शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन कमी असल्याने विक्रीवर परिणाम तरीही अल्प मजुरांवर उद्योजक घेताय आता उंच भरारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 22:00 IST

अवधान एमआयडीसी । लॉकडाऊन नंतर उद्योग येताय पूर्वपदावर, एक दिवसाआड सुरु आहेत दैनंदिन कामकाज

धुळे : कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले असताना त्याचा फटका कमी-अधिक प्रमाणात उद्योजकांनाही बसलेला आहे़ हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत असलेतरी उत्पादन कमी असल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे़ मागणीही घटली आहे़ कामगारांसह उद्योजक आरोग्याची काळजी घेत आहेत़कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवरुन सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असताना देशात लॉकडाऊन करण्यात आला़ त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्य आणि जिल्हा पातळीवरुन होऊ लागली होती़ गर्दीचे सर्वच ठिकाणे बंद केल्यामुळे त्याचा फटका हा उद्योजकांनाही सोसावा लागला़ सलग दोन महिने उद्योगधंदे हे बंद असल्यामुळे त्यांच्याकडून उत्पादीत होणारा माल हा ठप्प झाला होता़ हाताला काम नाही म्हणून उद्योगात काम करणारे मजुरांनाही आपल्या घरचा रस्ता धरावा लागला़ सलग दोन महिन्यांपासून मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे शहरानजिक अवधान एमआयडीसी येथील सर्वच लहान मोठे २२७ उद्योग हे बंदस्थितीत होते़ या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे उत्पादन झालेले नव्हते़ही स्थिती गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून सारखीच होती़ अशातच लॉकडाऊनचा काळ थोड्याफार प्रमाणात शिथील करण्यात आला़ टप्प्याटप्प्याने सर्वच व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात करण्यात आली़ नंतरच्या काळात काही अटी आणि शर्थींवर एमआयडीसीमधील उद्योग सुरु करण्याची परवानगी देण्यात आली़ त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत धुळ्यातील अवधान एमआयडीसी येथील लहान-मोठे उद्योग सुरु करण्यात आले आहेत़ सद्याच्या स्थितीत उद्योगांना सुरुवात झाली असलीतरी त्यांना थोड्याफार प्रमाणात मजुरांची टंचाई जाणवत आहे़ आहे त्या मजुरांमध्ये आपल्या कंपनीमार्फत मालाचे उत्पादन घेण्याचा कटू प्रसंग सध्या धुळ्यातील उद्योजकांवर येऊन ठेपलेला आहे़अवधान एमआयडीसी येथील जे उद्योग सुरु झाले आहेत त्यात काही ठिकाणी ५० तर काही ठिकाणी ७५ टक्के क्षमतेने मालाचे उत्पादन घेतले जात आहे़ त्यांच्याकडे माल वाहतुक करण्यासाठी आवश्यक असणारी जी काही साधने उपलब्ध असलेतरी वाहतुकीचे दर वाढल्यामुळे दळण-वळणात उद्योजकांना काही प्रमाणात अडचणी येत आहेत़ त्यावर देखील मात करण्यासाठी व्यावसायिकांचा पाठपुरावा सुरु आहे़ उत्पादन सुरु असलेतरी काही प्रमाणात का असेना त्यांच्याकडे कामगारांचा, मजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे़ काही उद्योग हे एक दिवसाआड सुरु आहेत़ मालाची मागणी घटल्याने विक्रीवर परिणाम होत असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे