शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १९ हजार नागरिकांची शमविली तहानभुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:35 IST

धुळे : कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदी वजा लॉकडाऊनमुळे सकाळी ११ वाजल्यानंतर सर्व काही बंद होते. या बंदच्या ...

धुळे : कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदी वजा लॉकडाऊनमुळे सकाळी ११ वाजल्यानंतर सर्व काही बंद होते. या बंदच्या कालावधीत भुकेल्यांची भूक शमविण्याच्या उद्देशाने युवासेनेच्या वतीने २७ एप्रिलपासून मासाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्ण भोजन सेवा उपक्रम सुरू करण्यात आला. सलग १९ दिवस अव्याहतपणे गरजूंपर्यंत तयार अन्नाचे पाकीट व पाणी पोहोचविण्याचे काम युवासेनेच्या माध्यमातून करण्यात आले. दररोज वेगवेगळे मेनू तयार करून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न युवासेना टीमने केला. आज शेवटच्या दिवशी पोळी, मिक्स व्हेज व गोड बर्फी असा मेनू तयार करण्यात आलेले एक हजार पाकीट दादासो भीमराव गोरे यांच्या हस्ते वाटप करून या अभियानाची सांगता करण्यात आली.

राज्यात कोरोना संकटाच्या कालावधीत गरजूंना मदत करण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच युवकांनी स्वतः काळजी घेऊन या संकट कालावधीत लोकांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन युवासेनाप्रमुख तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. त्यानुसार ॲड. पंकज गोरे यांनी शहरात मासाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्ण मोफत भोजन सेवा उपक्रम २७ एप्रिलपासून सुरू केला. दररोज एक हजार अन्नाचे फूड पॅकेट तयार करून सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत अन्न वाटप करण्यात आले. तसेच निराधार, रुग्णालयाच्या बाहेर थांबलेेले नातलग, २४ बाय ७ सेवा देणारे कर्मचारी, पोलीस कर्मचारी अशा अनेक घटकांना ११ वाजेनंतर साधे पाणीदेखील मिळत नव्हते. भगवा चौकातील फूड पॅकेट वाटपाचे काम संपल्यानंतर शहरात विविध ठिकाणी जाऊन गरजूंना अन्न आणि पाणी देण्यात आले. या १९ दिवसांत दररोज वेगवेगळा मेनू तयार करून जेवण वाटप करत १९ दिवसांत १९ हजार नागरिकांची भूक भागविण्याचे काम करण्यात आले. या उपक्रमासाठी कोणाचीही मदत न घेता युवासेना जिल्हाप्रमुख ॲड. पंकज गोरे यांनी स्वखर्चाने हे अभियान राबविले.

शेवटच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत अखेरच्या दिवसाचे अन्नदान करत जड अंत:करणाने या अभियानाची सांगता करण्यात येत आहे. १९ दिवसांत विभिन्न क्षेत्रात हातावर पोट भरणाऱ्यांची भूक शमविण्याचे पुण्य प्राप्त करता आले. याचे समाधान असले तरी अभियान थांबवावे लागत असल्याची खंत आहे, अशा भावना ॲड. गोरे यांनी व्यक्त केल्या.

अन्नदान मोहीम यशस्वी करण्यासाठी शहर प्रमुख संदीप मुळीक, युवती सेना सोनी सोनार, स्नेहा वाघ, दक्षता पाटील, स्वप्निल सोनवणे, जितेंद्र पाटील, अमित खंडेलवाल, भूषण पाटील, आकाश शिंदे, पवन सरग, योगेश वाघ, भावेश अहिरराव, जयवंत गोरे, नीलेश चौधरी, प्रेम सोनार, ज्ञानेश्वर देवरे, मयूर सोंजे, तुषार सातपुते, दर्शन कंबायत यांच्यासह नाथू महाराज व त्यांची टीम, विजय मंडप, खुशी केटरर्स, आदींनी परिश्रम घेतले.