शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानामुळे मानवी जीवन सुकर झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:34 IST

साक्री : प्रयोगशीलता आणि अखंड मेहनतीच्या जोरावर मानवाला हवे ते शोधणे शक्य होते आहे. विज्ञान तर ज्ञानाचा ...

साक्री : प्रयोगशीलता आणि अखंड मेहनतीच्या जोरावर मानवाला हवे ते शोधणे शक्य होते आहे. विज्ञान तर ज्ञानाचा अखंड झरा असल्यामुळे मानवी जीवन सुकर बनवण्यासाठी त्याचा वेळोवेळी वापर म्हणजे वैज्ञानिक क्रांती असल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांनी केले.

साक्री येथील सी. गो. पाटील महाविद्यालयात विज्ञान मंडळाच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी ‘ऊर्जा विनयेन शोभते’ या विषयावर ते प्रमुख व्याख्याते व उद्घाटक म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. सचिन नांद्रे, आदी उपस्थित होते.

ऊर्जा व त्याचे महत्त्व स्पष्ट करताना प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा, त्याचबरोबर विद्यार्थी विज्ञानाधिष्ठित व्हावा यासाठी प्रयत्नरत राहणे गरजेचे आहे. ऊर्जा व त्याचे मानवी जीवनातील महत्त्व, त्याचबरोबर ऊर्जेची निर्मिती इत्यादींविषयी त्यांनी माहिती दिली. विज्ञानामुळे जगात बदल झाल्याचेही त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी ऊर्जा विषयीची साक्षरता सर्वश्रुत होऊन ऊर्जेचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून, या कार्यक्रमातून या अभिनव उपक्रमाला चालना देणे स्तुत्य असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रा. एस. डी. पालखे यांनी केले तर प्रा. विलास पावरा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण व विज्ञान मंडळ समितीचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विज्ञान विषयाचे अभ्यासक, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.