शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

हे राज्य असेच चालो

By admin | Updated: January 14, 2016 04:07 IST

मनुष्यबळ व्यवस्थापन शास्त्रात ‘पीटर प्रिन्सिपल्स’ असा एक सिद्धांत आहे व त्यात अनेक उपसिद्धांत आहेत. त्यातील एक म्हणजे ‘अकार्यक्षमतेची सीमा’. एखादी व्यक्ती प्रचंड

मनुष्यबळ व्यवस्थापन शास्त्रात ‘पीटर प्रिन्सिपल्स’ असा एक सिद्धांत आहे व त्यात अनेक उपसिद्धांत आहेत. त्यातील एक म्हणजे ‘अकार्यक्षमतेची सीमा’. एखादी व्यक्ती प्रचंड कार्यक्षम म्हणून जेव्हां ठरविली जाते तेव्हांच ती वरच्या पदासाठीची अकार्यक्षमतेची सीमा स्पर्शून जाते असे हा उपसिद्धांत सांगतो. राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता होती तेव्हां विरोधात असलेल्या भाजपातील देवेन्द्र फडणवीस हे एक अत्यंत कार्यक्षम, अभ्यासू, धडाडीचे वगैरे वगैरे आमदार म्हणून ओळखले जात होते. ही ओळख चुकीची नव्हती. कदाचित त्यामुळेच राज्यातील भाजपातल्याच अनेकांच्या मनातील मांडे तसेच ठेऊन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी फडणवीस यांची निवड केली. पण बहुधा तिथेच वरील उपसिद्धांत लागू झाला. गेल्या वर्षभराच्या कारभारानंतरही फडणवीस आणि त्यांच्या सरकारचे चाचपडणेच सुरु असल्याचे लोकाना जाणवू लागले आहे. बोलणे आणि सतत बोलतच राहणे यापलीकडे अजून जनतेच्या पदरी काही पडलेले नाही. कदाचित दुष्काळी स्थिती आणि ‘मागील राजवटीची कथित अनागोंदी’ यापायी इच्छा असूनही फडणवीस सरकार काही करु शकत नसेल! पण आधी राज्याच्या मतदारांनी आणि नंतर मोदींनी राज्यशकट चालविण्याची व त्यासाठी प्रशासनास सोबत घेण्याची जी जबाबदारी सोपविली तीदेखील पूर्ण होताना दिसत नाही. उलट प्रशासनावर अशा पद्धतीने आरोप केले जात आहेत जणू लोकनियुक्त सरकार आणि प्रशासन या दोन समांतर शक्ती वा संघटना आहेत आणि त्याच्यात उभा दावा आहे. तरीही फडणवीस सरकारच्या आजवरच्या एकूणच कारभाराची लिटमस टेस्ट म्हणून राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांकडे पाहाता येईल. गेल्या काही महिन्यांपासून भुजबळांवर विद्यमान सरकारने आरोपांची जी सरबत्ती केली आणि लाचलुचपत प्रतिबंध खाते ज्या नित्यनेमाने भुजबळांवरील आरोपांची व त्याबाबतच्या चौकशीची बित्तंबातमी माध्यमाना देत राहिले ते लक्षात घेता भुजबळांचे आता काही खरे नाही व कोणत्याही क्षणी ते गजाआड गेलेले दिसतील असेच चित्र निर्माण झाले होते. पण आज निर्माण झालेल्या चित्रातून काय दिसते? त्यांच्या विरुद्धच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभाग लेखी स्वरुपात देतो व त्यावर संबंधित मंत्र्याची सही असते. या निर्वाळ्याला पाय फुटतात तेव्हां मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्रीदेखील न पटणारे खुलासे करतात. भुजबळ दोषीच असल्याचे निर्वाळे देतात. तेव्हां तेच भुजबळ या सरकारला खुले आव्हान देऊन मोकळे होतात. सरकार तुमचे, सार्वजनिक बांधकाम विभाग तुमचा मग करा ना कारवाई असा जणू दमच भुजबळ देतात. यावर नोकरशाहीच्या जुन्या वाईट खोडी अद्याप गेलेल्या नाहीत व ती आघाडी सरकारशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले जाते. असे जाहीरपणे सांगणे ही विद्यमान सरकारची नामुष्की तर आहेच पण त्याहून महत्वाचे म्हणजे आघाडी सरकारच्या कारभाराला वैतागून ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला तडादेखील आहे.