शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

राष्ट्रपती राजवटीच्या प्रयत्नांना ‘नॉटी’ पाठबळ

By यदू जोशी | Published: September 26, 2020 6:05 AM

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जावं आणि राष्ट्रपती राजवट लागू व्हावी यासाठीचा पाया तयार करण्याचं काम सध्या चाललं आहे. आता त्या पायावर सरकार बरखास्तीची इमारत उभी राहते की ती कोसळून प्रयत्न करणारेच त्या खाली गाडले जातात ते पहायचे.

- यदू जोशीवरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमतमहाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जावं आणि राष्ट्रपती राजवट लागू व्हावी यासाठीचा पाया तयार करण्याचं काम सध्या चाललं आहे. आता त्या पायावर सरकार बरखास्तीची इमारत उभी राहते की ती कोसळून प्रयत्न करणारेच त्या खाली गाडले जातात ते पहायचे. (पहाटेचा शपथविधी अंगलट आला होता, हा पूर्वानुभव आहेच.) प्रयत्न मात्र नक्कीच जोमाने सुरू आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची वक्तव्यं हीे ‘बिटविन द लाइन्स’ वाचायची असतात. परवा ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत आहे का?’

- याचा अर्थच असा आहे की असे कुठेतरी प्रयत्न नक्कीच होत असल्याची कुणकुण पवार यांना लागली असणार वा ठोस माहिती मिळाली असणार. सरकार पाडण्याचे प्रयत्न काही आयपीएस अधिकाऱ्यांनी केले होते ही माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांना मिळू शकते तर पवारांना त्यापुढची बरीच माहिती असणार. राष्ट्रपती राजवटीसाठी काही अदृश्य हात कोणाच्या तरी इशाºयावरून नक्कीच कामाला लागले आहेत असं दिसतं.रणनीती अशी ठरली आहे म्हणतात की, कुठला एकच पक्ष फोडण्याऐवजी तिन्ही सत्तारूढ पक्षातील २० ते २५ आमदार गळाला लावायचे आणि त्यांना पोट-निवडणुकीत निवडून आणायचं, पण हे लगेच केलं तर तीन पक्षांच्या आघाडीविरुद्ध आमदार पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी. म्हणून आधी या सरकारची विश्वासार्हता आणि प्रतिमा धोक्यात आणायची आणि तीन पक्ष एकत्र लढणार नाहीत अशी व्यवस्था करायची. राष्ट्रपती राजवटीमुळे दोन-तीन महिन्यांचा अवधी मिळेल आणि त्यात हे करणं शक्य होईल. राजभवन हक्काचं आहेच. सरकार पाडण्याचा रोष अंगावर न घेता ‘आॅपरेशन कमळ’ करण्याचं चाललं आहे.

हे सगळं डिसेंबरपर्यंत होईल असा तर्क दिला जातोय. एका रणनीतीचा भाग म्हणून फासे टाकले जात आहेत आणि शिवसेना त्यात अडकत चालली आहे. शिवसेनेतील वाचाळ नेते हरामखोर (सॉरी, नॉटी) आदी शब्द वापरून, धमक्यांची भाषा करून त्या रणनीतीला बळ देत आहेत. कंगना, सुशांतसिंह, ड्रग्ज आदी मुद्द्यांवरून चॅनलवॉर पेटलेलं आहेच. एक हिंदी चॅनल कंगनाची बाजू घेतं, तर तिचीच मराठी वाहिनी कंगनाला फटकारताना दिसते. चॅनलचे पत्रकार एकमेकांत जाहीर हाणामारी करीत आहेत.समजूतदारपणाचं बोट धरून चालणाºया महाराष्ट्रात पूर्वी असं कधी घडलं नाही. मराठा, धनगर आरक्षणाचे विषय ऐरणीवर आहेत. कोरोनाने होणाºया मृत्यूंचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. विरोधी पक्ष आक्रमक झालाय. शेतकरी विधेयकांवरून शिवसेनेनं मोदी सरकारला हेडआॅन घेतलं नाही. ही बोटचेपी भूमिका राज्यातील सरकारवर राष्ट्रपती राजवटीची आच येऊ नये म्हणून तर घेतली नाही ना, अशी शंका येते. भाजपबरोबर सत्तेत असताना शिवसेना एकाचवेळी सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या भूमिकेत असायची, आताही तेच सुरू आहे. शिवसेनेनं ‘आपलाच वाद आपणाशी’ करत बसण्यापेक्षा सत्तेतून येणारं शहाणपण दाखविण्याची गरज आहे.

 

आदित्यजी, नकारात्मक राजकारण करू नका!देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री फेलोशिप हा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वीरीत्या सुरू होता. त्यात आयआयटीयन्स, सीए, एमबीए अशी हुशार तरुणाई राज्याच्या विकास योजनांशी कनेक्ट व्हायची. अनेक योजना, केंद्राच्या मदतीचे प्रकल्प, नावीन्यपूर्ण उपक्रम त्यातून उभे राहिले. नव्या सरकारने ती फेलोशिप बंद केली. सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बाजूला आदित्य ठाकरे अनेकदा बसतात. केवळ फडणवीस सरकारची योजना म्हणून फेलोशिप बंद करणं यात नकारात्मक राजकारण असून, राज्याचं आणि गुणी तरुणाईचं नुकसान आहे. कंगना, ड्रग्ज, नेपोटिझमपासून दूर असलेली गुणी मुलं चालतात ना सरकारला? पर्यटन मंत्री म्हणून कृषी पर्यटन, साहसी पर्यटन धोरण आणल्याबद्दल मात्र आदित्य यांचं अभिनंदन!दादा, अशी प्रतीकात्मक आर्थिकबचत कशाला?सरकारी विभागांनी कॅलेंडर, शुभेच्छापत्रं छापू नयेत असा आर्थिक बचतीसाठीचा आदेश वित्त विभागानं काढलाय. मंत्र्यांसाठी नवीन गाड्या घेऊ नयेत, २५:१५ मध्ये शेकडो कोटी रुपये आमदारांना देऊ नयेत, जलसंपदाच्या विशिष्ट कंत्राटदारांना कोट्यवधींची बिलं देऊ नयेत, इमेज बिल्डिंगसाठी कोट्यवधी रुपये खर्च करू नयेत, असेही आदेश काढले तर त्यात खरी ‘दादा’गिरी दिसेल. प्रतीकात्मक बचतीनं काय साधणार?

टॅग्स :President Ruleराष्ट्रपती राजवटUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस