शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

शोषणमुक्तीच्या चळवळीत दलित-आदिवासी साहित्याचे मोठे योगदान : काॅ. नजुबाई गावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:38 IST

धुळे : सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते विद्रोही कवी जितेंद्र अहिरे यांच्या "आम्ही हिशोब घेवू" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जागतिक दर्जाच्या ...

धुळे : सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते विद्रोही कवी जितेंद्र अहिरे यांच्या "आम्ही हिशोब घेवू" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जागतिक दर्जाच्या आदिवासी कादंबरीकार सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या कॉ. नजुबाई गावित यांच्या हस्ते झाले.

धुळे येथे पत्रकार भवनात शनिवारी सकाळी झालेल्या या प्रकाशन साेहळ्याला सत्यशोधक जन आंदोलनाचे सचिव कॉ. सिद्धार्थ जगदेव, कॉ. दत्ता थोरात, विद्रोही कवी राजीव हाके , सचिन बागुल यांची प्रमुख उपस्थितीत होती.

कॉ. नजुबाई गावित यांनी विमोचनपर भाषणात महाराष्ट्रातील दलित साहित्य, आदिवासी साहित्य याबाबत भाष्य करीत व्यवस्थेला नकार देणाऱ्या दलित साहित्याने भारतीय दलित पँथर सारख्या चळवळीला जन्मास घातले असल्याचं नमूद केलं. दलित साहित्यिकांनंतर आदिवासी साहित्यिक प्रस्थापित व्यवस्थेला जाब विचारू लागले. निव्वळ जाब विचारून थांबले नाहीत तर शोषणमुक्तीच्या चळवळी उभ्या करण्यासाठी प्रयत्नरत राहिले. महाराष्ट्रात कॉ. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली दलित आदिवासी ग्रामीण साहित्य महासभेचा यशस्वी प्रयोग करून अब्राह्मणी साहित्याच्या सौंदर्यशास्त्राचा मुद्दा साहित्यिक चळवळीच्या अजेंड्यावर आणला.

कॉ. नजुबाई भाषणात पुढे म्हणाल्या की, कवी जितेंद्र अहिरे यांची कविता प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न करते आणि कार्यकर्त्याला कृतीप्रवण बनण्यास भाग पाडते. आत्मचिकीत्सा करायला लावते.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे विद्रोही कवी राजीव हाके यांनी कविता संग्रहातील संस्कृती, एल्गार, चळवळीतील मुली या कवितेंचा संदर्भ घेवून समकालीन कवितेपेक्षा जितेंद्रची कविता सर्वार्थाने वेगळी असल्याचे विवेचन केले. विद्रोही कवी सचिन बागुल यांनी जितेंद्र ज्या परिस्थितीतून घडला त्याचे प्रतिबिंब त्याच्या कवितेत येतेण निव्वळ परिस्थिती पाहून रडत बसण्यापेक्षा परिस्थितीवर मात करीत चळवळ आणि विचार जागविण्याचा बोध जितेंद्रची कविता देते अशी समपर्क मांडणी केली. कॉ. सिद्धार्थ जगदेव यांनी काव्यसंग्रहाचे विश्लेषण करतांना सांगितले की, जितेंद्रने कवितेचा मुक्तछंद प्रकार निवडून व्यवस्थेवर कोरडे ओढले आहेत. त्यांच्या कवितेतील रूपक संभाजी भगत, शंतनू कांबळे यांच्या कवितेशी साधर्म्य दाखविणारे आहे. आई आणि पाऊस या कवितेतून जितेंद्रने अठराविश्व दारिद्र्य आणि पावसाचे नाजूक नाते अलगदपणे उलगडले आहे. गळणाऱ्या झोपडीत माझ्या पिलांना त्रास होऊ नये यासाठी तळमळणारी आई, या पावसात झोपडी सुरक्षित राहावी म्हणून आशाळभूत नजरेने ढगांकडे बघणा-या आईचे चित्रण चपखलपणे केल्याचे सिद्धार्थ जगदेव यांनी सांगितले.

त्यानंतर कवी जितेंद्र अहिरे यांना प्रा. मोहन मोरे, ज्वाला मोरे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात जितेंद्रच्या कष्टकरी मातेचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लोककवी दीपक निकम यांची "तांडा" कविता सादर करून सचिन बागुल यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. महेंद्र वाढे, प्रा. प्रशांत कसवे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलिंद बैसाणे, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. चक्षुपाल बोरसे, भैय्या पारेराव, कवायित्री प्रणाली मराठे, माजी नगरसेविका अॅडण कामिनी पिंपळे, आझाद समाज पार्टीचे राहुल वाघ, लसीकरण अधिकारी रोहिणी जगदेव, पत्रकार रविंद्र नगराळे व शहरातील साहित्यिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाहीर मनोज नगराळे, सिद्धांत बागुल, तुषार सूर्यवंशी, प्रसेनजीत जगदेव, दीपक शिरसाठ, अमोल शिरसाठ, संदीप बोरसे, मनीष दामोदर, स्वाती त्रिभुवन यांनी क्रातीगीते सादर केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महेंद्र शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन राकेश अहिरे तर आभार शरद वेंदे यांनी मानले.