शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आडवी उभी झाली!

By admin | Updated: April 7, 2016 00:14 IST

केरळ आणि त्या पाठोपाठ बिहार या दोन राज्यांनी संपूर्ण दारुबंदीचे धोरण अंमलात आणले म्हणून या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत आणि कौतुक

केरळ आणि त्या पाठोपाठ बिहार या दोन राज्यांनी संपूर्ण दारुबंदीचे धोरण अंमलात आणले म्हणून या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत आणि कौतुक होणे स्वाभाविकच आहे. महाराष्ट्रातही नवे सरकार स्थापन झाल्यानंतर दोन जिल्ह्यांमध्ये दारुबंदी लागू करण्याचा निर्णय लागू करण्यात आला म्हणून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अनेकांनी आणि विशेषत: महिलांनी उत्स्फूर्त अभिनंदन केले. दारुबंदीचे धोरण अंमलात आल्यापासूनच्या वर्षभरात दोन्ही जिल्ह्यातील अपघात आणि एकूणच गुन्हेगारीत घट झाल्याचे मध्यंतरी जाहीर करण्यात आले. अर्थात त्याचवेळी राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मात्र अर्थमंत्र्यांच्या या निर्णयामुळे सरकारी महसुलात घट झाल्याबद्दल त्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीतच चार खडे शब्द सुनावल्याचे वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. दारुबंदीचा तो निर्णय नेमका कशातून आला, लोकानुनयातून की दारुच्या सक्त विरोधातून यावर चर्चा होऊ शकते, पण मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातल्या एका गावाची जी कहाणी आता प्रसिद्ध झाली आहे ती मात्र साऱ्यांनाच चक्रावून सोडणारी आहे. ग्रामसभेत बहुमताने जर दारुच्या दुकानास विरोध झाला तर संबंधित गावातील ‘सरकारी दारु’चे दुकान बंद करावे असा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. या निर्णयानुसार संबंधित गावातील महिलांनी पुढाकार घेऊन सुमारे अकरा वर्षांपूर्वीच त्या गावातील दारुची उभी बाटली आडवी केली. पण आता त्याच महिलांनी आठ महिन्यांपूर्वी पुढाकार घेऊन ग्रामसभेत दारुच्या दुकानाला परवानगी मिळावी असा ठराव बहुमताने संमत केला आणि आडवी बाटली उभी होऊन आता तिथे थाटामाटात दारुचे दुकान सुरु झाले आहे. यामागील कारणच खरे चक्रावून सोडणारे आहे. कारण काय तर म्हणे या गावात दारु मिळत नाही म्हणून आजूबाजूच्या गावातील व्यापाऱ्यांनी म्हणे तिथे येणे-जाणेच पूर्णपणे थांबवून टाकले. त्याचा स्थानिक व्यापारावर तर परिणाम होत गेलाच शिवाय गावकऱ्यांची गैरसोय होत असतानाच गावाच्या अर्थकारणावरही त्याचा प्रतिकूल परिणाम होत गेला. याचा अर्थ खडसे यांनी दारुचा आणि अर्थकारणाचा जो संबंध जोडला, तो या गावातही दिसून आला. अर्थात गावात सरकारी दारु मिळत नव्हती म्हणजे गावठीही मिळत नव्हती असे नव्हे. जिथे कुठे कोणतीही बंदी असते तिथे अवैध धंद्याला बरकत येतच असते.