शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

आगामी पाच वर्षात महाराष्टÑाला दुष्काळमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:29 AM

मुख्यमंत्री फडणवीस यांची दोंडाईचा येथे सभा : आता स्पर्धा देशातील राज्यांशी नव्हे तर युरोप राष्टÑांशी करणार

ठळक मुद्देमहाजनादेश यात्रेनिमित्त झाली सभामुख्यमंत्र्यांनी यात्रेचा उद्देश केला स्पष्ट

आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्या पाच वर्षात जलसिंचनाची अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत. आगामी काळात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून महाराष्टÑ दुष्काळमुक्त केला जाईल. तसेच अक्कलपाडा, सुलवाडे-जामफळ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धुळे जिल्ह्याला यापुढे कधीही दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही. दरम्यान आगामी काळात महाराष्टÑाला सर्वच क्षेत्रात क्रमांक एकचे राज्य बनविण्याचा प्रयत्न राहील असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोंडाईचा येथील जाहीर सभेत केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनदेश यात्रेचा दुसरा टप्पा गुरूवारपासून धुळ्यातून सुरूवात झाला. यानंतर दोंडाईचा येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा खा. डॉ. सुभाष भामरे, अशोक कांडेलकर, दोंडाईचाच्या नगराध्यक्षा नयनकुमार कुंवर, शिंदखेड्याच्या नगराध्यक्षा रजनी वानखेडे, डॉ. माधुरी बोरसे आदी उपस्थित होते.पाचवर्षात केलेली विकास कामे जनतेसमोर मांडण्यासाठी महाजनादेश यात्रा काढल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जनतेने मोठ्या विश्वासाने युतीच्या हाती सत्ता सोपविली. या पाच वर्षात अनेक आव्हाने आली. मात्र प्रत्येक आव्हानाकडे सकारात्मकदृष्टीने पाहिले. गेल्या पाच वर्षात राज्य उद्योग, रोजगार क्षेत्रात पहिल्याक्रमांकावर आणले. तर आरोग्य आणि शिक्षणाच्याबाबतीत राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आगामी काळात शिक्षण क्षेत्रातही महाराष्टÑ आघाडीवर असेल.दुष्काळ, बोंडअळी यामुळे राज्यातील शेतकरीवर्ग अडचणीत आला. मात्र या अडचणीच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. सिंचनाच्या क्षेत्रातही मोठे परिवर्तन घडवून आणले. जिल्ह्यातील सुलवाडे-जामफळ हा महत्वाकांक्षी प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला होता. मात्र मोदींनी या प्रकल्पांसाठी भरघोस निधी दिला. त्यामुळे आगामी काळात हे प्रकल्प पूर्ण होवून हा परिसर सुजलाम सुफलाम होईल. अक्कलपाडा, सुलवाडेच्या माध्यमातून या भागाला कधीही दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही. 

टॅग्स :Dhuleधुळे