शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रामायणातून भारतीय संस्कृतीची मूल्ये प्रकट होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST

श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर येथील नानासाहेब देव सभागृहात आयोजित संत रामदास स्वामीलिखित ‘वाल्मीकी रामायण-किष्किंधाकांड’या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर ...

श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर येथील नानासाहेब देव सभागृहात आयोजित संत रामदास स्वामीलिखित ‘वाल्मीकी रामायण-किष्किंधाकांड’या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. सुभाष भामरे, श्रीसमर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष शरद कुबेर, रामदास स्वामी यांचे वंशज भूषण स्वामी होते.

राज्यपाल काेश्यारी पुढे म्हणाले, आपल्या विद्वत्तेमुळे विद्वानाला सर्वत्र मानाचे स्थान असते. ॲलेक्झांडरसारख्या सम्राटालाही विद्वत्तेसमोर झुकावे लागले होते. अशा विद्वान, संत-महात्म्यांचा हा देश आहे. जग पुन्हा एकदा प्राचीन भारतीय साहित्याकडे वळलेला आहे. एवढेच नाही तर विदेशातही मंत्र-तंत्र, योगा याचा प्रभाव वाढत चालला आहे. जगातील विविध देशांत रामायण पोहोचलेले आहे. श्रीरामाचे समुद्रासारखे गांभीर्य आणि हिमालयासारखे धैर्य सर्वांसाठी आदर्श आहे. श्रीराम हे देशाचे सांस्कृतिक प्रतीक आहे. समर्थ वाग्देवता मंदिरात साहित्याचे भांडार आहे. समर्थ रामदासांच्या साहित्यातील विचार समाजापर्यंत पोहचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात देवेंद्र डोंगरे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. रामायणाच्या आंतरराष्ट्रीय संशोधनाचे केंद्र उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थ वाग्देवता मंदिराला भेट देऊन दुर्मीळ साहित्य व हस्तलिखितांविषयी माहिती घेतली. तसेच अभिप्रायही नोंदविला. याप्रसंगी रामायण संशोधन प्रकल्पात योगदान देणारे न्या. अंबादास जोशी (मुंबई), डॉ. अरुंधती जोशी (पुणे), डॉ. रूपाली कापडे (संगमनेर), प्रा. डॉ. शोभा शिंदे (धुळे), कलनिधी वासुदेव कामत (मुंबई), बाळूबुवा

रामदासी (सातारा), हर्षवर्धन कुळकर्णी (सातारा), डॉ. नीलेश जोशी वैशंपायन (मुंबई) यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भूषण स्वामी यांनी ‘कल्याणकारी रामदास प्रार्थना’ म्हटली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन अपर्णा बेडकर यांनी तर आभार डॉ. रवींद्र महाजनी यांनी मानले.

यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., ‘उत्तर महाराष्ट्र’चे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील आदी उपस्थित होते.

पाच लाखांचा निधी देण्याचे जाहीर

समर्थ रामदास स्वामींचे साहित्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे समर्थ वाग्देवता मंदिराचे कार्य महत्त्वाचे असून, संस्थेच्या कार्यासाठी राज्यपाल कोशातून ५ लाख रुपये देण्याचे कोश्यारी यांनी जाहीर केले.