शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग खडतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 04:22 IST

अजिंठा, भोगवर्धन (भोकरदन), तगर (तेर), प्रतिष्ठान (पैठण), सिन्नर, नाणेघाट ते नालासोपारा. सातवाहनांच्या काळातील हा आंतरराष्ट्रीय मार्ग, या मार्गाने रेशमी वस्त्रे, सोने, दागिने आदींचा व्यापार परदेशाशी होत असे.

- सुधीर महाजनअजिंठा, भोगवर्धन (भोकरदन), तगर (तेर), प्रतिष्ठान (पैठण), सिन्नर, नाणेघाट ते नालासोपारा. सातवाहनांच्या काळातील हा आंतरराष्ट्रीय मार्ग, या मार्गाने रेशमी वस्त्रे, सोने, दागिने आदींचा व्यापार परदेशाशी होत असे. आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र म्हणून भोगवर्धन, प्रतिष्ठान आणि तगर ही नगरे प्रसिद्ध होती. आताच्या भाषेत आंतरराष्टÑीय व्यापार केंद्रे होती आणि हा मार्ग म्हणजे ‘इंटरनॅशनल बिझनेस कॉरिडॉर’ होता.आज मराठवाड्यातून राजधानी मुंबईकडे जाणारे रस्ते व इतर राज्यांना जोडणाऱ्या रस्त्यांकडे नजर टाकली, तर एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे मराठवाड्याला इतर राज्यांशी जोडणारे सगळेच रस्ते हे केवळ दोन पदरी आहेत. नांदेडहून हैदराबादकडे जायचे किंवा औरंगाबादहून इंदूरला जायचे म्हटले तरी रस्ते दोन पदरीच. पुण्याकडे जाणारा एकमेव चौपदरी रस्ता आहे. औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी; पण येथून मुंबईला जाण्यासाठी वैजापूर, येवला, नाशिक हा मार्ग किंवा शिर्डी, सिन्नर, ढोकी हा मार्ग हे दोन्ही खडतर, दोन पदरी, खड्डेमय आणि प्रवाशांची परीक्षा पाहणारे आहेत. तिसरा समृद्धी महामार्ग हा अजून कागदावरच आहे. नांदेड किंवा बीडहून मुंबईला जायचे म्हटले तरी औरंगाबादहूनच जावे लागते. बीड-औरंगाबाद राष्टÑीय महामार्ग क्र. २११ चे काम धिम्यागतीने चालू आहे. या मराठवाड्याचा राजधानी मुंबईशी थेट संपर्क सुलभ नाही. ही प्रमुख मार्गांची अवस्था आहे. मराठवाड्यातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था यापेक्षा वाईट. रस्ते हे जीवनवाहक असतात. ते चांगले असतील तर व्यापार-उदीम वाढतो; पण ही लाइफलाइनच खराब असल्याने बाजारपेठा भरभराटीला येत नाहीत.रेल्वेचा विचार केला, तर औरंगाबाद-नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी केवळ चार रेल्वेगाड्या. त्यांच्या वेळाही फारशा सोयीच्या नाहीत. रेल्वे डब्यांची अवस्था त्याहूनही वाईट. दिल्लीला जाण्यासाठी एकच रेल्वे. एवढ्या तुटपुंज्या रेल्वेसेवेने विकासाला कोणता हातभार लागणार? सोलापूर-जळगाव हा मार्ग घोषणेपलीकडे सरकला नाही. अहमदनगर-परळी हा मार्ग कधी पूर्ण होणार? याविषयीच्या घोषणांची आणि आश्वासनांची लांबीच या मार्गापेक्षा मोठी असेल. अशी ही रेल्वेसेवा. तिचा मराठवाड्याच्या विकासाला उपयोग तो किती?औरंगाबाहून विमानसेवा बºयाच वर्षांपासून पर्यटनस्थळ या अर्थाने परदेशी पर्यटकांसाठी ही सेवा होती. पुढे उद्योग आल्यानंतर त्यात वाढ झाली; परंतु आता मुंबईसाठी ३, तर दिल्लीसाठी दोनच विमाने आहेत. जयपूरसेवा बंद आहे. हैदराबादची सेवा विस्कळीत झाली आहे. शिर्डीला विमानसेवा सुरू झाल्यामुळे त्याचा परिणाम औरंगाबादवर झाला. त्यामुळे विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. हे सगळे रस्ते, रेल्वे, हवाईमार्ग विकासाचे मार्ग असतात. त्यांचा विकास व वृद्धी हाच भरभराटीचा मार्ग असतो; परंतु याच मार्गांवर सगळे अडथळे निर्माण झाले आहेत. दळणवळणाची अद्ययावत साधनेच विकास आणतात. सध्या मंत्रालयात मुंबई-पुणे कॅप्सूलसेवेची जोरदार चर्चा आहे. वर्षभरात हे अंतर केवळ २८ मिनिटांत गाठता येईल. याचे पॉवर पॉइंट दाखविले जाते. नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने ही दोन शहरे उपनगरांइतक्या अंतरावर आणण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे; पण त्याचवेळी राज्याच्या इतर भागांकडे किती काळ दुर्लक्ष करणार? मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग खडतर आहे, हे विसरता येत नाही.(संपादक, लोकमत औरंगाबाद)

 

टॅग्स :Marathwadaमराठवाडा