शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : राज्यातील परिस्थिती पाहता मतदारच मजबूत लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 05:52 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : सत्तारूढ भाजप व शिवसेना यांच्यातील युती पूर्ण झाली असे एक दिवस सांगितले जाते. मात्र दुसऱ्याच दिवशी ‘अजून काही जागांचा निकाल व्हायचा आहे’ असे म्हटले जाते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसही काही बोलत नाही.

प्रतिपक्षांचा उमेदवार जाहीर झाल्याखेरीज आपल्या पक्षाच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवायचे हा खेळ आता जुना झाला. तो नेहमी यशस्वी झाला असे नाही, अनेकदा तोंडावर आपटलादेखील. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काही पक्षांनीच ठरावीक जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत तर अन्य पक्षांनी अजून त्यांचे उमेदवार जाहीर करायचे आहेत. मतदानाची तारीख जाहीर झाली, निकालाची तारीखही उघड झाली आणि सरकारी यंत्रणाही निवडणुकीसाठी सज्ज आहे. मात्र, पक्षोपक्षातील लाथाडी व उमेदवारांची ओढाताण अजूनही संपली नाही.

सत्तारूढ भाजप व शिवसेना यांच्यातील युती पूर्ण झाली असे एक दिवस सांगितले जाते. मात्र दुस-याच दिवशी ‘अजून काही जागांचा निकाल व्हायचा आहे’ असे म्हटले जाते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी त्यांचे जागावाटप त्याच्या आकड्यानिशी निश्चित केले म्हणतात. पण या जागा कुणाला मिळणार याविषयी कुणीच काही बोलत नाही. भाजप सत्ताधारी आहे आणि त्या पक्षाने आपल्या पक्षाच्या प्रचाराची एक फेरी पूर्णही केली आहे. शिवसेनेची बालयात्राही कुठेकुठे फिरून आली आहे.
राष्ट्रवादीचे उत्साही नेते शरद पवार यांच्याही सभा ठिकठिकाणी झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते मात्र अद्याप सुस्त आहेत आणि ते त्यांच्या घराबाहेर सोडा पण फोटोतूनही बाहेर आले नाहीत. प्रचाराच्या जबाबदा-या निश्चित नाही. परिणामी, हा पक्ष ही निवडणूक लढविणार की नाही याचा संभ्रम लोकांना पडला आहे. दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या या पक्षाची त्याच्या आजच्या पुढाऱ्यांनी केलेली ही अवस्था त्यांच्याविषयी चीड व पक्षाविषयी कीव वाटायला लावणारी आहे. अवघ्या एका पराभवाने त्याची एवढी पडझड झाली असेल तर तो मुळातच मजबूत होता की नाही याची आपल्याला शंका यावी.कोणत्याही पक्षाचे पुढारी आत्मविश्वासाने बोलत नाहीत. भाजपचा अपवाद सोडला तर साºयांची भाषा ‘ततपप’ अशीच आहे. काँग्रेसने याच वर्षात देशातील तीन राज्ये जिंकली आहेत. तरीही त्याच्यात जरासा जोम येऊ नये, हा त्याच्या शक्तिपाताचा पुरावा म्हणायचा काय? राष्ट्र वादीत भांडणे आहे, रडारड आहे, समजुती आहेत आणि सारा पक्ष रिकामा झाला तरी त्याचे नेते खंबीर आहेत. शिवसेना सत्तेत आहे. युतीविषयीच्या खात्रीत आहे. पण तिला किती जागा सुटतील याची चिंता भेडसावत आहे. भाजप मात्र झाली तर युती, नाहीतर स्वबळावर अशी धमकीवजा भाषा बोलत आहे. त्या पक्षाला पैशाचे पाठबळ मोठे आहे आणि मोदींचा आधार भक्कम आहे, सत्तेत मश्गुल आहे.
काँग्रेसचे नेते मोठे आहेत, पण त्यांच्यातील गुंते सोडविण्यातच त्रस्त दिसत आहेत. राहुल गांधींचा अल्पसंन्यास संपत नाही. ज्योतिरादित्यांचा निकाल लागत नाही आणि पक्षाचे जे अध्यक्ष व उपाध्यक्ष गेलेत त्यांची तोंडओळखही महाराष्ट्राला फारशी नाही. बाळासाहेब थोरात सज्जन आहेत, पण डावपेचात कमजोर आहेत. पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्र समजायचा आहे तर अशोक चव्हाणांना तो ठाऊक आहे. पण ते अडगळीत आहेत. मतदार शाबूत आहेत, कार्यकर्ते मजबूत आहेत. पण नेत्यांचीच अशी दुरवस्था आहे. ही स्थिती आघाडीला फारशी अनुकूल नाही. सोनिया गांधी येतील, प्रियंका येईल आणि सारे काही ठीक होईल, हा आशावाद पुरेसा नाही. त्याला स्थानिक प्रयत्नांचे पाठबळ नाही आणि ते उभे होत नाही तोवर जबर शत्रूंशी पक्ष कसा लढा देईल? ज्योतिरादित्य सिंधिया यांना उमेदवारांच्या निवड समितीचे पक्षाने प्रमुख केले. पण ते महाराष्ट्रात कधी आलेच नाहीत. भाजपमध्येही सारे काही ठीक आहे असे नाही. खडसे नाराज आहेतच. गडकरी दुर्लक्षित आहेत. मुख्यमंत्र्यांखेरीज दुसरा चेहरा तो पक्ष पुढेही करीत नाही. ही स्थिती मतदारांनीच मजबूत होण्याची व तारतम्य राखून मतदान करण्याची आहे. हे तारतम्य त्यांच्यात अखेरपर्यंत टिकावे, एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करायची. कारण तोच लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस