शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये शिक्षक, विद्यार्थ्यांना बोलविणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:34 IST

निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोरोना संक्रमणामुळे अत्यंत भयावह व गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हे विचारात घेऊन कोरोना ...

निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोरोना संक्रमणामुळे अत्यंत भयावह व गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हे विचारात घेऊन कोरोना संकटावर मात करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत राज्यात दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी तसेच शनिवार-रविवारी पूर्ण कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. या संसर्गजन्य आजारांचा फैलाव होऊ नये यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शासनाने शाळेतील शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना शाळांत ५० टक्के उपस्थिती राहण्यास सुचविले आहे. मात्र शासनाने घोषित केलेल्या निर्बंधांना जाणीवपूर्वक पायदळी तुडवून काही शाळांचे मुख्याध्यापक शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना दररोज पूर्णवेळ शाळेत उपस्थित राहण्यास बाध्य करतात. काही शाळा विद्यार्थ्यांनासुद्धा नियमितपणे शाळेत उपस्थित राहण्यास बाध्य करीत आहेत. ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब असून, विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या जीवनाशी खेळणारी बाब आहे. खासकरून धुळे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविडने होणारे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनेक शाळांत कोरोना संकटापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली भौतिक व्यवस्थासुद्धा निर्माण करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्याध्यापकांच्या या मनमानी त्रासामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते. शासनाचे निर्बंध मोडणाऱ्या मुख्याध्यापकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी ताकीद संबंधिताना देणे आवश्यक व निकडीचे आहे. प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन व्हावे व विद्यार्थी - शिक्षकांना शाळेत बोलावणाऱ्या संस्थांना व मुख्याध्यापकांना कायदेशीर कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आलेली आहे.