शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात तीन बसेस ६०० कि.मी.धावल्या,उत्पन्न नगण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:34 IST

गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ही साखळी तोडण्यासाठी अखेर राज्य शासनाने दोन दिवसांचा वीकेंड लॅाकडाऊन लावला. ...

गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ही साखळी तोडण्यासाठी अखेर राज्य शासनाने दोन दिवसांचा वीकेंड लॅाकडाऊन लावला. त्यामुळे उद्योग, व्यापार, बाजारपेठ सर्वकाही बंद होते. वाहतूक करण्यास परवानगी असली तरी प्रवासीच नसल्याने, त्याचा फटका एस.टी. महामंडळालाही बसला आहे.

धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी या आगाराच्या दररोज जवळपास ९९ फेऱ्यांच्या माध्यमातून ३५ ते ३६ हजार किलोमीटर अंतरापर्यंत बसेस धावत होत्या. त्यातून या आगाराला १५ ते १६ लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर तसे फेऱ्या कमी झाल्या. त्यामुळे उत्पन्नही कमी झाले.मात्र वीकेंड लॅाकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला. शनिवारी धुळे आगारातून नाशिकसाठी एक तर चोपडा मार्गावर दोन अशा तीनच बसेस सोडण्यात आल्या. या एका दिवसात जवळपास ६०० किलोमीटर बसेस धावल्या. त्यातून अगदी नगण्य उत्पन्न मिळाले. तर रविवारी एकही बस धुळे आगारातून सुटली नसल्याची माहिती देण्यात आली.

ोन दिवसात लाखोंचा फटका

धुळे हे तीन राज्यांच्या सीमेवर वसलेले शहर आहे. या ठिकाणाहून राज्यासह मध्य प्रदेश, गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी धुळे आगाराच्या दररोज विविध मार्गावर ९९ फेऱ्या होत होत्या.

या फेऱ्यांच्या माध्यमातून धुळे आगाराला १५ ते १६ लाखांचे उत्पन्न मिळत हाेते. मात्र जसजसा कोराेनाचा प्रादुर्भाव वाढला, तसतसे प्रवासी कमी झाले, गाड्यांच्या फेऱ्या कमी झाल्या. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला. आता गेल्या दोन दिवसात तर केवळ तीनच बसेस दोन मार्गावर धावल्या आहेत.

गेल्या दोन दिवसात लाखांत मिळणारे उत्पन्न हजारावर आल्याची माहिती आगारातून देण्यात आली.

ज्याची ड्युटी तोच कामावर

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य सरकारी कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचारी कामावर बोलविण्यात आले आहेत.

मात्र एस.टी. महामंडळात ५० टक्के धोरण नाही. ज्याची ड्युटी लावण्यात आलेली आहे, तेच कर्मचारी कामावर येत असल्याचे सांगण्यात आले.

संकट निवारण्याचीच प्रतीक्षा

गेल्यावर्षी लॅाकडाऊनमुळे तब्बल तीन महिने एस.टी.बससेवा बंद होती. त्यात महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र दिवाळीपासून एस.टी.ला सुगीचे दिवस आले होते. प्रवासी मोठ्या प्रमाणात वाढले होते. परंतु आता पुन्हा कोरोनाचे संकट वाढले. हे संकट निवारल्यानंतरच एस.टी.चे उत्पन्न वाढू शकेल.