शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात टँकर चालकाने नाल्यात सोडले केमिकल, नदीचे पाणी दूषित, नेर गावाचा पाणीपुरवठा चार दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST

नेर - सुरत नागपूर महामार्गालगत नवे भदाणे जवळील असलेल्या नाल्यात केमिकल टँकर चालकाने मध्यरात्री केमिकल टाकल्यामुळे ते पांझरा नदीत ...

नेर - सुरत नागपूर महामार्गालगत नवे भदाणे जवळील असलेल्या नाल्यात केमिकल टँकर चालकाने मध्यरात्री केमिकल टाकल्यामुळे ते पांझरा नदीत पोहोचल्याने नेरसह भदाणे गावाचा पाणीपुरवठा दूषित होऊन जीवघेणा ठरला आहे. ही बाब सकाळी माॅर्निंग वाॅकसाठी जात असताना विजय श्रीराम, युवराज खताळ, आर. डी. माळी, सतीश बोढरे, कृष्णा खताळ आदींच्या लक्षात आल्याने तत्काळ ग्रामपंचायतीला कळवले. सरपंचांनी लगेच घटनेचे गांभीर्य ओळखून दोन्ही गावांचा पाणीपुरवठा चार दिवसांसाठी बंद केला आहे. धुळे येथील प्रयोग शाळेतून पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पाणीपुरवठा केला जाणार आहे.

नेर जवळून जाणाऱ्या नवे भदाणे महामार्गालगत असलेल्या नाल्यात सोमवारी रात्री एक टँकरचालक टँकरमधील केमिकल टाकून पसार झाला. त्यानंतर हे केमिकल नाल्यातून वाहत जाऊन पुढे पांझरा नदीत आले. या नदीच्या काठावरच नेर आणि भदाणे गावाच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. त्यामुळे या विहिरींचे पाणीही केमिकलयुक्त झाले आहे. तर नदीतील पाणी ही केमिकलयुक्त झाले आहे. मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडलेले दिसून येत आहेत. ही बाब नेर व भदाणे ग्रामपंचायतीच्या लक्षात आली. त्यामुळे गुरांना आणि नागरिकांना कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून तात्काळ गावात दवंडी देऊन नागरिकांना नदीत गुरांना पाणी पाजू नये तसेच महिलांनी कपडे आणि धुणीभांडी करण्यासाठी नदीवर जाऊ नये असे आवाहन केले आहे. दरम्यान, टँकर चालकाने असा प्रकार का केला, याचे कारण गुलदस्त्यात आहे.

मात्र महामार्गावर गॅस आणि केमिकल टँकरचा काळाबाजार चालू असतो. हे या आधीही उघड झाले आहे. त्यामुळे कदाचित अशा प्रकारातून हा प्रकार घडला असावा असा नागरिकांकडून अंदाजही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकाराचा छडा लावावा अशी मागणी करण्यात आली आहे.

पाण्याचे नमुने प्रयोग शाळेत पाठवले

नेर ग्रामपंचायतीने लगेच पाणीपुरवठा कर्मचारी देवीदास जाधव, मांगू मोरे, पंकज चौधरी, ईश्वर चव्हाण, ग्रामपंचायत लिपिक हर्षल मोरे, राकेश जाधव यांना विहिरीच्या पाण्याचे नमुने घेऊन ते धुळे येथील प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठवले आहेत. त्यामुळे याचा अहवाल आल्यानंतरच गावात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. त्यासाठी चार दिवस पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.

-गायत्री संजय जयस्वाल, सरपंच, नेर