शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेतू ॲपचा वापर वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:32 IST

अवास्तव वीजबिलांना नागरिक हैराण धुळे : लाॅकडाऊन कालावधीत मीटरचे रीडिंग घेणे बंद होते. शिवाय सहा महिने वीज बिलेदेखील दिली ...

अवास्तव वीजबिलांना नागरिक हैराण

धुळे : लाॅकडाऊन कालावधीत मीटरचे रीडिंग घेणे बंद होते. शिवाय सहा महिने वीज बिलेदेखील दिली नाहीत; परंतु अनलाॅक झाल्यानंतर दिलेली बिले मात्र अव्वाच्या सव्वा असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. एकीकडे कोरोना काळातील वीज बिल माफ करण्याची मागणी सातत्याने होत असताना वीज बिलमाफी तर होत नाही; परंतु पाचपट अधिक बिल वसूल केले जात असल्याने संतापाची लाट आहे. अनेक पक्ष संघटनांनी या विरोधात आवाज उठविला आहे. वीजबिल माफ होण्याच्या आशेवर अनेकांनी वर्षभरापासून बिल भरले नाही. आता महावितरणने विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केल्याने एकत्र बिल भरणे महागात पडत आहे.

मोबाईल नेटवर्कची समस्या कायम

धुळे : ग्रामीण भागात काही कंपन्यांच्या मोबाईलला रेंज नसते. त्यामुळे फोन लागत नाही तसेच इंटरनेटला स्पीड मिळत नाही. अत्यावश्यक कामेदेखील विलंबाने होतात. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने या शिक्षणात मोबाईल रेंजअभावी गेल्या काही महिन्यांपासून अडथळे येत आहेत. ग्रामीण भागातील सरकारी कामकाजावरदेखील त्याचा परिणाम होत आहे. रिचार्जसाठी खर्च केलेला पैसा वाया जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच ग्रामीण भागातच नव्हे तर धुळ्यासारख्या शहरी भागातदेखील काही ठिकाणी काही कंपन्यांच्या सिमला रेंज नसते. वलवाडी, माराने, चितोड, मोहाडी, अवधान या भागात रेंजची समस्या आहे. शहरात आल्यावर मात्र रेंज पूर्ण मिळते. संबंधित कंपन्यांनी हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.