शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळातच नागरिकांना पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावातील पाणीसाठा केवळ एक ते दीड महिने पुरेल एवढाच आहे. जूनपर्यंत पावसाचे आगमन न झाल्यास ...

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावातील पाणीसाठा केवळ एक ते दीड महिने पुरेल एवढाच आहे. जूनपर्यंत पावसाचे आगमन न झाल्यास शहराला पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. अक्कलपाडा व नकाणे तलावातील उपलब्ध जलसाठ्यात महापालिकेला शहरासह हद्दवाढीतील अकरा गावांची तहान भागवावी लागणार आहे. गेल्या वेळेस पाऊस कमी झाल्याने नकाणे तलाव भरण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाटचरीतून पाणी सोडण्यात आले होते. मात्र, पाण्याचे वेगात बाष्पीभवन होत असल्याने पाण्याची पातळी खालावली आहे़

शहरातील गळती थांबेना

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह तसेच जलवाहिनी लिकेजद्वारे दिवसाला हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून जाते. पाण्याच्या नासाडीनंतर दुरुस्ती होत असल्याने तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. नियोजन नसल्यामुळे नागरिकांना उशिरा पाणीपुरवठा केला जातो.

पाणीचोरी रोखण्याचे आव्हान

महापालिकेला पाणीपुरवठ्याचा भार डोईजड झाला असल्याने अवैध नळधारकांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करीत विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.

हद्दवाढीतही पाणीटंचाईचे संकट

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांमध्ये सद्य:स्थितीत जूनपर्यंत पुरेल इतका जलसाठा उपलब्ध असला तरी हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांची टँकरद्वारे तहान भागविण्याची वेळ आली आहे. महापालिकेत गावाचा समावेश झाल्यानंतर सुविधा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, मूलभूत प्रश्न सुटत नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.