शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
3
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
4
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
5
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
6
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
7
वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
8
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
9
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
10
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
11
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
12
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
13
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
14
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
15
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
16
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
17
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
18
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
20
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग खडतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 04:22 IST

अजिंठा, भोगवर्धन (भोकरदन), तगर (तेर), प्रतिष्ठान (पैठण), सिन्नर, नाणेघाट ते नालासोपारा. सातवाहनांच्या काळातील हा आंतरराष्ट्रीय मार्ग, या मार्गाने रेशमी वस्त्रे, सोने, दागिने आदींचा व्यापार परदेशाशी होत असे.

- सुधीर महाजनअजिंठा, भोगवर्धन (भोकरदन), तगर (तेर), प्रतिष्ठान (पैठण), सिन्नर, नाणेघाट ते नालासोपारा. सातवाहनांच्या काळातील हा आंतरराष्ट्रीय मार्ग, या मार्गाने रेशमी वस्त्रे, सोने, दागिने आदींचा व्यापार परदेशाशी होत असे. आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र म्हणून भोगवर्धन, प्रतिष्ठान आणि तगर ही नगरे प्रसिद्ध होती. आताच्या भाषेत आंतरराष्टÑीय व्यापार केंद्रे होती आणि हा मार्ग म्हणजे ‘इंटरनॅशनल बिझनेस कॉरिडॉर’ होता.आज मराठवाड्यातून राजधानी मुंबईकडे जाणारे रस्ते व इतर राज्यांना जोडणाऱ्या रस्त्यांकडे नजर टाकली, तर एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे मराठवाड्याला इतर राज्यांशी जोडणारे सगळेच रस्ते हे केवळ दोन पदरी आहेत. नांदेडहून हैदराबादकडे जायचे किंवा औरंगाबादहून इंदूरला जायचे म्हटले तरी रस्ते दोन पदरीच. पुण्याकडे जाणारा एकमेव चौपदरी रस्ता आहे. औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी; पण येथून मुंबईला जाण्यासाठी वैजापूर, येवला, नाशिक हा मार्ग किंवा शिर्डी, सिन्नर, ढोकी हा मार्ग हे दोन्ही खडतर, दोन पदरी, खड्डेमय आणि प्रवाशांची परीक्षा पाहणारे आहेत. तिसरा समृद्धी महामार्ग हा अजून कागदावरच आहे. नांदेड किंवा बीडहून मुंबईला जायचे म्हटले तरी औरंगाबादहूनच जावे लागते. बीड-औरंगाबाद राष्टÑीय महामार्ग क्र. २११ चे काम धिम्यागतीने चालू आहे. या मराठवाड्याचा राजधानी मुंबईशी थेट संपर्क सुलभ नाही. ही प्रमुख मार्गांची अवस्था आहे. मराठवाड्यातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था यापेक्षा वाईट. रस्ते हे जीवनवाहक असतात. ते चांगले असतील तर व्यापार-उदीम वाढतो; पण ही लाइफलाइनच खराब असल्याने बाजारपेठा भरभराटीला येत नाहीत.रेल्वेचा विचार केला, तर औरंगाबाद-नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी केवळ चार रेल्वेगाड्या. त्यांच्या वेळाही फारशा सोयीच्या नाहीत. रेल्वे डब्यांची अवस्था त्याहूनही वाईट. दिल्लीला जाण्यासाठी एकच रेल्वे. एवढ्या तुटपुंज्या रेल्वेसेवेने विकासाला कोणता हातभार लागणार? सोलापूर-जळगाव हा मार्ग घोषणेपलीकडे सरकला नाही. अहमदनगर-परळी हा मार्ग कधी पूर्ण होणार? याविषयीच्या घोषणांची आणि आश्वासनांची लांबीच या मार्गापेक्षा मोठी असेल. अशी ही रेल्वेसेवा. तिचा मराठवाड्याच्या विकासाला उपयोग तो किती?औरंगाबाहून विमानसेवा बºयाच वर्षांपासून पर्यटनस्थळ या अर्थाने परदेशी पर्यटकांसाठी ही सेवा होती. पुढे उद्योग आल्यानंतर त्यात वाढ झाली; परंतु आता मुंबईसाठी ३, तर दिल्लीसाठी दोनच विमाने आहेत. जयपूरसेवा बंद आहे. हैदराबादची सेवा विस्कळीत झाली आहे. शिर्डीला विमानसेवा सुरू झाल्यामुळे त्याचा परिणाम औरंगाबादवर झाला. त्यामुळे विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. हे सगळे रस्ते, रेल्वे, हवाईमार्ग विकासाचे मार्ग असतात. त्यांचा विकास व वृद्धी हाच भरभराटीचा मार्ग असतो; परंतु याच मार्गांवर सगळे अडथळे निर्माण झाले आहेत. दळणवळणाची अद्ययावत साधनेच विकास आणतात. सध्या मंत्रालयात मुंबई-पुणे कॅप्सूलसेवेची जोरदार चर्चा आहे. वर्षभरात हे अंतर केवळ २८ मिनिटांत गाठता येईल. याचे पॉवर पॉइंट दाखविले जाते. नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने ही दोन शहरे उपनगरांइतक्या अंतरावर आणण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे; पण त्याचवेळी राज्याच्या इतर भागांकडे किती काळ दुर्लक्ष करणार? मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग खडतर आहे, हे विसरता येत नाही.(संपादक, लोकमत औरंगाबाद)

 

टॅग्स :Marathwadaमराठवाडा