शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मेन लाइनवरून नळ कनेक्शन कोणाला विचारून दिले जातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST

वेळ आली आहे. महापालिकेकडून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरून नळ कनेक्शन दिले जात आहे. हे नळ कनेक्शन्स काेणाच्या आशीर्वादाने ...

वेळ आली आहे. महापालिकेकडून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरून नळ कनेक्शन दिले जात आहे. हे नळ कनेक्शन्स काेणाच्या आशीर्वादाने दिले जात आहेत, असा सवाल करीत नळ कनेक्शन साेधून काढण्यासाठी मोहीम राबवावी, अशी मागणी नगरसेवक अमोल मासुळे यांनी केली.

मनपाच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात पाणी प्रश्नावर विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थायी समिती सभापती संजय जाधव, उपायुक्त शांताराम गोसावी, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी सभापती संजय जाधव म्हणाले की, सद्य:स्थितीत काही भागांत तीन ते काही भागांत आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. पाण्याचा पुरेसा साठा असल्याने केवळ नियोजन करण्याची गरज आहे.

पाणी पुरवठ्याच्या समस्या हेतूपुरस्सर केल्या जातात.

सभेत नगरसेवक नागसेन बोरसे म्हणाले की, शहरातील काही भागांत पाणी पुरवठ्याच्या समस्या हेतू पुरस्सर केल्या जात आहे. सध्या मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे सध्या या विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनुभवी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मानधन तत्त्वावर घेण्यात यावे. १३६ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइन टाकण्याचे व जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. त्या जाेडून नियोजन का केले नाही, असा प्रश्न नगरसेवक बोरसे यांनी केला.

यावेळी मासुळे म्हणाले की, शहरातील लिकेज काढण्यासाठी लाखांची निविदा काढली जाते. काम सुरू झाल्यानंतर किती काम झाले याचीदेखील माहिती सभागृहाला देण्यात यावी. मिल परिसरात अनेक अवैध नळ कनेक्शन्स सुरू आहेत. मात्र, कारवाई होताना दिसून येत नाही. सर्रासपणे मुख्य जलवाहिनीला नळ कनेक्शन दिले जात आहे. अनेक भागांत नळांना तोट्याही नाहीत. त्यामुळे फिल्टर पाणी वाया जात आहे. शहरात अनेक हाॅस्पिटल्स, महाविद्यालये व हाॅटेलला मेन लाइनवरून कनेक्शन दिले जात असल्याचा आरोप मासुळे यांनी केला.

वाईटपणा घ्यावा लागेल

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आधी मेन लाइनला जोडण्यात आलेले नळ कनेक्शन सोधून काढण्याची गरज आहे. चितोड रोडवर देखील मेन लाइनवरून कनेक्शन दिलेले आहेत. त्यामुळे पाणी वाया जातो. त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे शीतल नवले यांनी सांगितले.