शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

‘नीती’चे विकासस्वप्न

By admin | Updated: April 28, 2017 23:33 IST

येत्या १५ वर्षात या देशातील प्रत्येक नागरिकाला शौचालय असलेले घर, दुचाकी अथवा चारचाकी वाहन, वीज, एसी आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी

येत्या १५ वर्षात या देशातील प्रत्येक नागरिकाला शौचालय असलेले घर, दुचाकी अथवा चारचाकी वाहन, वीज, एसी आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचे भव्यदिव्य स्वप्न नीती आयोगाने बघितले आहे म्हणतात. २०३१-३२ या सालात ही किमया घडून येणार आहे. एवढेच नाहीतर देशातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध हवा आणि पाणी मिळत असल्याचेही त्यांना या स्वप्नात दिसले आहे. स्वप्न फारच उत्तम आहे. पण सव्वाशे कोटींवर लोकसंख्या असलेल्या या देशात जेथे आजही लाखो लोक दररोज उपाशीपोटी झोपतात, भूक आणि कुपोषण हा प्रदीर्घ काळाचा अजेंडा झाला आहे, देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे नैराश्यग्रस्त शेतकरी आत्महत्या करीत असतात. अचानक अशी कुठली जादूची कांडी फिरणार आहे, ज्यामुळे प्रत्येकाला घर आणि घरासमोर कार किंवा दुचाकी उभी दिसेल तेच कळत नाही. गरिबी आणि श्रीमंतांमधील दरी मिटावी, ही प्रत्येकाचीच इच्छा आहे. परंतु आज भारताच्या प्रगतीचे जे चित्र आपण बघतो ते किती एकांगी आणि अपुरे आहे याचीही जाणीव सत्ताधारी तसेच राजकीय पुढाऱ्यांना असली पाहिजे. जगात दररोज उपाशी झोपणाऱ्या लोकांपैकी २५ टक्के एकट्या भारतातील आहेत. १५ टक्के जनता कुपोषणाने ग्रस्त आहे. जागतिक भूक निर्देशांकात जगातील ११८ विकसनशील देशांच्या यादीत भारताने ९७ क्रमांकावर असणे ही अत्याधिक शरमेची गोष्ट आहे. २०३० पर्यंत ही समस्या अशीच गंभीर असणार, असे तज्ज्ञांचे मत आहे. बेरोजगारीच्या दराने मागील १५ वर्षातील उच्चांक गाठला आहे. गेल्या वर्षी वायुप्रदूषणाने जे ४२ लाख लोक मृत्युमुखी पडले त्यातील २२ लाख केवळ भारत आणि चीनमधील आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास आर्थिक विकासाच्या स्वप्नांची गाडी सुसाट असली तरी देशातील अनेक घटकांना तिने मागे सोडून दिले आहे. म्हणूनच नीती आयोगाची ही योजना यशस्वी करण्यासाठी योग्य मार्गक्रमण आणि प्रयत्नांची गरज आहे.