शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकांशिवाय भरली ऑनलाइन शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. दरवर्षी १५ अथवा १६ जूनलाच जिल्ह्यातील शाळा सुरू ...

सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. दरवर्षी १५ अथवा १६ जूनलाच जिल्ह्यातील शाळा सुरू होत असतात. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना मोफत पुस्तकांचे वाटप केले जाते. नवीन पाठ्यपुस्तके मिळाल्याने, विद्यार्थी आनंदित होत असतात. पहिल्या दिवसांपासूनच शिक्षणाला सुरुवात होते. मात्र, या वर्षी शाळा सुरू होऊन २८ दिवस झाले, तरी अद्याप विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळाली नाहीत. शाळा सुरू नसल्या, तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, पुस्तकेच नसल्याने ऑनलाइन शिक्षण घेण्यात विद्यार्थ्यांना अडचण येत आहे.

जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतचे सुमारे अडीच लाख विद्यार्थी असून, त्यांच्यासाठी १२ लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची गरज आहे. त्यामुळे लवकर पुस्तके मिळावीत, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या दिवशीच विद्यार्थ्यांना पुस्तके मिळत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत होता.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या वर्षीही ऑनलाइन शिक्षण सुरू झालेले आहे. मात्र, अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकेच मिळालेली नाही.

शिक्षण विभागाने जुनी पुस्तके परत करण्याचे आवाहन केले होते. त्याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

शाळा सुरू होऊन महिना होत आला. मात्र, अद्याप पुस्तके हाती मिळालेले नाही. त्यामुळे अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

- भूषण पाटील, विद्यार्थी.

मोबाइल असला, तरच ऑनलाइन अभ्यास करता येतो. मात्र, मोबाइल नसला की, पुस्तकांशिवाय पर्याय नाही. पुस्तके मिळणे गरजेचे आहे.

-भाग्यश्री देव, विद्यार्थिनी