शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गावागावात जनजागृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:37 IST

धुळे : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी कोरोना विषाणूची ...

धुळे : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत

पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी कोरोना विषाणूची लक्षणे दिसताच तपासणी करून घेत उपचार सुरू करावेत. त्यासाठी अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी आदींच्या माध्यमातून जनजागृती करावी. त्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने करावे, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात शनिवारी दुपारी ‘कोविड- १९’ संसर्गाच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, खासगी रुग्णालयांनी दरफलक लावले पाहिजेत. तेथे एक कर्मचारी नियुक्त करावा. अधिकाऱ्यांनी रुग्णालयास भेट देऊन पाहणी करावी. जास्तीचे बिल आकारल्यास बिलांची पडताळणी करावी. रेमडेसेविर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. तसेच त्यांचा आवश्यकतेनुसार वापर करावा.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनची मदत घ्यावी. याशिवाय

लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.

जिल्हा रुग्णालयात जम्बाे कोविड सेंटर

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्हा रुग्णालयात जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येत असून ते २४ तास सुरू राहील. चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून पॉझिटिव्हिटी दर कमी होत आहे, असेही त्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. तुळशीराम गावित, हिलाल माळी, श्याम सनेर यांनी आपले म्हणणे मांडले.