शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद
2
पुश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
3
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
4
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
5
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
6
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
7
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
8
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
9
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
10
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
11
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
12
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
13
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
14
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
15
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
16
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
17
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
18
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
19
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
20
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
Daily Top 2Weekly Top 5

जेनेरिक तंबी

By admin | Updated: April 25, 2017 23:39 IST

रुग्णांना औषधांचे प्रिस्क्रिप्शन देताना ब्रॅण्डेडऐवजी जेनेरिक औषधांचीच नावे द्यावीत आणि विशेष म्हणजे ही चिठ्ठी सुवाच्य अक्षरात असावी

रुग्णांना औषधांचे प्रिस्क्रिप्शन देताना ब्रॅण्डेडऐवजी जेनेरिक औषधांचीच नावे द्यावीत आणि विशेष म्हणजे ही चिठ्ठी सुवाच्य अक्षरात असावी, अशी तंबी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने देशभरातील डॉक्टरांना दिली आहे. गेल्या आठवड्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधेच लिहून द्यावीत यासाठी कायदा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर मेडिकल कौन्सिलचा हा आदेश आला आहे. हे दोन्ही निर्णय प्रत्यक्ष अमलात आले तर या देशातील लाखो-करोडो लोकांना औषधोपचारावरील खर्चातून फार मोठा दिलासा मिळणार आहे. आज आजारपण म्हटले की मोठमोठ्यांना धडकी भरते. ही भीती बव्हंशी आजारापेक्षाही त्यावर उपचारासाठी होणाऱ्या खर्चाची असते. या महागड्या औषधोपचारांनी बरेचदा श्रीमंत लोकच देशोधडीला लागतात तेथे गरिबांचे काय? त्यांच्यावर तर औषधपाण्याविना जीव गमावण्याचीही वेळ येते. खरे तर सर्दीपडशापासून बऱ्याचशा गंभीर आजारांवरही जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत. या दोन्ही औषधांचे परिणामही सारखेच असतात. पण डॉक्टर केवळ ब्रॅण्डेड औषधे घेण्याचाच सल्ला रुग्णांना देतात हा सार्वत्रिक अनुभव आहे आणि आप्तेष्टांच्या जिवाचा धोका पत्करण्याची मानसिकता रुग्णांच्या नातेवाइकांची नसते. त्यामुळे डॉक्टर सांगतील तीच औषधे खरेदी केली जातात. परिणामी त्यांना अनेकदा कर्जबाजारी व्हावे लागते, घरदार विकावे लागते. तसे बघता या दोन्ही औषधांच्या किमतीत प्रचंड तफावत आहे. तरीही डॉक्टर जेनेरिकला प्राधान्य का देत नाहीत, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. आणि त्याचे उत्तर सरळसरळ औषध कंपन्यांचे अर्थकारण तसेच डॉक्टरांसोबतच्या त्यांच्या हितसंबंधांमध्ये दडलेले आहे. त्यामुळे आता जेनेरिक औषधांबाबत कायदा झाल्यास त्याचा या औषध कंपन्या व डॉक्टरांनाही फार मोठा फटका बसणार हे स्पष्ट आहे. अशात या कंपन्या त्यात अडथळा निर्माण करण्यासाठी काहीतरी कुरापती करतीलच. पण शासनालाही जेनेरिक औषधांची ही चळवळ यशस्वी करण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर कठोर कायद्यासोबतच सर्वत्र ही औषधी सहज कशी उपलब्ध होतील याची प्रथम व्यवस्था करावी लागणार आहे. सद्यस्थितीत देशभरात जेनेरिक औषधांची केवळ १,१९४ दुकाने आहेत. त्यापैकी ८१ एकट्या महाराष्ट्रातच आहेत, हे विशेष ! या दुकानांमध्येही अनेकदा औषधांचा पुरेसा साठा नसतो. त्यामुळे सर्वप्रथम या दुकानांची संख्या वाढवावी लागेल. याशिवाय रुग्णालये आणि नर्सिंग होममधील औषधालयांमध्येसुद्धा ती उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केमिस्टच्या दुकानांतही ती मिळतील, असे बघितले पाहिजे. अन्यथा डॉक्टरांनी लिहून दिल्यावरही जेनेरिक औषध मिळाले नाहीतर रुग्णांना नाइलाजास्तव महागडी औषधे खरेदी करावी लागतील आणि सर्वसामान्यांना माफक खर्चात आरोग्यसेवेची सरकारची मनीषा अपूर्ण राहील.