शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

गुलशन-ए-ब्लास्ट

By admin | Updated: April 6, 2016 04:54 IST

शेजाऱ्याच्याघरात आग लावण्याची स्वप्ने पाहावीत आणि शेजार पेटण्याच्या आधी स्वत:चेच घर रोज थोडे थोडे जळावे, अशी काही गत पाकिस्तानची झाली आहे

शेजाऱ्याच्याघरात आग लावण्याची स्वप्ने पाहावीत आणि शेजार पेटण्याच्या आधी स्वत:चेच घर रोज थोडे थोडे जळावे, अशी काही गत पाकिस्तानची झाली आहे. दहशतवाद्यांना पोसून भारताला कायम अस्थिर ठेवण्याचे मनसुबे बाळगणारा पाकिस्तान स्वत: मात्र अस्थिरतेतून बाहेर पडू शकलेला नाही. लाहोर शहराच्या पूर्व भागात असलेल्या गुलशन-ए-इक्बाल नावाच्या पार्कमध्ये रविवारी गर्दीच्या दिवशीच दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला; त्यातून पुन्हा एकदा हेच अधोरेखित झाले. या पार्कमध्ये घडविण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात तब्बल ७२ निष्पाप पाकिस्तानी नागरिकांचा बळी गेला आणि अडीचशेहून अधिक जण जखमी झाले. ज्यांनी हे दुष्कृत्य केले ते पाकिस्तानातच वाढलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. गेल्या तीन महिन्यांमध्ये पाकिस्तानात एकूण १३ दहशतवादी हल्ले झाले असून, त्यात जवळपास दीडशे लोकांचा बळी गेला आहे. भारताला कायम धुमसत ठेवण्यासाठी पाळलेले दहशतवाद्यांच्या रूपातील साप पाकिस्तानलाच डंख करू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्य:स्थितीत पाकिस्तानात एकूण ४८ दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. त्यातल्या तब्बल १२ संघटना पाकिस्तानातच जन्माला आलेल्या आहेत. लाहोरमध्ये नुकताच झालेला हल्ला हा अशाच स्वगृही जन्मलेल्या ‘जमात-उल-अहरार’ या दहशतवादी संघटनेची ‘कृपा’ ठरली आहे. ‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ या संघटनेपासून विभक्त झाल्यानंतर या संघटनेने अधिक क्रूरपणे हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया संघटनेसोबत अर्थात इसिससोबत ‘जमात-उल-अहरार’चा संबंध असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे पाकिस्तानवर किती मोठे संकट येऊ घातलेय, याची जाणीव एव्हाना नवाज शरीफ यांच्या सरकारला व्हायला हवी होती. इसिससोबत संबंध ठेवणाऱ्या संघटना जर पाकिस्तानात पोसल्या जाणार असतील तर इराक आणि सीरियामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे, तीच स्थिती पाकमध्येही उद्भवेल, यात तिळमात्र शंका नाही. इसिसने इराक-सीरियात घातलेला धुमाकूळ आणि इतर पश्चिमी देशांवर केलेले हल्ले नजरेसमोर आणले तर मुस्लीम राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानवर इसिसच्या रूपातील मोठे संकट येऊ घातले आहे हे निश्चित. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी अमेरिकेकडून कोट्यवधी डॉलरचा निधी खिशात घालणारा पाकिस्तान असेच जर वागत राहिला तर तेथील जनतेला आपल्याच देशात राहणे नकोसे होईल आणि पाक म्हणजे कायम बॉम्बस्फोटांनी धुमसत राहणारे गुलशन-ए-ब्लास्ट’ होऊन जाईल.