शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पुनश्च शनैश्चरशरण

By admin | Updated: April 8, 2016 02:37 IST

अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूरच्या प्रार्थनास्थळी असलेल्या शनीच्या चौथऱ्यावर महिलांवर लादली गेलेली बंदी उठविली जावी म्हणून गेल्या प्रजासत्ताकदिनी भूमाता ब्रिगेड नावाच्या

अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूरच्या प्रार्थनास्थळी असलेल्या शनीच्या चौथऱ्यावर महिलांवर लादली गेलेली बंदी उठविली जावी म्हणून गेल्या प्रजासत्ताकदिनी भूमाता ब्रिगेड नावाच्या एका महिला संघटनेने केलेला प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडल्यानंतर याच स्तंभातून ‘शनैश्चरशरण देवेन्द्र’ या शीर्षकाखाली एक स्फुट प्रसिद्ध झाले होते. मुख्यमंत्र्यांनी प्रस्तुत प्रकरणात जातीने लक्ष घालण्याची अपेक्षा त्याद्वारे व्यक्त केली होती. या स्फुटावर तत्काळ मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कक्षाने एक लेखी खुलासा केला. नैतिक वृत्तपत्रीय परंपरांचे पालन करताना त्या खुलाशालाही याच पृष्ठावर स्थान देण्यात आले. कोणत्याही हिन्दू देवालयात स्त्री-पुरुष भेद असता कामा नये या तात्त्विक भूमिकेचा खुलाशातही पुनरुच्चार होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तंबी देताना राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वाची आणि खुद्द राज्य सरकारनेच पारित केलेल्या संबंधित कायद्याची व त्याच्या अंमलबजावणीची आठवण करुन दिली. परिणामी आता तरी मुख्यमंत्री हातात हंटर घेतील असे जनतेला वाटले होते. पण महिलांना तर प्रवेश देणार नाहीच पण आता पुरुषांनाही तो नाकारणार अशी अत्यंत आडमुठी भूमिका शिंगणापूरच्या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतली. त्यासंबंधी विधिमंडळात उपस्थित प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिले? तर म्हणे, ‘मूर्तीचे म्हणजे तेथील शिळेचे नुकसान होऊ नये म्हणून मंडळाने तो निर्णय घेतला आहे’. नुकसान कशामुळे झाले असते? तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता तर! ही सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकार प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची की विश्वस्त मंडळाची? मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात दिलेल्या उत्तरात केवळ वास्तवाची सभागृहाला जाण करुन दिली आहे. त्यावरील स्वत:चा अभिप्राय मात्र दिलेला नाही. स्थानिक आणि दूरस्थ जनतेच्या मनाचा ठाव घेतला तर विश्वस्त मंडळाचा हा निर्णय कोणालाही मान्य झालेला नाही. पण सरकारने त्यावर कोणताही अभिप्राय व्यक्त न केल्याने सरकारची या निर्णयास मूक संमती असल्याचा निष्कर्ष कुणी काढला तर तो चुकीचा कसा ठरेल? याचा सरळ अर्थ मग एकच निघतो. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस गेल्या खेपेस केवळ शनैश्चरशरण होते आता मात्र ते विश्वस्त मंडळशरणही झालेले दिसतात!