शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

माहेरची ओढ असलेल्या मुलींना सासरीच साजरी करावी लागणार आखाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST

ग्रामीण भागात आजही अक्षय तृतीया सणाला विशेष महत्त्व आहे. पूर्वी अनेक कुटुंबामध्ये एकत्र पद्धती होती. त्यामुळे सासरी गेलेली मुलगी ...

ग्रामीण भागात आजही अक्षय तृतीया सणाला विशेष महत्त्व आहे. पूर्वी अनेक कुटुंबामध्ये एकत्र पद्धती होती. त्यामुळे सासरी गेलेली मुलगी दिवाळी व आखाजीला हमखास माहेरी येते. बदलत्या काळानुसार एकत्र कुटुंब पद्धती काही प्रमाणात कमी झालेली असली तरी सासरी गेलेली मुलगी आपल्या माहेरी आखाजीला हमखास जात असते. मात्र गेल्यावर्षाप्रमाणे यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कडक निर्बंध लावलेले असून, जिल्हाबंदीही करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेर असलेल्या सासुरवाशिणींना यावर्षीही या सणाला आपल्या माहेरी येता येणार नाही.

दरम्यान ग्रामीण भागात या दिवशी पूर्वजांचे स्मरण करण्यात येते. ही परंपरा कायम राहणार आहे. आखाजीनिमित्त अनेक ठिकाणी झोके बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे झोके घेळण्याचा आनंदही अनेक महिला घेण्याची शक्यता आहे.दरम्यान या दिवशी अनेक ठिकाणी पत्त्यांचे डाव रंगत असतात. यातून लाखोंची उलाढाल होत असते. मात्र कोरोनाचे कडक निर्बंध असल्याने, यावर्षी पत्त्याचे डाव रंगण्याची शक्यता कमीच आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदीलाही प्राधान्य दिले जाते. मात्र आता सध्या सकाळी ११ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने, खरेदीवरही मर्यादा येईल. त्यामुळे बाजारातील उलाढालही कमी होण्याची शक्यता आहे.