शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तीला आलेले बाबू ठरलेत सर्वाधिक लाचखोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:54 IST

शासनाच्या सेवेत रुजू झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मोठी जबाबदारी ही कर्मचारी वर्गावर सोपविण्यात येते. अपेक्षा त्यांच्याकडून खूप असतात. ...

शासनाच्या सेवेत रुजू झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मोठी जबाबदारी ही कर्मचारी वर्गावर सोपविण्यात येते. अपेक्षा त्यांच्याकडून खूप असतात. सहावा वेतन आयोग, सातवा वेतन आयोग असे भरपूर प्रमाणात वेतन आणि अनुषंगिक भत्ते देखील त्यांना दिलेले असतात. त्यांना समाधान वाटेल असे असताना देखील त्यांची भूक काही भागत नाही. शासन सेवेतून आपण लवकरच निवृत्त होणार असल्याने जेवढे खेचता येईल, लुटता येईल, अशी मानसिकता ठेवून काहींचा वावर हा बिनधास्तपणे सुरू असताे.

चाळिशीतील सरकारी बाबूंना पैशांचा सर्वाधिक मोह

शासनाच्या सेवेत रुजू होणारे अधिकारी असो वा कर्मचारी यांना सुुरुवातीला पैशांचा मोह नसतो, असे दोन वर्षांपासून सापडलेल्या लाचखोरीच्या घटनांवरून समोर आलेले आहे. एकदा की ते या मोह जाळ्यात रुळले की त्यांना पैसे खाण्याचा जणू काही छंदच लागतो.

नेमके असे का आणि कशासाठी होते, हे न उलगडणारे कोडेच असल्याचे समोर येत आहे. याला कोण आणि कशाप्रकारे पायबंद लावू शकेल हे अद्यापही गुलदस्त्यातच असल्याचे म्हणावे लागेल. नोकरी करीत असताना अगदी सहजपणे हे लाचखोरीकडे वळतात. सुरुवातीला ते सापडत नाही आणि ज्यावेळेस सापडतात त्यावेळेस मात्र त्यांच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली जातात. याचे देखील त्यांना काही वाटत नाही.

आजवर जे लाचखोर सापडले आहेत त्यांच्या वयाेगटाचा सहज विचार केल्यास सर्वाधिक लाचखोर हे ४१ ते ५० आणि त्यानंतर ५१ ते ६० वयोगटातील आहेत.

या लाचखोरीच्या बाबतील कोणता विभाग पुढे आणि कोणता विभाग मागे हे सर्वांना ठाऊक आहे. त्यात पडण्यापेक्षा लाचखोरीचे हे जाळे कधी तोडले जाईल, लाचखोरी कधी थांबेल हा मात्र अनुत्तरीत असा मुद्दा आहे.

शासकीय सेवेत लाचखोरी हा मोठा प्रश्न असून तो कधी संपुष्टात येईल याकडे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरेल. आपण ज्या पदावर काम करीत आहोत, त्या पदावर समाधानकारक पगार आपल्याला मिळतो याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. लाचखोरीकडे कोणीही वळायला नको. प्रामाणिक सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत.

- सुनील कुराडे

उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे