शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

थाळनेर, सामोडेला पंचनाम्यांचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 11:04 PM

सामोडेत ३०० एकरवरील सोयाबीन पीक जमीनदोस्त : शिरपूरात आमदारांनी घेतली बैढक

थाळनेर/पिंपळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर परिसरात व पिंपळनेर येथील सामोडे परिसरात नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात फडबागायत, सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांचे नुकसान झाले आहे.पिंपळनेरसामोडे परीसरात २ रोजी महसूल विभाग व कृषी विभाग यांचे संयुक्त पंचनामे करण्यात आले. परतीचा पाऊसामुळे सोयाबीन व मका बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातील फडबागायत ३०० एकर जमीनीवर सोयाबीन पीक आहे. मात्र गेल्या १५ दिवसापासूनच्या पावसाने पिक जमिन दोस्त झाले. तोंडावर आलेल्या पिकांना कोंब फुटत आहेत. याबरोबरच चारा ही खराब झाला आहे. परिसरात पाहणीसाठी व पंचनाम्यासाठी कृषी अधिकारी नहिरे, हेमंत बाविस्कर, महसूल विभागाचे सर्कल प्रमोद राजपूत, तलाठी दिलीप चव्हाण, ग्राम विस्तार अधिकारी बी.डी. जगताप, दिपक भारूडे, दिलीप घरटे, विलास घरटे, फडबागायत चेअरमन काशिनाथ घरटे आदींनी शेतकरी बंधुना बरोबर घेऊन पाहणी केली आणि पंचनामे केले.शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने त्वरित भरपाई जाहीर करावी अशी मागणी भाजपाचे दिलीप घरटे, विलास घरटे व सामोडे भाजप कार्यकर्ते यांनी केली आहे. शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि या पुढे शेतकºयाला भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सामोडे परीसरातील शेतकºयांनी केली आहे.थाळनेरथाळनेर - परिसरात परतीच्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी,ज्वारी,मका,कापूस व अन्य सर्व पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याने या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून थाळनेर येथील तलाठी एस.के. मराठे यांच्यासह कोतवाल बाबाजी शिरसाठ, शेतकरी महेश सोनवणे, नंदकिशोर जमादार, वसंत वारूळे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावर्षी खरीप हंगामातील परतीच्या अवकाळी पावसाने मका, बाजरी, कापूस,ज्वारी यांच्यासह अन्य पिकांना चांगलेच झोडपून काढल्याने मळणीस आलेल्या मका, बाजरी व ज्वारी पिकांची चांगली दैना उडाल्याने या पिकांनी शेतातच अंकुर काढल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. गेल्या दोन ते तीन वर्षाच्या दुष्काळ अवर्षण प्रणव स्थितीचा सामना करीत असलेला परिसरातील शेतकरी यंदाच्या अवकाळी पावसाने पुन्हा देशोधडीला लागला आहे.थाळनेर, भोरटेक, मांजरोद, पिलोदा, सहपरिसरात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकº्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी पूर्णत: आर्थिक संकटात सापडला आहे. शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांनी शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांच्या कार्यालयात अधिकारी व कर्मचाºयांची तात्काळ आढावा बैठक घेऊन तालुक्यात सरसकट पंचनामा करण्याचे निर्देश अधिकाºयांना दिलेत.

टॅग्स :Dhuleधुळे