शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: महाराष्ट्रात सत्तास्थापनेची भाजपची फसलेली खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 05:42 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नंतर उद्धव ठाकरे हे रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत असायचे. आता उद्धव ठाकरे यांच्या हातीच सत्ता येणार आहे आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांना सरकार चालवावे लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस सरकारला एका दिवसाच्या आत विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगितल्यानंतर, काही तासांतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे फडणवीस सरकार तगणार नाही, हे स्पष्ट झालेच होते. फडणवीस यांनीही त्यामुळे आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपविला. त्यांचे सरकार जेमतेम ७८ तास टिकले. अजित पवार यांच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच आमदार आहेत, या भरवशावर भाजपचे नेते व देवेंद्र फडणवीस विश्वास ठेवून होते आणि त्या आधारेच त्यांनी सरकार बनविण्याचा खटाटोप केला, पण प्रत्यक्षात अजित पवार यांना शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसने एकटे पाडले, तेव्हाच हे सरकार टिकणार नाही, हे स्पष्ट झाले. भाजपने अजित पवार यांना सोबत घेण्याच्या खेळीमुळे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील ऐक्य अधिक मजबूत झाले.

या ऐक्यातील १६२चा जादुई आकडा तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी परेड करून आणि सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र राजभवनात सादर करून दाखवूनही दिला. त्यासाठी तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना एकत्र आणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवून, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची संधीच भाजपला मिळू दिली नाही, शिवाय तिन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांना ताबडतोब विश्वासदर्शक ठराव मांडायला लावा, असा आग्रह धरला. न्यायालयात जाण्याचा त्यांचा निर्णय यशस्वी ठरला. हा निर्णय अतिशय दूरगामी परिणाम करणारा आहे. अनेक राज्यांत भाजप व पूर्वी काँग्रेसने फोडाफोडी करून सरकारे स्थापन केली आहेत. गेल्या वर्षी कर्नाटकातही असे नाट्य पाहायला मिळाले होते, पण न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने एखाद्या पक्षाला संख्याबळ न तपासता सरकार स्थापण्याची संमती देण्याआधी राज्यपालही चार वेळा विचार करतील.आता हा मुद्दाच निकालात निघाला असून, महाविकासआघाडीचे सरकार राज्यात येणार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार, हे नक्की आहे. त्यात राष्ट्रवादी व काँग्रेस यांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल़ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापेक्षा शिवसेनेच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत़ या पक्षांनी कायम एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढविल्या आहेत. त्यामुळे आता किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सरकार चालविण्याचे या पक्षांनी ठरविले आहे. सत्तावाटपाच्या सूत्राबाबतही त्यांच्यात एकमत झाले आहे. हे मतैक्य राज्याचा कारभार चालविताना कायम राहावे आणि जनतेचे, विशेषत: आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अडथळे येऊ नयेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिघांना एकत्र आणण्यात आणि अजित पवार यांना भाजपपासून दूर करण्यात सर्वात मोठा वाटा शरद पवार यांचा आहे. त्यामुळे सरकार चालवितानाही त्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.
राज्यात कोणाचेही सरकार आले, तरी ते पाच वर्षे राहावे, अशी जनतेची इच्छा असते. सर्व राजकीय पक्षांनी सत्तेसाठी केलेले साटेलोटे लोकांना आवडलेले नाही. ही जनभावना लक्षात घेऊन, तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी यापुढे जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेतील काही नेत्यांना सरकारमधील कामाचा अनुभव आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नंतर उद्धव ठाकरे हे मात्र रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत असायचे. आता उद्धव यांच्या हातीच सत्ता येणार आहे. दोन्ही काँग्रेस व इतर पक्ष यांना न दुखावता कारभार हाकणे सोपे नाही. विरोधी बाकांवर १0५ आमदार असलेला भाजप असल्याने सतत सत्तासंघर्ष होतच राहील. तरीही विरोधी पक्षाचे महत्त्व जाणून त्यांचा सन्मान करणे, निर्णय घेताना विश्वासात घेणे हे उद्धव ठाकरे यांना करावे लागेल. भाजपने या सरकारला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असले, तरी ते मिळणे वाटते इतके सोपे नाही, पण भाजपनेही विरोधासाठी विरोध न करता राज्याच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घ्यायला हवी. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस