शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या गोंदाअभावी!

By admin | Updated: September 14, 2016 04:59 IST

एरवी एक पोक्त, समंजस, परिपक्व, स्वत:ची प्रतिष्ठा राखतानाच समोरच्याचा आब राखणारे आणि मृदुभाषी सद्गृहस्थ अशीच प्रफुल्ल पटेल यांची महाराष्ट्राला आणि देशालाही ओळख आहे.

एरवी एक पोक्त, समंजस, परिपक्व, स्वत:ची प्रतिष्ठा राखतानाच समोरच्याचा आब राखणारे आणि मृदुभाषी सद्गृहस्थ अशीच प्रफुल्ल पटेल यांची महाराष्ट्राला आणि देशालाही ओळख आहे. त्यातून ते त्यांच्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांचे निकटवर्ती आहेत असेही मानले आणि समजले जाते. ते खरोखरीच तसे आहेत का, की आपण केवळ मराठा-पाटलांचे नेते आहोत असे लोकाना वाटू नये (यात वाटण्यासारखे काहीही नाही हा भाग वेगळा) म्हणून एखादा पटेलदेखील सोबतीला असलेला बरा म्हणून शरद पवार-पाटील यांनी प्रफुल पटेल यांना जवळ केले आहे, हे काही सांगता येणार नाही. पण आजवरचा अनुभव जमेस धरता केवळ पटेलच नव्हेत तर पवारांच्या पक्षातील कोणतेही पाटील किंवा पवार जे बोलतात त्यामागे थोरले पवारच असतात आणि आपण उगाचच काही बोलत नसतो असे पवारांच्या थोरल्या पातीने याआधीच स्पष्ट केलेले असल्याने प्रफुलभाई अचानक काँग्रेस पक्षावर का घसरले, कोणाच्या सांगण्यावरुन घसरले आणि कशासाठी घसरले याविषयी फार तर्ककुतर्क करीत बसण्याचे कारण नाही. ‘हम तो डुबेंगे सनम मगर आप को भी लेकर डुबेंगे’ असा एक अत्यंत घासून गुळगुळीत झालेला संवाद अधूनमधून कानी पडत असतो. प्रफुल पटेलांनी केवळ हा संवादच नव्हे तर त्यामागील कृतीदेखील काँग्रेसच्या नावावर वर्ग करुन टाकली आहे. काँग्रेस तिच्या कर्तुकीने बुडाली पण आम्हालादेखील घेऊन बुडाली अशी आरोपवजा खंत वा तक्रार त्यांनी केली आहे. एक-दोन नव्हे चांगली पंधरा वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातात हात घालून देशाच्या आणि महाराष्ट्राच्याही सत्तासागरात सुखेनैव नौकाविहार करीत होते. पण त्या संपूर्ण काळात आमची ताकद फार फार तर पुणे आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही स्थानिक स्वराज्य संस्था व काही सहकारी संस्था ताब्यात ठेवण्याची असताना काँग्रेसमुळे आम्हाला संपूर्ण देशाच्या व त्याचबरोबर राज्याच्याही सत्तेत वाटेकरी होता आले, असे काही पटेल वा त्यांचे नेते पवार यांनी म्हटल्याचे कोणाला आठवत नाही. मुद्दा असा की, सत्तासागरात मोदी नावाची त्सुनामी आल्यानंतर काँग्रेसची नाव गटांगळ्या खाऊ लागली म्हटल्यावर तिच्या हातात हात घालणाऱ्या राष्ट्रवादीची हालत त्यापेक्षा वेगळी होण्याचे काही कारणच नव्हते. प्रत्यक्षात मोदी नावाची त्सुनामी येण्याआधीच केन्द्रातील संपुआचे आणि राज्यातील आघाडीचे अशी दोन्ही सरकारे मतदारांच्या मनातून उतरण्यास सुरुवात झाली होती. यातील अत्यंत विचित्र योगायोग म्हणजे केन्द्रातील सरकारवर मतदारांची जी इतराजी वृद्धिंगत होत गेली तिला काँग्रेसच्या मंत्र्यांपेक्षा संपुआतील अन्य घटक पक्षांचे मंत्रीच जबाबदार होते. त्यापायी मनमोहनसिंग यांच्यासारख्या आंतर्बाह्य स्वच्छ पंतप्रधानाच्या अंगावरदेखील आरोपाचे शिंतोडे उडले गेले. महाराष्ट्राचा विचार करता येथेही काँग्रेसच्या मंत्र्यांपेक्षा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या लीलांमुळेच काँग्रेस पक्षाला वारंवार लज्जीत होणे भाग पडत गेले. असे असताना महाराष्ट्रात ज्यांना महाघोटाळे म्हणून संबोधले जाते, ते प्रत्यक्षात महाघोटाळे नव्हतेच, तर ते होते राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे महाषडयंत्र आणि या षडयंत्राचे म्होरके होते तेव्हांचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, असे जेव्हां प्रफुलभाई म्हणतात तेव्हां त्यांना त्यांच्या पक्षातील अन्य मंत्र्यांचे तर राहोच पण छगन भुजबळ यांचेदेखील विस्मरण झाले असावे असे दिसते. तरीही पटेल यांच्या या विधानामुळे आपण अन्य काहीही नसले तरी किमान षडयंत्र रचू शकतो आणि ते यशस्वी करुन शरद पवारांसारख्या बलदंड नेत्याच्या पक्षातील बाहुबलींना जेरीसही आणू शकतो, हे वाचल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना नक्कीच गुदगुल्या झाल्या असतील, यात शंका नाही. प्रफुल पटेल यांनी केलेल्या गोळीबारावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, राष्ट्रवादीतील काही नेते (येथे पटेल असे वाचावे) पंतप्रधानांशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे कारण आपल्या पक्षातील काही मंत्री आणि नेत्यांच्या पूर्वकर्मांमुळे त्यांच्या मनात मोदींविषयी भीती निर्माण झाल्याचे म्हटले आहे. अर्थात केवळ नरेन्द्र मोदी एकटेच नव्हेत तर त्यांच्या मंत्रिमंडळातील आणखीही काही सदस्यांशी मधुर संबंध प्रस्थापित करण्यासाठी खुद्द शरद पवार कसे प्रयत्नशील असतात ते तमाम महाराष्ट्र बघतच असतो. त्यातून विकास साधून घ्यायचा असेल तर केन्द्रीय सत्तेशी सलोखा असावाच लागतो, हे विधानदेखील पवारांनी अनेकदा केले आहे आणि पवार उगाचच काही बोलत नसतात हे आमचे वाचक जाणतातच. यातील खरा मुद्दा आणखीच वेगळा आणि पवारांच्या या भूमिकेशी साधर्म्य राखणारा आहे. आज काँग्रेस अत्यंत गलितगात्र अवस्थेत असल्याने कोणीही यावे टपली मारुन जावे असे तूर्तासचे तिचे प्राक्तन आहे. ही अवस्था जेव्हां बदलेल तेव्हां पवार-पटेलदेखील बदलतील. वाऱ्याप्रमाणे बदलणे हे त्यांचे मुकद्दर नसते तर पवार सोनियांच्या पक्षाबरोबर कधी जातेच ना !