स्थलांतर कागदावरच, भाजीपाला विक्री नेहमीच्या जागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:37 AM2021-04-22T04:37:36+5:302021-04-22T04:37:36+5:30
माजी स्थायी समिती सभापती अनिल मुंदडा यांनी आयुक्तांकडे केल्या मागणीनुसार शहरातील आग्रारोड, पाचकंदील, साक्रीरोड, देवपूर जीटीपी स्टॉप परिसरातील भाजीपाला ...
माजी स्थायी समिती सभापती अनिल मुंदडा यांनी आयुक्तांकडे केल्या मागणीनुसार शहरातील आग्रारोड, पाचकंदील, साक्रीरोड, देवपूर जीटीपी स्टॉप परिसरातील भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांचे स्थलांतर गर्दी होणार अशा ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते.
महापालिकेचे आयुक्त अजीज शेख यांनी तसे आदेश देखील काढले होते. आदेशानुसार पहिले काही दिवस महापालिका कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांनी त्यांना स्थलांतरित जागेवर पाठविले होते. सुरुवातीच्या दोन ते तीन दिवस आदेशाचे पालन केल्यानंतर बुधवारी सकाळी मात्र भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी आपली दुकाने परत आग्रारोडवर आणि पूर्वीच्या जागीच थाटल्याचे दिसून आले. त्यामुळे बाजारपेठेत सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, महापालिका आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांवर महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. यापुढे तरी महापालिका कर्मचाऱ्यांनी आणि वाहतूक पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी परिसरातील दुकानदारांकडून केली जात आहे.