काळातील हा आंतरराष्ट्रीय मार्ग, या मार्गाने रेशमी वस्त्रे, सोने, दागिने आदींचा व्यापार परदेशाशी होत असे.

- सुधीर महाजनअजिंठा, भोगवर्धन (भोकरदन), तगर (तेर), प्रतिष्ठान (पैठण), सिन्नर, नाणेघाट ते नालासोपारा. सातवाहनांच्या काळातील हा आंतरराष्ट्रीय मार्ग, या मार्गाने रेशमी वस्त्रे, सोने, दागिने आदींचा व्यापार परदेशाशी होत असे. आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र म्हणून भोगवर्धन, प्रतिष्ठान आणि तगर ही नगरे प्रसिद्ध होती. आताच्या भाषेत आंतरराष्टÑीय व्यापार केंद्रे होती आणि हा मार्ग म्हणजे ‘इंटरनॅशनल बिझनेस कॉरिडॉर’ होता.आज मराठवाड्यातून राजधानी मुंबईकडे जाणारे रस्ते व इतर राज्यांना जोडणाऱ्या रस्त्यांकडे नजर टाकली, तर एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे मराठवाड्याला इतर राज्यांशी जोडणारे सगळेच रस्ते हे केवळ दोन पदरी आहेत. नांदेडहून हैदराबादकडे जायचे किंवा औरंगाबादहून इंदूरला जायचे म्हटले तरी रस्ते दोन पदरीच. पुण्याकडे जाणारा एकमेव चौपदरी रस्ता आहे. औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी; पण येथून मुंबईला जाण्यासाठी वैजापूर, येवला, नाशिक हा मार्ग किंवा शिर्डी, सिन्नर, ढोकी हा मार्ग हे दोन्ही खडतर, दोन पदरी, खड्डेमय आणि प्रवाशांची परीक्षा पाहणारे आहेत. तिसरा समृद्धी महामार्ग हा अजून कागदावरच आहे. नांदेड किंवा बीडहून मुंबईला जायचे म्हटले तरी औरंगाबादहूनच जावे लागते. बीड-औरंगाबाद राष्टÑीय महामार्ग क्र. २११ चे काम धिम्यागतीने चालू आहे. या मराठवाड्याचा राजधानी मुंबईशी थेट संपर्क सुलभ नाही. ही प्रमुख मार्गांची अवस्था आहे. मराठवाड्यातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था यापेक्षा वाईट. रस्ते हे जीवनवाहक असतात. ते चांगले असतील तर व्यापार-उदीम वाढतो; पण ही लाइफलाइनच खराब असल्याने बाजारपेठा भरभराटीला येत नाहीत.रेल्वेचा विचार केला, तर औरंगाबाद-नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी केवळ चार रेल्वेगाड्या. त्यांच्या वेळाही फारशा सोयीच्या नाहीत. रेल्वे डब्यांची अवस्था त्याहूनही वाईट. दिल्लीला जाण्यासाठी एकच रेल्वे. एवढ्या तुटपुंज्या रेल्वेसेवेने विकासाला कोणता हातभार लागणार? सोलापूर-जळगाव हा मार्ग घोषणेपलीकडे सरकला नाही. अहमदनगर-परळी हा मार्ग कधी पूर्ण होणार? याविषयीच्या घोषणांची आणि आश्वासनांची लांबीच या मार्गापेक्षा मोठी असेल. अशी ही रेल्वेसेवा. तिचा मराठवाड्याच्या विकासाला उपयोग तो किती?औरंगाबाहून विमानसेवा बºयाच वर्षांपासून पर्यटनस्थळ या अर्थाने परदेशी पर्यटकांसाठी ही सेवा होती. पुढे उद्योग आल्यानंतर त्यात वाढ झाली; परंतु आता मुंबईसाठी ३, तर दिल्लीसाठी दोनच विमाने आहेत. जयपूरसेवा बंद आहे. हैदराबादची सेवा विस्कळीत झाली आहे. शिर्डीला विमानसेवा सुरू झाल्यामुळे त्याचा परिणाम औरंगाबादवर झाला. त्यामुळे विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. हे सगळे रस्ते, रेल्वे, हवाईमार्ग विकासाचे मार्ग असतात. त्यांचा विकास व वृद्धी हाच भरभराटीचा मार्ग असतो; परंतु याच मार्गांवर सगळे अडथळे निर्माण झाले आहेत. दळणवळणाची अद्ययावत साधनेच विकास आणतात. सध्या मंत्रालयात मुंबई-पुणे कॅप्सूलसेवेची जोरदार चर्चा आहे. वर्षभरात हे अंतर केवळ २८ मिनिटांत गाठता येईल. याचे पॉवर पॉइंट दाखविले जाते. नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने ही दोन शहरे उपनगरांइतक्या अंतरावर आणण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे; पण त्याचवेळी राज्याच्या इतर भागांकडे किती काळ दुर्लक्ष करणार? मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग खडतर आहे, हे विसरता येत नाही.(संपादक, लोकमत औरंगाबाद)

 

टॅग्स :Marathwadaमराठवाडा