शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

विष, विखार, विद्वेष आणि उत्तर प्रदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 09:44 IST

यापुढे पातळी आणखी घसरेल, जातीय विद्वेषाने भरलेली भाषणबाजी विषारी होत जाईल आणि निवडणूक आयोग बहुतेकदा मूग गिळून बसेल !

- कपिल सिब्बल(ज्येष्ठ विधिज्ञ, काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार)

पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान काय काय ऐकावे लागणार आहे, हे आजवर जे घडले त्यावरून स्पष्टच दिसते आहे. पश्चिम बंगालमध्ये सगळा बिनडोक गदारोळ होता.  त्याहून बरेच काही पणाला लागलेले असताना, आता ते चित्र बदलेल असे वाटत नाही. सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशात काय निकाल लागतो याकडे असतील, हे तर नक्कीच! २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांची ही रंगीत तालीम असेल, हे तर खरेच!

अमित शाह यांनी १७ डिसेंबरला योगी आदित्यनाथ यांचे गुणगान केले. त्यांना तसे करण्यावाचून काही पर्यायही नव्हता, म्हणा! त्या गुणांच्या यादीतला एक  मुद्दा महत्त्वाचा. अमित शहा म्हणाले, योगी यांनी उत्तर प्रदेशातले माफिया आणि गुंडांचे राज्य संपविले!  सपा, बसपा यांनी गुंडांना आश्रय दिला, पण योगी यांच्या काळात मात्र गुंड राज्य सोडून गेले, असे अमितभाईंचे म्हणणे! माफिया कशाला म्हणतात हे न उमजल्यामुळे कदचित त्यांनी हा दावा केला असावा. ‘‘सतत एकमेकांबरोबर असलेला, सारखेच उद्योग करणारा आणि आपल्यामुळे  इतरांची हानी झाली तरी एकमेकांना संरक्षण देत राहणारा गट’’ असा माफिया या संज्ञेचा अर्थ आहे.  ही व्याख्या तर उत्तर प्रदेशला चांगली लागू पडते. दक्षता पथकांचे गुंड तेथे मनगटशाहीच्या जोरावर भय निर्माण करत आहेत. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांचेच अभय या मंडळींना असते, हे तर  उघड गुपितच!

माफिया आणि गुंडांना कायद्याची कदर असत नाही. हरिद्वारमध्ये नुकतेच जे घडले, त्यावरून पुढे काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना येते. विष ओकणारी भाषणे तेथे झाली. उघडपणे वंशहत्येची चिथावणी दिली गेली.  सरकारवर किंचित जरी टीका झाली तरी, थेट देशद्रोहाची  कलमे लावायला एरवी धावणारे सरकार, हरिद्वारला पोलिसांच्या समोर जे घडले, त्यावर मात्र गप्प बसले; हा विरोधाभासच म्हणायचा. कोणालाही अटक झालेली नाही. पोलिसांनी आपणहून किमान एक एफआयआर तरी दाखल करायचा? शिवाय, ही काही एकटीदुकटी घटना नाही. पाळेमुळे घट्ट रोवलेल्या संघटनांचे हे जाळे हल्ली वारंवार कायदा पायदळी तुडवते. 

हिंदू युवा वाहिनी, बजरंग दल आणि छोटे गट उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहेत. ‘जय श्रीराम’ म्हटले नाही म्हणून विशिष्ट समाजाच्या लोकांना त्रास दिला जातो. आपल्या पालकांच्या रक्षणासाठी रडत करुणा भाकणाऱ्या मुलांनाही ठोकरले जाते. ‘भारत माता की जय’ न म्हणणाऱ्यांना थेट पाकिस्तानीच ठरवले जाईल, असे वक्तव्य राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी ९ नोव्हेंबरला केले. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगजेब - शिवाजी यांचे संदर्भ मुद्दाम दिले जात आहेत. कारण फूट पडण्याचा कार्यक्रम त्यातून राबवायचा आहे.

विशिष्ट जातींना लक्ष्य करून मतांवर डल्ला मारण्यासाठी राजकीय ध्रुवीकरण करणारी राजवट एका अर्थाने “लोकशाही मार्गाने आवाज उठवणे” हा गुन्हा ठरविण्याच्या मागे लागली आहे. कायदा धार्मिक बाबतीत तटस्थ असतो म्हणणारे सरकार वागते मात्र उलटे, असे आकडेवारीवरून दिसते. हिंदुत्वाच्या विचारांशी संगनमत असलेले प्रशासन  प्रत्येक धर्मांतराकडे संशयाने पाहते. सरकारात वर्चस्व असलेल्या जातीचे लोक महत्त्वाच्या पदांवर सजातीयांना नेमतात. निवडणुकीच्या काळात सरकार पक्षासाठी ते काम करतील, हे काय वेगळे सांगायला हवे? लोकांची भावना तर अशीच झालेली दिसते. गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया वैध ठरविल्या जाण्याचा अनुभवही उत्तर प्रदेशात वारंवार येतो.

योगींच्या उत्तर प्रदेशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांची सरसकट धरपकड केली. ही धरपकड अमानुष होती. मुस्लिम वस्त्यांमध्ये पोलीस गेले, घरात घुसून त्यांनी वस्तू बाहेर फेकल्या, मालमत्तेचा विध्वंस केला; असे घटना पाहणारे सांगतात. तसे व्हिडीओ उपलब्ध आहेत. पोलीस म्हणतात, गोळीबार झाला नाही. तरी गोळ्या लागून २२ माणसे मरण पावली. 

कोरोना साथीच्या काळात तर सरकारला विरोध, असहमती सहन न करण्याचे  प्रकार आणखीनच तीव्र झाले. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील उणिवा दाखविणाऱ्या पत्रकारांवर खटले दाखल करण्यात आले. ऑक्सिजनचा तुटवडा तसेच जीवरक्षक औषधे न मिळणे यावर टीका करणाऱ्या पत्रकारांवर, सरकारी आरोग्य व्यवस्था कशी कमी पडते आहे हे दाखवणाऱ्या नागरिकांवर खटले भरले गेले. 

“गुंडांचे राज्य संपले” हा योगींचा दावा पोकळ आहे. गोहत्या ते ‘लव्ह जिहाद’वर पोसली गेलेली ही नवी हिंदुत्व विचारसरणी दुसऱ्या जमातीला त्रास देण्याचा प्रयत्न आहे. आता परिस्थिती त्याही पुढे चाललेली दिसते. यापुढची भाषणबाजी जातीय विद्वेषाने भरलेली, अधिक विषारी असेल. भाजपाशासित राज्यातले पोलीस गम्मत पाहतील, निवडणूक आयोग काही प्रकरणांवर मूग गिळून बसेल. उत्तर प्रदेशातली स्वयंघोषित दक्षता पथके ही एकमेकांशी पक्की जोडली गेलेली, आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी विशिष्ट जमातींना लक्ष्य करणारी यंत्रणा आहे हे उघडच आहे. मग उत्तर  प्रदेशातून जे निघून गेले आणि जे आजही तिथे आहेत, ते माफिया गुंड नेमके कोण?

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी