शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
3
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
4
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
5
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
6
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
7
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
8
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
9
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
10
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
11
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
12
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
13
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
14
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
15
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
16
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
17
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
18
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
19
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

धुळे तालुक्यात डाळींब बागा वाचविण्यासाठी आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 13:02 IST

पाणी टंचाईचा फटका : पाण्याअभावी नुकसान; कापडणे परिसरातील शेतकरी हवालदिल

 कापडणे, दि.26- धुळे तालुक्यातील कापडणे व देवभाणे शिवारात पाणी टंचाईमुळे डाळींब बागांना अपेक्षित असलेले पाणी देता येत नसल्याने शेतक:यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. परिणामी, रणरणत्या उन्हात डाळींब बागा कोरडय़ा पडत असून शेतक:यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. लाखो रुपये खर्च करून शेतात लागवड केलेल्या डाळींब बागा वाचविण्यासाठी येथील शेतकरी त्यांचा जीवाचा आटापिटा करताना दिसत आहेत. 

कापडणे व देवभाणे शिवारातील शेतकरी मच्छिंद्र मधुकर माळी, अशोक जिजाबराव देसले, विठ्ठल शंकर देसले, रामकृष्ण मुरलीधर पाटील, संजय युवराज पाटील, उदय धनराज पाटील, सुशील माळी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र रमेश माळी, अरूण पुंडलिक पाटील आदी शेतक:यांनी त्यांच्या शेतात डाळींबाची लागवड केली आहे. 
प्रशासनाचे सहकार्य नसल्याने शेतक:यांना फटका 
येथील डाळींब उत्पादक शेतकरी मच्छिंद्र माळी या शेतक:याने देवभाणे शिवारातील गट नं. 70/2 येथील बोअरवेलचे पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडील त्यांच्या गट क्रमांक 161 शेतातील विहिरीत पाईपलाईनद्वारे आणण्याचे नियोजन केले होते. परंतु, या कामामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील रस्त्यावर खोदकाम करण्यात येणार होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला परवानगी नाकारली. त्यामुळे आता डाळींब बागा वाचविण्याचे आव्हान मच्छिंद्र माळी यांच्यासह इतर शेतक:यांसमोर उभे ठाकले आहे. 
330 झाडे पाण्याअभावी करपली 
कापडणे येथील देवभाणे शिवारात मच्छिंद्र माळी या शेतक:याने 1 हेक्टर जमिनीत डाळींबाची 630 डाळींबाच्या झाडांची लागवड केली होती. परंतु, त्या शेतक:याच्या शेतातील विहिरीतील पाण्याने तळ गाठला. त्यामुळे 330 झाडे पाणी टंचाईमुळे करपून गेली आहेत. उर्वरीत 330 झाडे पाणी टंचाईमुळे करपून कोरडली पडल्यामुळे नाईलाजाने त्या शेतक:याला करपलेली डाळींबाचे झाडे उपटून फेकून द्यावे लागले आहे.