शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून शरद पवार, ममता बॅनर्जी, नवीन पटनाईक यांच्यासह सर्व पक्षांचा मोदी सरकारला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 06:36 IST

हा टापू वादग्रस्त होता (भारताचा नव्हता) असे मानले तर भारताची भूमी बळकाविली गेलेली नाही हे मोदींचे विधान बरोबर ठरते

ही कोणा एका पक्षामुळे निर्माण झालेली नाही. कम्युनिस्ट चीनच्या जन्मापासून चालत आलेला तो वारसा आहे. ती समस्या सोडविण्याची जबाबदारी सध्याचे सरकार म्हणून भाजपची आहे, तशीच सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेला पक्ष म्हणून काँग्रेसचीही आहे. गलवान खोऱ्यातील चीनच्या आक्रमणासंबंधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या खुलाशावरून वादंग उठले आहे. सीमेवरील पेचप्रसंगाची माहिती देण्यासाठी मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली. त्यावेळी मोदी यांनी केलेले विधान वादाचा विषय झाला. चीनने भारताची इंचभरही भूमी बळकाविलेली नाही, असे विधान मोदी यांनी केले. राजनैतिक भाषेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर मोदी यांचे विधान बरोबर आहे. गलवान खोºयामध्ये झालेला झगडा हा वादग्रस्त टापूमध्ये झालेला आहे. हा टापू ना भारताच्या हद्दीत आहे ना चीनच्या. हा टापू आपला आहे, असे दोन्ही देश मानतात. आजपर्यंत हा दावा कागदावर होता. आता चीनने या टापूत सैन्य घुसवून तेथे लष्करी हक्क प्रस्थापित केला आहे. म्हणजे वादग्रस्त टापूतील भाग चीनने बळकावला आहे. हा टापू वादग्रस्त होता (भारताचा नव्हता) असे मानले तर भारताची भूमी बळकाविली गेलेली नाही हे मोदींचे विधान बरोबर ठरते; परंतु या टापूवर भारत हक्क सांगत होता हे लक्षात घेतले, तर आपण दावा करीत असलेली भूमी चीनने ताब्यात घेतली, असाही अर्थ होतो.

हाच अर्थ घेऊन काँग्रेस आणि काँग्रेसच्या मुशीतील तज्ज्ञ मोदींवर प्रश्नांची बरसात करीत आहेत. त्यांचा प्रश्न योग्य असला, तरी गेली ५८ वर्षे हा टापू वादग्रस्त का राहिला, सीमा निश्चित का केली गेली नाही, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस देत नसल्याने काँग्रेसच्या प्रश्नांचे वजन कमी होते. मोदींचे विधान जनतेला सहज पटणारे नाही. चीनबरोबरची समस्या नेमकी काय आहे, हे विश्वासाने जनतेला सांगण्यात मोदी कमी पडत आहेत. त्याचबरोबर या समस्येचे धागेदोरे व त्याची उकल कशी करावी हे सांगण्यात काँग्रेसही कमी पडत आहे. चीनबरोबरची समस्या ही कोणा एका पक्षामुळे निर्माण झालेली नाही. कम्युनिस्ट चीनच्या जन्मापासून चालत आलेला तो वारसा आहे. ती समस्या सोडविण्याची जबाबदारी सध्याचे सरकार म्हणून भाजपची आहे, तशीच सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेला पक्ष म्हणून काँग्रेसचीही आहे. काँग्रेसने मोदींना केलेले प्रश्न, खासगी चित्रवाणी वाहिन्यांतील सूत्रसंचालक करतात तशा धाटणीचे आहेत. सोशल मीडियावर त्याला लाइक्स मिळत असतील; परंतु सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून यापेक्षा प्रगल्भ प्रश्न विचारले गेले पाहिजेत. चीनबरोबरच्या समस्येवर तोडगा काय आणि तो अमलात आणण्यासाठी २०१४ पर्यंत कोणत्या पातळीवर प्रयत्न झाले होते, त्यात किती यशापयश आले होते व आता काय चुकते आहे, हे काँग्रेसने जनतेसमोर मांडले तर पक्षाची प्रतिमा उंचावेल. या समस्येचा सर्वांगाने विचार केलेली, चीनबरोबरच्या प्रत्यक्ष चर्चेत सहभागी झालेली अनेक नेतेमंडळी काँग्रेसकडे आहेत. त्यांना समोर आणून मोदींना प्रश्न करण्याऐवजी सोशल मीडियातील लाइक्सकडे लक्ष ठेवून प्रश्न विचारले गेले, तर काँग्रेस पक्षाबाबत विश्वास वाढणार नाही. यामुळे जनतेच्या मनातील संभ्रमही विनाकारण वाढत जाईल. प्रादेशिक पातळीवरील रोखठोक वाचाळवीरांचे अनुकरण काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी करू नये. जे भान काँग्रेसला नाही, ते अन्य पक्षांनी दाखविले. देशातील जनतेच्या मनातील क्षोभ लक्षात घेऊन या पक्षांनी एकजुटीचे धोरण अवलंबिले.
शरद पवार, ममता बॅनर्जी, नवीन पटनाईक यांच्यासह सर्व पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला. पंतप्रधानांबरोबर व्हिडिओ बैठक होऊ नये म्हणून सोनिया गांधींनी केलेल्या प्रयत्नांना या पक्षांनी पाठिंबा दिला नाही; कारण सध्याच्या परिस्थितीत तसे करणे अयोग्य आहे, हे वास्तव या पक्षाच्या नेत्यांना चांगले समजते. यामुळे काँग्रेस पक्ष एकटा पडला आहे. त्यामागची कारणमीमांसा समजून घेतली पाहिजे. ज्यांनी पाठिंबा दिला आहे, यातील कोणत्याही पक्षाला मोदींबद्दल प्रेम नाही; परंतु मोदींना राजकीय कैचीत पकडण्याची ही वेळ नाही. ती वेळ चीनबरोबरची समस्या थोडीफार शांत झाली की येईल, हे भान या नेत्यांना आहे. हे भान माध्यमांनीही ठेवण्याची गरज आहे. सध्याचा काळ हा चीनचे डावपेच समजून त्यावर मात करणारी समंजस कृती शोधण्याचा आहे. राजकीय वा वैचारिक हिशेब चुकते करण्याचा नाही.

टॅग्स :chinaचीन