शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीचे फुटके नशीब

By admin | Updated: October 21, 2015 04:04 IST

जायकवाडीचे पाणी मिळविण्यासाठी राजकीय आणि सामाजिक आघाडीवर एवढी सामसूम असेल, तर कर्मदरिद्रीपणाचा कळस यापेक्षा काय असू शकतो?

- सुधीर महाजनजायकवाडीचे पाणी मिळविण्यासाठी राजकीय आणि सामाजिक आघाडीवर एवढी सामसूम असेल, तर कर्मदरिद्रीपणाचा कळस यापेक्षा काय असू शकतो?मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना नगर-नाशिकमध्ये रब्बीच्या हंगामाची तयारी सुरू आहे, तीसुद्धा मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर. गोदावरीचे पाणी समन्यायी तत्त्वाने मिळावे या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळानेदेखील मराठवाड्याची १२.८४ द.ल.घ.मी. पाण्यावर बोळवण केली आणि एवढेसुद्धा पाणी द्यावे लागू नये यासाठी नगरमध्ये उच्च न्यायालयात जाण्याची तयारी चालू आहे. गोदावरी नदीवर पैठणला असलेल्या जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक जिल्ह्यातून हक्काचे पाणी सोडावे यासाठी हा आटापिटा चालू आहे. महामंडळाने १२.८४ द.ल.घ.मी. पाणी सोडण्याचा निर्णय घेतला; परंतु मराठवाड्यासाठी हक्काचे २२ द.ल.घ.मी. पाणी मिळायला पाहिजे. गेल्या वर्षी ७.११ द.ल.घ.मी. पाणी सोडले; त्यापैकी केवळ चार द.ल.घ.मी. पाणी येथपर्यंत पोहोचले. मुळात मराठवाड्याचा पाणीप्रश्न हा अलीकडे निर्माण झाला. जायकवाडीच्या वर गोदावरी नदीवर धरणे बांधू नयेत, असा निर्णय २००४ साली सरकारने घेतला होता; परंतु राजकीय दांडगाईने निळवंडेसारखी धरणे बांधण्यात आली. याचा परिणाम जायकवाडीत येणाऱ्या पाण्यावर झाला. गेल्या वर्षी उशिरा पाणी सोडले, त्यामुळे निम्मे पाणी तर कोरड्या जमिनीतच मुरले. आता पाणी सोडले तरी किमान चार द.ल.घ.मी. पाणी नदीतच मुरणार. म्हणजे फक्त आठ-साडेआठ द.ल.घ.मी. पाणी जायकवाडीत पोहोचणार.या पाण्यामुळे औरंगाबाद, जालना, नांदेड या मोठ्या शहरांसह गोदाकाठच्या अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. पाणी १५ आॅक्टोबरपर्यंत सोडायला हवे होते; पण महामंडळानेच उशिरा निर्णय घेतला. वास्तविक हे पाणी साठ्याचा अंदाज घेऊन जुलै-आॅगस्टमध्येच सोडायला पाहिजे, त्यावेळी पाण्याची नासाडी कमी होते; परंतु नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणे अगोदर भरून घेतली जातात. आताही पाणी सोडताना धरणांमधील साठा तपासला पाहिजे. शिवाय मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन थोडे जास्तीचे पाणी सोडले तर योग्य होईल. पाणी सोडताना काही निकष कसोशीने पाळले पाहिजेत. एक तर कालवे भरून घेतले जाऊ नयेत. कालवे, छोटे तलाव यातील पाणीसाठा तपासला जावा, वीजपुरवठा बंद ठेवावा. पाण्याच्या या मुद्यावर अहमदनगरमधील राजकीय नेते पक्ष आणि वैयक्तिक पातळीवरील मतभेद विसरून एकत्र येताना नेहमीच दिसतात. गेल्या वेळी आंदोलन झाले होते आणि आता जुळवाजुळव चालू आहे. एकीकडे पाण्याच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारायचे आणि दुसरीकडे न्यायालयात लढाई लढायची; शिवाय राजकीय ताकदीचा वापर करायचा, अशा तीन पातळ्यांवर नगरकर सक्रिय असतात. मराठवाड्यात अशा जनआंदोलन आणि राजकीय प्रयत्नांचाही दुष्काळ आहे. जायकवाडीचे हक्काचे पाणी मिळविण्यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरत नाही आणि जनताही सुस्त आहे. आमचे पाणी पळविले अशी कोणी ओरडही करीत नाही. मराठवाडा जनता विकास परिषद निष्ठेने हा प्रश्न लावून धरते. गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या तोंडावर गंगापूर-खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी जायकवाडीच्या वरची धरणे बॉम्बने उडवा, अशी गर्जना केली. बंब हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. हा प्रश्न त्यांच्याच सरकारकडे मांडून ते हक्काचे पाणी आणू शकले असते; पण सत्ताधारी आहोत याचा त्यांना विसर पडला असावा. प्रसार माध्यमांमध्ये घोषणा करून पाणी मिळत नसते. पिंडाला कावळा शिवला या पद्धतीने त्यांनी ‘टायमिंग’ साधून घोषणा केली आणि पाणी सोडल्यानंतर आपल्या प्रयत्नांमुळेच पाणी मिळाले, असे म्हणायलाही ते मोकळे झाले. पैठणच्या आमदारांच्या तर हा प्रश्न गावीही नाही. हे सारे सत्ताधारी आहेत. राजकीय आणि सामाजिक आघाडीवर एवढी सामसूम असेल, तर जायकवाडी तहानलेलेच राहणार. कर्मदरिद्रीपणाचा कळस यापेक्षा आणखी काय असू शकतो?