शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

रब्बीतील गहू, हरबरा पेरणी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 9:59 PM

मालपूर परिसरातील चित्र

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरात रब्बी हंगामातील गहु, हरभरा पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पाणी भरण्यासाठी एकच धडपड सध्या शेतशिवारात दिसुन येत आहे. गायब झालेल्या थंडीचे देखील पुनरागमन हळूहळू होत आहे़ यामुळे शेतकऱ्यांच्या आशा देखील पल्लवित झाल्या आहेत.थंडी व रब्बी हंगाम यांचे अतुट नाते आहे. थंडीच्या जोरावरच या हंगामातील गहु, हरभरा ही पिके बहरत असतात. जेवढी जास्त थंडी तेवढे जास्त जोमाने ही पिके वाढीस लागतात असे येथील जाणकार शेतकरी सांगतात मात्र मागील आठवडात थंडी अचानक गायब झाल्याने येथील शेतकरी हिरमुसले झाले होते. दिवाळी आधीच यावर्षी मालपूर सह परिसरात थंडीने दस्तक दिली. यामुळे रब्बी हंगामातील कामांना शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती. लागवडी योग्य क्षेत्र तयार करुन त्यावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने आधुनिक यंत्राच्या मदतीने पेरणी केली. हे काम येथे अंतिम टप्प्यात आहे. यानंतर उन्हाळ्यातील भुईमूग पेरणी कडे येथील शेतकरी वळत असतात त्यासाठी क्षेत्रफळ तयार करण्याच्या हालचाली काही ठिकाणी दिसुन येत असल्याचे चित्र आहे. येथील अमरावती मध्यम प्रकल्पातील पाण्याचा साठा तसेच विहिरी व कुपनलिकांची वाढलेली पाण्याची पातळी लक्षात घेता रब्बीतील क्षेत्रफळात यावर्षी वाढ होणार असल्याचे चित्र दिसुन येत आहे. या हंगामाला पाण्याची गरज असते व मुबलक पाणी साठा उपलब्ध असल्यामुळे रब्बी हंगामातील क्षेत्रफळात वाढ होणार यावरुन स्पष्ट होत आहे. गहू हरभरा या पिकांसह रांगडी कांदा मका या पिकांचा देखील काही क्षेत्रफळावर समावेश आहे. यासाठी देखील शेत मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. तर काही क्षेत्रफळावर ओलण्याचे काम दिसुन येत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे