शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल्या सुटणारच!

By admin | Updated: March 11, 2016 03:32 IST

‘प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे’, अशी एक म्हण आहे आणि ती अगदी परिस्थितीचा कडेलोट झाल्याशिवाय सहसा वापरली जात नाही.

‘प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे’, अशी एक म्हण आहे आणि ती अगदी परिस्थितीचा कडेलोट झाल्याशिवाय सहसा वापरली जात नाही. पण देशातील सर्व राजकारण्यांच्या निर्ढावलेल्या निलाजरेपणाचा कडेलोट विजय मल्ल्या यांच्या प्रकरणात झाल्याचे बघून ही म्हण वापरल्याविना राहावत नाही. हवामानातील बदल आणि आर्थिक चढउतारांमुळे हातची पिके गेल्याने कर्ज परत करता येत नसल्याने महाराष्ट्रासह देशाच्या आणखी काही राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. त्यांच्या नावाने सगळे राजकारणी अश्रू ढाळत असतात आणि शेकडो कोटींची ‘पॅकेजेस’ही जाहीर केली जतात. महाराष्ट्रातील सेना-भाजपा युतीचे सरकार तर ‘कर्जमाफी’ नाही, ‘कर्जमुक्ती’वर भर देऊन शेतीतील पेचप्रसंग कायमचा संपवण्याची ग्वाही देत आहे. पण एका पाठोपाठ एक होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या थांबवण्यासाठी तातडीने काही केले जात नाही. मात्र कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी स्वत:चा जीव घेत असलेल्या या देशात राष्ट्रीयीकृत बँकांचे नऊ हजार कोटी बुडवून विजय मल्ल्या परदेशी जाता कामा नये, असे काही कोठल्या राजकारण्याला पोटतिडीकेने वाटत नाही. आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांबाबतचा राजकारण्यांचा कळवळा पुतना मावशीच्या धर्तीचा आहे आणि म्हणूनच हे राजकारणी ‘प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारे’ आहेत, असे म्हणणे भाग आहे. या राजकारण्यांचा निर्ढावलेला बनेलपणा इतका पराकोटीचा आहे की, मल्ल्या दोन मार्चलाच परदेशी गेले आणि त्याच दिवशी त्यांना कर्ज देणाऱ्या १९ बँकांनी ‘मल्ल्या यांचा पासपोर्ट जप्त करा, त्यांना परदेशी जाण्यापासून रोखा’, असा अर्ज सर्वोच्च न्यायालयात केला. त्यानंतर आठवडाभराने हा अर्ज सुनावणीसाठी आला, तेव्हा ‘मल्ल्या दोन मार्चला देश सोडून गेले’, असे भारताच्या अ‍ॅटर्नी जनरल यांनी शांतपणे न्यायालयाला सांगितले. अंमलबजावणी संचालनालय, सीबीआय वगैरे तपास यंत्रणांनी देशातील सर्व बंदरे, विमानतळ व इतर देशाबाहेर पडण्याच्या मार्गावरील ठाण्यांना मल्ल्या यांना देशाबाहेर जाऊ देऊ नका, अशा सूचना दिल्या असतानाही, ते गेले! म्हणजे मल्ल्या यांना ठरवून देशाबाहेर जाऊ द्यायचे आणि ‘आम्ही त्यांना जाऊ देण्यास आडकाठी केली होती, तरीही ते गेले’, असा हतबल पवित्रा घ्यायचा. देशातील एक प्रमुख उद्योगपती उघडपणे प्रवासी विमानाने ११ बॅगा घेऊन देशातील विमानतळावरून लंडनला जाणारे विमान पकडतो आणि कस्टम, इमिग्रेशन वा पोलीस यापैकी कोणालाही त्याचा पत्ता नसतो, यावर एखादा निव्वळ मूर्ख वा सत्ताधाऱ्यांवरील भक्तीने आंधळा झालेला माणूसच विश्वास ठेवेल. उघडच आहे की, मल्ल्या यांना देशाबाहेर जाऊ देण्यासाठी ‘डील’ ठरले आणि त्यांना जाऊ देण्यात आले. येथेच ‘प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्या’चा मुद्दा येतो. शेतकऱ्याने कर्ज फेडले नाही, म्हणून त्याच्या घरादारावर टाच आणली जाते, गावात व गोतावळ्यात त्याच्या अब्रूला धक्का बसतो व नैराश्याने तो आत्महत्त्या करतो. पण राष्ट्रीयीकृत बँकांची सहा ते सात लाख कोटींची कर्जे थकविणाऱ्या देशातील प्रमुख बड्या उद्योगपतींपैकी किती जणांच्या घरादारावर व उद्योगांवर टाच आली? येणेही शक्य नाही; कारण या बड्या धेंडांकडे पोत्यांनी पैसा आहे आणि लाखो रूपये फी देऊन बडे वकील नेऊन कायद्याच्या नावाने कज्जेदलाली करण्याची सोय त्यांना आहे. शेतकरी वा सर्वसामान्य कर्जदार हे करू शकत नाही. तरीही काँगे्रस म्हणणार ‘काँगे्रसका हात आम आदमीके साथ’ आणि भाजपा घोषणा देणार ‘सबका साथ, सबका विकास’. त्यांना गरीब हे फक्त मतांसाठी हवे असतात. बोफोर्स प्रकरणातील एक आरोपी आॅक्तोवियो क्वात्रोच्ची यांना नरसिंह राव सरकारने देशाबाहेर जाऊ दिले, म्हणून भाजपाने किती आकांडतांडव केले होते? सोनिया गांधी यांच्या नावाने तर भाजपाने गरळ ओकले होते. आज भाजपाच्या हातात सत्ता आहे आणि मल्ल्या यांना परदेशी जाऊ देण्यात आले. मग दोष कोणाचा? याला पंतप्रधान मोदी जबाबदार नाहीत? संघ परिवार साधनशुचितेच्या गप्पा मारतो, मग आता सांगणार काय मोदी यांना की हे घडले, त्याबद्दल देशाची माफी मागा? ‘आयपीएल’ म्हणजे सट्टेबाजी असल्याचे सारेच खाजगीत मान्य करतात. या सट्ट्यात हजारो कोटी कमावून इतरांना गंडा घालणाऱ्या ललित मोदी नावाच्या ‘सफेद बदमाषा’ला ‘संपुआ’ सरकारने परदेशी जाऊ दिले व मोदी सरकारातील परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्याला सोडवण्यासाठी ब्रिटिश प्रशासनाला साकडे घातले. अशी एक ना अनेक प्रकरणे आहेत. परस्परांवर कुरघोडी करण्यासाठी ती प्रसार माध्यमांचा वापर करून प्रकाशात आणली जातात, ती मतदारांच्या भावनांना हात घालण्याच्या उद्देशाने. एकदा सत्ता मिळाली की, अशी प्रकरणे तितक्याच निर्ढावलेल्या निलाजरेपणाने ‘चुनावी जुमला’ ठरवली जातात. म्हणूनच मल्ल्या परदेशी जाणारच होते व शेवटी अनेक वर्षे कज्जेदलाली झाल्यावर ते सुटणारही आहेत!