शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - कट्टा

By admin | Updated: January 9, 2017 00:34 IST

समाज सरोवर आहे की नदी, तो अखंड पाझर आहे की गटार, तो पवित्र तीर्थ आहे की डिस्टील्ड केलेलं कृत्रिम पाणी.

समाज सरोवर आहे की नदी, तो अखंड पाझर आहे की गटार, तो पवित्र तीर्थ आहे की डिस्टील्ड केलेलं कृत्रिम पाणी. खूप प्रश्न पाडलेत या समाजाने. सभ्यता जागविलेला जमाव म्हणजे समाज किंवा संवेदना माळलेला जमाव, असेही म्हणता येईल. ठरावीक कारणाने जमतो तोही समाजच असतो. स्मशानात जमलेली माणसं त्या त्या जातीचा समाजच असतो. ज्ञानेश्वरांनी पसायदानात एक शब्द वापरला, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. ही मांदियाळी सज्जन माणसांचा समुदायच असतो. वर्षानुवर्षे हे आपल्यावर संस्कारित झालंय. हा समाज ज्या एका जागेवर जमतो ते भले पटांगण असो, सभागृह असो, छोटा हॉल असो, लगेच त्या जागेला विचारांचे एक वेगळे वलय प्र्राप्त होते. पण जागा बदलली की हेतू बदलतात. उदा. पार्टीचं कार्यालय आणि कट्टा. कट्टा म्हटलं की सगळंच बदलतं. माणसांचा वयोगट बदलतो. विचार बदलतात. भाषा बदलते. एरवी जे असभ्य, अश्लील म्हणून डोळे मोठे करून बघितलं जातं ते एकदम रुटीनचं किंबहुना आवडीचं, नेहमीचं होतं. समाजात पडद्यामागील शब्द, भाषा, स्तर, संबंध एकदम मोकळे होतात. जात येते ती शिवी म्हणून. घर येतं ते बोअर कोंडवाडा म्हणून. आई-बाबा म्हातारी-बाप होतात. यार भंकस नुस्ती, पकवतात रे बोलून बोलून. हे बघा, कुठलीच भीडभाड न ठेवता बोललं पाहिजे. ही थिअरी आणि नियम इथले. इथली भाषा आणि चर्चा घरापर्यंत जाऊच द्यायची नाही. फळ चोरून खाल्ल्यानंतर कुणाला कळू नये म्हणून मुलगा तोंड स्वच्छ धुतो. पुसतो. हात धुतो घाईने चड्डीला पुसतो. पण नेमके होते काय की चड्डीला पुसलेले हात आईला कळतात. कारण ठराविक भागच ओला दिसतो. तसे काहीसे होते. चुकून मित्र घाईने घरी येतो. डोकं भेंगाळलेला, तो त्याच्या परवलीच्या भाषेत मित्राला हाक मारतो. शिवाय भ ची बाराखडी जोडूनच. आजोबा दारात येतात. मित्र बावरतो. क्षणभर त्याची बोबडी वळते. आपले संदर्भ ह्यांना कळले तर? आजोबा हसतात म्हणतात, ये बाळा आहे तो घरात! आजोबा एका हास्याने भाषा सुधारतात. खरं तर पुन्हा प्रश्न! आधीची मुलाची भाषा चांगली होती की आताची.खरं तर दोन्ही एका गटाला संमत असलेले शब्द दुसऱ्या वयाला पचत नाहीत, पटत नाहीत, पण त्यांचा रोष उमटतही नाही. स्वीकारायला हवे, आजोबांचे सरोवर झालेले. त्यामुळे दगड टाकला की ढवळणारच सारे. पण तरण्या पोरांची खळखळ नाही. ते त्या वयाची भाषा बोलतात. राग, वैताग, विद्रोह आणि प्रेमही व्यक्त करतात. नकळत तो समाजच वेगळा होतो. मग आजोबाही उठतात. हातात काठी घेऊन त्यांच्या कट्ट्यावर येतात. त्यातल्या त्यात तरुण म्हाताऱ्याला डोळा मारतात. बायकोचा डोळा चुकवून थोडी मिठाई खाल्ल्याचे सांगतात. पलीकडे कट्ट्यावर वडापाव शिळा होता रे म्हणून घमासान शिव्यायुद्ध चालू असते. एकंदर समाजाचे दोन्ही घटकच! एक धट्टाकट्टा दुसरा मठ्ठाकट्टा!किशोर पाठक