शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
5
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
6
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
7
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
8
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
9
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
10
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
11
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
12
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
13
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
14
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
15
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
16
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
17
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
18
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
19
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
20
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
Daily Top 2Weekly Top 5

मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:37 IST

धुळे : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एस.टी. महामंडळाची बससेवा सुरू झालेली आहे; मात्र उत्पन्न मिळविण्यासाठी महामंडळानेही लांब पल्ल्याच्या ...

धुळे : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एस.टी. महामंडळाची बससेवा सुरू झालेली आहे; मात्र उत्पन्न मिळविण्यासाठी महामंडळानेही लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यांना प्राधान्य दिलेले आहे. ग्रामीण भागातील बसच्या फेऱ्या कमी आहेत. त्यातल्या त्यात मुक्कामी बसेसची संख्या तर प्रचंड कमी आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बससेवेचे वेळापत्रकच कोलमडलेले आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बसेसच्या आता ग्रामीण भागातील फेऱ्याही मर्यादीतच झालेल्या आहेत.

धुळे जिल्ह्यात पाच आगार असून, या सर्व आगारांच्या बसेस कोरोनापूर्वी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जास्त होत्या; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर ग्रामीण भागात मुक्कामी बसेसची संख्या रोडावली आहे.

नियोजन करणे सुरू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बससेवा पूर्ववत सुरू झालेली आहे. कोरोनापूर्वी शाळा-महाविद्यालयाच्या उद्देशानेच ग्रामीण भागातील मुक्कामी बससेवा सुरू होती. आता ज्या-ज्या मार्गावरील विद्यार्थ्यांना पासेस उपलब्ध होत आहेत, त्या मार्गावर ग्रामीण भागात मुक्कामी बससेवा सुरू करण्यात येत आहे. येत्या सोमवारपासून अजून ग्रामीण भागातील फेऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न आहे; मात्र बस सुरू करीत असताना डिझेलचा खर्च निघणे महत्त्वाचे आहे. प्रवाशांचा प्रतिसाद व मागणीनुसार बससेवा सुरू केली जाईल.

स्वाती पाटील, आगार प्रमुख धुळे.

आमचे गाव दुर्गम भागात आहे. या गावातील प्रवाशांना एस.टी.शिवाय प्रवासाचे साधन नाही. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलचे दर वाढल्याने, दुचाकी वापरणे परवडत नाही; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून आमच्या गावात मुक्कामी बस येतच नाही. आम्हाला खासगी वाहनांनेच प्रवास करावा लागत आहे. एस.टी. ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असल्याने, ग्रामीण भागात बससेवा सुरू झाली पाहिजे. यासंदर्भात विचारणा केली असता, बससेवा सुरू केली जाईल, असे सांगण्यात येते; मात्र बसेस सुरू केल्या जात नाहीत.

- रमेश पावरा.

प्रवासी

मे महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाटही ओसरलेली आहे. त्यानंतर शहरी भागासाठी एस.टी.ची सेवा जोरात सुरू आहे; मात्र उत्पन्नाचे कारण दाखवत ग्रामीण भागासाठी बससेवा सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक प्रवासी हे केवळ एस.टी.च्या सेवेवरच अवलंबून आहेत. बससेवा सुरू नसल्याने, त्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ज्या मार्गावर जास्त प्रवासी आहेत, त्या ग्रामीण मार्गावरील फेऱ्या तत्काळ सुरू करण्याची आवश्यकता आहे.

- दिनेश पाटील,

प्रवासी.