शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
4
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
5
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
6
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
7
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
8
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार?
9
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
10
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
11
भावा जिंकलस! 'बिग बॉस १९'च्या टॉप ५मध्ये पोहोचला प्रणित मोरे, 'या' दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले
12
"भाऊ, मी तुलाही मानतो...", रितेश देशमुखच्या 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरेने दिलं उत्तर; पाहा Video
13
New Rules 1 December 2025: आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
14
Sunil Gavaskar: सचिन तेंडुलकर की कोहली? वनडेतील सर्वोत्तम फलंदाज कोण? गावस्कर म्हणाले...
15
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
16
'गुरुजन' इतके क्रूर होऊच कसे शकतात? आपण फार मोठी जोखीम स्वीकारतो आहोत
17
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
18
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
19
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
20
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : राज्यातील परिस्थिती पाहता मतदारच मजबूत लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 05:52 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : सत्तारूढ भाजप व शिवसेना यांच्यातील युती पूर्ण झाली असे एक दिवस सांगितले जाते. मात्र दुसऱ्याच दिवशी ‘अजून काही जागांचा निकाल व्हायचा आहे’ असे म्हटले जाते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसही काही बोलत नाही.

प्रतिपक्षांचा उमेदवार जाहीर झाल्याखेरीज आपल्या पक्षाच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवायचे हा खेळ आता जुना झाला. तो नेहमी यशस्वी झाला असे नाही, अनेकदा तोंडावर आपटलादेखील. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काही पक्षांनीच ठरावीक जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत तर अन्य पक्षांनी अजून त्यांचे उमेदवार जाहीर करायचे आहेत. मतदानाची तारीख जाहीर झाली, निकालाची तारीखही उघड झाली आणि सरकारी यंत्रणाही निवडणुकीसाठी सज्ज आहे. मात्र, पक्षोपक्षातील लाथाडी व उमेदवारांची ओढाताण अजूनही संपली नाही.

सत्तारूढ भाजप व शिवसेना यांच्यातील युती पूर्ण झाली असे एक दिवस सांगितले जाते. मात्र दुस-याच दिवशी ‘अजून काही जागांचा निकाल व्हायचा आहे’ असे म्हटले जाते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी त्यांचे जागावाटप त्याच्या आकड्यानिशी निश्चित केले म्हणतात. पण या जागा कुणाला मिळणार याविषयी कुणीच काही बोलत नाही. भाजप सत्ताधारी आहे आणि त्या पक्षाने आपल्या पक्षाच्या प्रचाराची एक फेरी पूर्णही केली आहे. शिवसेनेची बालयात्राही कुठेकुठे फिरून आली आहे.
राष्ट्रवादीचे उत्साही नेते शरद पवार यांच्याही सभा ठिकठिकाणी झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते मात्र अद्याप सुस्त आहेत आणि ते त्यांच्या घराबाहेर सोडा पण फोटोतूनही बाहेर आले नाहीत. प्रचाराच्या जबाबदा-या निश्चित नाही. परिणामी, हा पक्ष ही निवडणूक लढविणार की नाही याचा संभ्रम लोकांना पडला आहे. दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या या पक्षाची त्याच्या आजच्या पुढाऱ्यांनी केलेली ही अवस्था त्यांच्याविषयी चीड व पक्षाविषयी कीव वाटायला लावणारी आहे. अवघ्या एका पराभवाने त्याची एवढी पडझड झाली असेल तर तो मुळातच मजबूत होता की नाही याची आपल्याला शंका यावी.कोणत्याही पक्षाचे पुढारी आत्मविश्वासाने बोलत नाहीत. भाजपचा अपवाद सोडला तर साºयांची भाषा ‘ततपप’ अशीच आहे. काँग्रेसने याच वर्षात देशातील तीन राज्ये जिंकली आहेत. तरीही त्याच्यात जरासा जोम येऊ नये, हा त्याच्या शक्तिपाताचा पुरावा म्हणायचा काय? राष्ट्र वादीत भांडणे आहे, रडारड आहे, समजुती आहेत आणि सारा पक्ष रिकामा झाला तरी त्याचे नेते खंबीर आहेत. शिवसेना सत्तेत आहे. युतीविषयीच्या खात्रीत आहे. पण तिला किती जागा सुटतील याची चिंता भेडसावत आहे. भाजप मात्र झाली तर युती, नाहीतर स्वबळावर अशी धमकीवजा भाषा बोलत आहे. त्या पक्षाला पैशाचे पाठबळ मोठे आहे आणि मोदींचा आधार भक्कम आहे, सत्तेत मश्गुल आहे.
काँग्रेसचे नेते मोठे आहेत, पण त्यांच्यातील गुंते सोडविण्यातच त्रस्त दिसत आहेत. राहुल गांधींचा अल्पसंन्यास संपत नाही. ज्योतिरादित्यांचा निकाल लागत नाही आणि पक्षाचे जे अध्यक्ष व उपाध्यक्ष गेलेत त्यांची तोंडओळखही महाराष्ट्राला फारशी नाही. बाळासाहेब थोरात सज्जन आहेत, पण डावपेचात कमजोर आहेत. पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्र समजायचा आहे तर अशोक चव्हाणांना तो ठाऊक आहे. पण ते अडगळीत आहेत. मतदार शाबूत आहेत, कार्यकर्ते मजबूत आहेत. पण नेत्यांचीच अशी दुरवस्था आहे. ही स्थिती आघाडीला फारशी अनुकूल नाही. सोनिया गांधी येतील, प्रियंका येईल आणि सारे काही ठीक होईल, हा आशावाद पुरेसा नाही. त्याला स्थानिक प्रयत्नांचे पाठबळ नाही आणि ते उभे होत नाही तोवर जबर शत्रूंशी पक्ष कसा लढा देईल? ज्योतिरादित्य सिंधिया यांना उमेदवारांच्या निवड समितीचे पक्षाने प्रमुख केले. पण ते महाराष्ट्रात कधी आलेच नाहीत. भाजपमध्येही सारे काही ठीक आहे असे नाही. खडसे नाराज आहेतच. गडकरी दुर्लक्षित आहेत. मुख्यमंत्र्यांखेरीज दुसरा चेहरा तो पक्ष पुढेही करीत नाही. ही स्थिती मतदारांनीच मजबूत होण्याची व तारतम्य राखून मतदान करण्याची आहे. हे तारतम्य त्यांच्यात अखेरपर्यंत टिकावे, एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करायची. कारण तोच लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस