शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

इकलाखची हत्त्या ‘धर्माज्ञेनुसार’ ?

By admin | Updated: October 21, 2015 04:13 IST

उत्तर प्रदेशातील दादरीच्या अहमद इकलाखच्या घरी गोमांस दडविले असल्याची फसवी घोषणा करायला काही गुन्हेगारांनी त्या गावच्या पुजाऱ्याला धमकावले आणि त्याने ती मंदिरावरच्या

उत्तर प्रदेशातील दादरीच्या अहमद इकलाखच्या घरी गोमांस दडविले असल्याची फसवी घोषणा करायला काही गुन्हेगारांनी त्या गावच्या पुजाऱ्याला धमकावले आणि त्याने ती मंदिरावरच्या ध्वनीक्षेपकावरून करताच या गुन्हेगारांचा जमाव इकलाखच्या घरावर चालून गेला आणि त्याने इकलाखला दगडांनी ठेचून ठार मारले. हा सारा प्रकार गोमांस दडवून ठेवण्याच्या अफवेतून म्हणजे गैरसमजातून झाला अशी उपरती त्या गुन्हेगारांनी व त्यांच्या पाठिराख्या पक्ष व संघटनांनी जाहीर केली. पण इकलाख मारला गेला तो गेलाच. त्याच्या धर्मबांधवांनी आपले गाव सोडले आणि साऱ्या नोएडा परिसरातच त्यामुळे धार्मिक दहशत कायम झाली. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादवांचे सरकार आहे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी आहे असे म्हणून संघ वा भाजपाला खुनाच्या या अपराधातून स्वत:ची सुटका करून घेता येणार नाही. कारण उत्तर प्रदेशातच नव्हे तर साऱ्या देशात सध्या धर्माचे जे उन्मादी वातावरण उभे केले जात आहे आणि त्याला अल्पसंख्यकांविषयीच्या द्वेषाची जोड दिली जात आहे त्या साऱ्यामागे संघ परिवाराशी संबंध असलेल्या संस्था व संघटनाच आहेत हे आता शाळकरी मुलांनाही समजणारे आहे. नेमक्या याच स्थितीत पांचजन्य या संघाच्या मुखपत्राने या साऱ्यावर कडी करीत ‘गोमांस खाणाऱ्याची हत्त्या करण्याची धर्माज्ञा वेदांनीच देऊन ठेवली असल्याचे’ सांगून इकलाखची हत्त्या नुसती वैधच नव्हे तर धार्मिकही आहे असे सांगून टाकले आहे. पांचजन्यच्या या आगाऊपणामुळे मूळचे धास्तावलेले संघ परिवाराचे लोक मागे सरल्याचे व त्याच्या भूमिकेपासून आपण लांब असल्याचे आता सांगू लागले आहेत. वेदांमध्ये आणखी खोलवर गेल्यास त्यात गोमांसाचा व त्याच्या यज्ञादिकातच नव्हे तर धार्मिक सोहळ््यात कसा वापर होत असे तेही आढळणारे आहे. मात्र पांचजन्यने तिकडे दुर्लक्ष करून आपल्याला सोईची ठरतील तेवढीच सूक्ते आधाराला घेतली आहेत. आपली चंबळ नदी ही पूर्वी चर्मण्वती म्हणून ओळखली जायची. तिचे ते नाव कोणा रंतीनाथ नावाच्या राजाने यज्ञात केलेल्या पशुंच्या अगणित हत्त्येतून (म्हणजे त्यांच्या रक्त व मांसातून निर्माण झालेल्या प्रवाहातून) मिळाले ही कथाही आपल्या पुराणात आहे. (पाहा, पं. महादेवशास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृतीकोश) पण ती आता उगाळण्यात अर्थ नाही. कारण कधीकाळी लिहिले गेलेले व अपौरुषेय मानले गेलेले आपले वेद आणखीही बरेच काही सांगणारे आहेत. मात्र ते वाचले जात नसल्यामुळेच त्यातली सत्ये वा गृहीते आपल्यापर्यंत पोहचत नाहीत. मुळात सगळ््याच प्राचीन धर्मग्रंथात व धर्मांच्या इतिहासात अशा आज्ञा आहेत. रोमने चौथ्या शतकात ‘सगळ््या स्वतंत्र विचारांच्या स्त्रिया चेटकिणी असून त्या मृत्यूदंडास पात्र आहेत’ अशी आज्ञा काढली होती. तर कुराण शरीफ या इस्लामच्या पवित्र धर्मग्रंथाने आणि त्यावर लिहिल्या गेलेल्या हदीस या धर्मभाष्याने ‘मुसलमान, ख्रिश्चन व ज्यू हे किताबी ग्रंथांचे पालन करणारे (ज्यांचा धर्मग्रंथ एकच आहे असे) लोक सोडून जगातले बाकीचे सगळेच वध्य असल्याचे’ म्हटले आहे. यातल्या ख्रिश्चनांनी व ज्यूंनी त्यांचे धर्मग्रंथ जुने झाल्यामुळे कुराण शरीफानुसार ते दुरुस्त करून घ्यावे आणि कर देऊन जिवंत राहण्याचा अधिकार प्राप्त करावा अशी सूटच तेवढी त्यांना दिली आहे. बाकी बौद्ध, हिंदू, जैन व अन्य धर्माचे लोक केवळ वध्यच आहेत अशी आज्ञा त्यात केली आहे. पांचजन्यच्या सांगण्यानुसार भारतातील वैदिकांनी वेदातल्या ‘त्या’ आज्ञेचे पालन करायचे तर त्याच न्यायाने जगभरच्या मुसलमानांना कुराण शरीफ व हदीस यांच्या उपरोक्त आज्ञांचे पालन करण्याचाही अधिकार प्राप्त होतो. अल् कायदा, तालिबान किंवा इसीस या धर्मांध संघटनांचे दावे आणि त्यांनी चालविलेल्या अन्य व स्वधर्मीयांच्या कत्तली याहून वेगळ््या नसल्याने त्या धर्माच्या आज्ञेत बसणाऱ्याच आहेत. पांचजन्यवाल्यांना आपल्या हिंदू वैदिकांमध्येही अशी तालिबानी व अल् कायदासारखी खुनी प्रवृत्ती निर्माण करायची आहे काय? त्यातून पांचजन्य हे संघाचे मुखपत्र असून संघ आपल्या भूमिका त्याद्वारे गेली कित्येक दशके मांडत आला आहे. त्यात जे छापून येते ते संघाचे मत असल्याचे संघाचे स्वयंसेवक,पाठीराखे, चाहते व नेतेही आजवर मानत आले. पांचजन्यमध्ये हा लेख प्रकाशीत झाल्यानंतर ‘आम्ही त्या भूमिकेपासून दूर आहोत’ असे या संघटनांच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. मात्र तेवढे म्हणणे संघ वा भाजपासाठी पुरेसे नाही. त्या म्हणण्यामागे जो रक्तरंजित विचार उभा आहे त्याबाबतही त्यांनी बोलले पाहिजे व आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. पांचजन्य या नियतकालिकाच्या संपादकपदावर एकेकाळी अटलबिहारी वाजपेयींसारखा सोज्वळ व सर्वसमावेशक वृत्तीचा विचारी संपादक राहिला आहे. आताचे त्याचे स्वरुप वाजपेयींच्या नावाला व त्यांनी घडविलेल्या इतिहासाला नुसते खाली आणणारेच नाही तर काळिमा फासणारेही आहे. धर्मातली जुनी वचने वर्तमानाला लागू करण्याचा प्रयत्न हा नुसता सनातनीच नाही तर धर्मांध असल्याचा पुरावा आहे. पांचजन्यसारखे संघाचे मुखपत्र म्हणविणारे नियतकालिक तो प्रयत्न आज करीत असेल तर त्याची शहानिशा अपराधी वृत्तीचा पुरस्कार करणारे पत्र अशीच करणे भाग आहे.